शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

काश्मीरमध्ये दगडफेकीसाठी 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सक्रिय

By admin | Updated: April 24, 2017 10:57 IST

दगडफेकीमागे काश्मीरमध्ये सक्रिय असलेले 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमतश्रीनगर, दि. 24 - गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दगडफेकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र या दगडफेकीमागे काश्मीरमध्ये सक्रिय असलेले 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. काश्मीरमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे सुरक्षा दलांवरील दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातील ऑपरेशनमध्ये अडथळा आणण्यासाठी आणि सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी तरुणांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून भडकावलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जवळपास 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून दगडफेक करणा-या तरुणांना सुरक्षा दलांच्या ऑपरेशनबाबत माहिती पुरवली जाते आणि त्यानंतर त्यांना चकमक होणा-या ठिकाणी एकत्र जमवलं जातं. त्यातील 90 टक्के व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप हे बंद झाल्याची माहितीही एका पोलीस अधिका-यानं दिली आहे. दरम्यान 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जवळपास 250 सदस्य होते. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून चकमकीच्या ठिकाणी दगडफेक करणा-या तरुणांना एकत्र केलं जातं होतं आणि सुरक्षा दलांच्या ऑपरेशनला अडथळा आणण्यासाठी दगडफेक करण्यात येते. विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून दगडफेक करण्यासाठी प्रोत्साहित करणा-या ग्रुप अ‍ॅडमिनची पोलिसांना ओळख पटली असून, पोलिसांनी त्यांना काऊंसलिंगसाठीही बोलावलं आहे. आमच्या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, जवळपास 90 टक्क्यांहून अधिक ग्रुप बंद झाल्याचा दावा एका पोलीस अधिका-यानं नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे. इंटरनेट सेवा खंडित केल्यामुळे दगडफेकीच्या घटनांमध्ये कमी आली आहे. तसेच यासाठी त्यांनी बडगाम जिल्ह्यात झालेल्या दगडफेकीच्या घटनांचा हवाला दिला आहे. शनिवारी बडगाम जिल्ह्यात चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यावेळी तिथे फक्त मूठभर तरुणच सुरक्षा दलांवर दगडफेक करत होते. या दगडफेकीत आतापर्यंत डझनांहून अधिक तरुणांना सुरक्षा जवानांशी झालेल्या संघर्षात मृत्यू झाला आहे. मात्र इंटरनेट सेवा खंडित केल्यानं जम्मू-काश्मीरमधल्या व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.