शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आॅक्सिजनअभावी ३० बालकांचा मृत्यू, यूपीतील घटना : पैशांसाठी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 04:50 IST

गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेज-रुग्णालयातील आॅक्सिजनचा साठा संपल्याने ४८ तासांमध्ये नवजात बालकांसह ३० रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

 गोरखपूर : गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेज-रुग्णालयातील आॅक्सिजनचा साठा संपल्याने ४८ तासांमध्ये नवजात बालकांसह ३० रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यूपी सरकारने मात्र असे काही घडले नसल्याचा दावा केला आहे.दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रुग्णालय-कॉलेजला भेट देऊन पाहणी केली होती. कळस म्हणजे एवढी धक्कादायक घटना होऊन जिल्हाधिकारी किंवा कुणीही वरिष्ठ अधिकाºयाने तेथे भेट देऊन विचारपूसही केलेली नाही. तब्बल ६९ लाख रुपयांची थकबाकी न दिल्याने आॅक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता. लिक्विड आॅक्सिजन तर गुरुवारपासूनच बंद होता आणि शुक्रवारी तर सर्वच सिलिंडर संपले. काही बालकांना व रुग्णांना दोन तासांसाठी जम्बो सिलिंडर व अम्बू बॅगद्वारे आॅक्सिजन देण्यात आला. (वृत्तसंस्था)बेजबाबदारपणाचा परिणामरुग्णालय व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे बालकांना प्राणास मुकावे लागले. या रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी लिक्विड आॅक्सिजनचा प्रकल्प उभारण्यात आला होता. त्यातून सुमारे ३०० रुग्णांना पाइपद्वारे आॅक्सिजन पुरवठा केला जात होता.शुक्रवारी सकाळी आॅक्सिजन संपल्याने काही बालकांना अम्बू बॅग देण्यात आल्या. दुपारी १२ वाजता काही सिलिंडर पोहोचले; परंतु तरीही रुग्णालयात आॅक्सिजनची मोठी टंचाई जाणवतआहे. तेथे एका वॉर्डमध्ये दीड तासासाठी १६ सिलिंडर लागतात.पुरवठा सुरू, पण... पोहोचणार रविवारपर्यंतइतकी बालके मरण पावल्यानंतर रुग्णालयाने पुरवठादाराचे २२ लाख रुपये भरण्याची तयारी सुरू केली व अखेर आॅक्सिनजचा पुरवठा सुरू करण्याचा निर्णय झाला.मात्र लिक्विड आॅक्सिजन पोहोचण्यास शनिवार किंवा रविवार उजाडणार आहे. यापूर्वीही याच रुग्णालयाचा ५० लाख रुपये वेळेत न भरल्याने आॅक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता.