शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

आॅक्सिजनअभावी ३० बालकांचा मृत्यू, यूपीतील घटना : पैशांसाठी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 04:50 IST

गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेज-रुग्णालयातील आॅक्सिजनचा साठा संपल्याने ४८ तासांमध्ये नवजात बालकांसह ३० रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

 गोरखपूर : गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेज-रुग्णालयातील आॅक्सिजनचा साठा संपल्याने ४८ तासांमध्ये नवजात बालकांसह ३० रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यूपी सरकारने मात्र असे काही घडले नसल्याचा दावा केला आहे.दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रुग्णालय-कॉलेजला भेट देऊन पाहणी केली होती. कळस म्हणजे एवढी धक्कादायक घटना होऊन जिल्हाधिकारी किंवा कुणीही वरिष्ठ अधिकाºयाने तेथे भेट देऊन विचारपूसही केलेली नाही. तब्बल ६९ लाख रुपयांची थकबाकी न दिल्याने आॅक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता. लिक्विड आॅक्सिजन तर गुरुवारपासूनच बंद होता आणि शुक्रवारी तर सर्वच सिलिंडर संपले. काही बालकांना व रुग्णांना दोन तासांसाठी जम्बो सिलिंडर व अम्बू बॅगद्वारे आॅक्सिजन देण्यात आला. (वृत्तसंस्था)बेजबाबदारपणाचा परिणामरुग्णालय व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे बालकांना प्राणास मुकावे लागले. या रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी लिक्विड आॅक्सिजनचा प्रकल्प उभारण्यात आला होता. त्यातून सुमारे ३०० रुग्णांना पाइपद्वारे आॅक्सिजन पुरवठा केला जात होता.शुक्रवारी सकाळी आॅक्सिजन संपल्याने काही बालकांना अम्बू बॅग देण्यात आल्या. दुपारी १२ वाजता काही सिलिंडर पोहोचले; परंतु तरीही रुग्णालयात आॅक्सिजनची मोठी टंचाई जाणवतआहे. तेथे एका वॉर्डमध्ये दीड तासासाठी १६ सिलिंडर लागतात.पुरवठा सुरू, पण... पोहोचणार रविवारपर्यंतइतकी बालके मरण पावल्यानंतर रुग्णालयाने पुरवठादाराचे २२ लाख रुपये भरण्याची तयारी सुरू केली व अखेर आॅक्सिनजचा पुरवठा सुरू करण्याचा निर्णय झाला.मात्र लिक्विड आॅक्सिजन पोहोचण्यास शनिवार किंवा रविवार उजाडणार आहे. यापूर्वीही याच रुग्णालयाचा ५० लाख रुपये वेळेत न भरल्याने आॅक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता.