शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

२९... सारांश

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

पुलांचे रुंदीकरण करण्याची मागणी

पुलांचे रुंदीकरण करण्याची मागणी
नरखेड : तालुक्यातील अंतर्गत मार्गावरील पूल अरुंद व खोलगट आहेत. पावसाळ्यात त्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होते. शिवाय, गावांची तालुक्याशी संपर्कही तुटतो. त्यामळे या छोट्या पुलांची दुरुस्ती करून त्यांचे रुंदीकरण करण्याची मागणी तालुक्यातील सरपंचांनी केली आहे.
***
खड्ड्यांमुळे बळावली अपघाताची शक्यता
मेंढला : वडविहिरा - मेंढला - खराळा तसेच वडविहिरा - दावसा - थडीपवनी या दोन्ही मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अपघाताची शक्यता बळावली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास त्रास सहन करावा लागत असल्याने या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
***
ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई
काटोल : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. त्यामुळे पाण्याची टाकी भरण्यास विलंब होत असल्याने नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दिवसाचे भारनियमन बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
***
स्मशनभूमीत मूलभूत सुविधा तयार करा
सावरगाव : हल्ली परिसरातील गावांमधील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. तिथे पाणी, रस्ता यासह अन्य मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणचे दहन शेड मोडकळीस आले आहे. या स्मशानभूमीचे सर्वेक्षण करून तिथे मूलभूत सुविधांची निर्मिती करण्याची मागणी जोर धरत आहे.
***
सार्वजनिक विहिरी झाल्या निरुपयोगी
सावनेर : तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीपुरवठा योजना असल्याने तेथील सार्वजनिक विहिरीत देखभाल व दुरुस्तीअभावी मोडकळीस आल्या आहेत. त्या विहिरी वापरात नसल्याने उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता त्यांची दुरुस्ती करून त्यांचे रेन वॉटर हार्व्हेस्टिंगद्वारे पुनर्भरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
***
संरक्षक कठडे लावण्याची मागणी
मांढळ : कुही तालुक्यातील अनेक अंतर्गत रोडवर पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यातील बहुतांश पुलांचे संरक्षक कठडे तुटल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या पुलांचे सर्वेक्षण करून त्यावर संरक्षक कठड्यांची निर्मिती करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
***