शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

व्यापमंचा २७ वा बळी

By admin | Updated: July 6, 2015 03:55 IST

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेतील आणि भरतीतील अफाट हेराफेरीने गाजत असलेल्या मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यातील मृत्यूचे तांडव रौद्र रूप धारण करू पाहात आहे.

नवी दिल्ली/ भोपाळ : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेतील आणि भरतीतील अफाट हेराफेरीने गाजत असलेल्या मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यातील मृत्यूचे तांडव रौद्र रूप धारण करू पाहात आहे. बोगस परीक्षार्थींचा तपास करणाऱ्या डॉ. अरुण शर्मा यांच्या मृत्यूने या घोटाळ्यातील २७वा बळी नोंदला गेला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अरुण शर्मा यांचा रविवारी दिल्लीच्या हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने व्यापमं घोटाळ्याचे गूढ आणखी वाढले आहे. ६४वर्षीय डॉ. शर्मा हे जबलपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता होते. मेडिकल कौन्सिलकडून (एमसीआय) अगरताळा वैद्यकीय महाविद्यालयाचे निरीक्षण करण्यासाठी रविवारी सकाळीच ते विमानाने अगरतळ्याला प्रयाण करणार होते. नैर्ऋत्य दिल्लीतील द्वारका हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या डॉ. शर्मा यांचा मृतदेह रविवारी संशयास्पद स्थितीत आढळून आला. घोटाळ्याच्या तपासाशी संबंध असलेले आणि संशयास्पद मृत्यू झालेले ते दुसरे अधिष्ठाता आहेत. यापूर्वी तपास करणाऱ्या डी.के. साकल्ले यांचाही गूढ  मृत्यू झाला. हे दोन्ही मृत्यू वर्षभराच्या काळातील आहेत. या दोघांचीही हत्या झाली असावी, असा संशय इंडियन मेडिकल असोसिएशन जबलपूरचे जिल्हाध्यक्ष सुधीर तिवारी यांनी व्यक्त केला आहे.व्यापमं घोटाळ्याचा तपास उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एसआयटीकडून केला जात असून उच्च न्यायालय अन्य कोणत्याही संस्थेमार्फत तपासाचे आदेश देत असेल तर आमचा आक्षेप नाही. काँग्रेसने मागणी केल्याप्रमाणो सीबीआय तपासालाही आमचा विरोध नाही, असा खुलासा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केला. या प्रकरणातील प्रत्येक मृत्यू दु:खद आणि दुर्दैवी असून त्याबाबत तपास केला जावा. राज्य सरकारने यापूर्वीच उच्च न्यायालयाला तसे कळविले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी लेखी विनंती आम्ही पुन्हा करणार आहोत. या तपासावर उच्च न्यायालयाची निगराणी असल्यामुळे राज्य सरकारची कोणतीही भूमिका नाही. उच्च न्यायालयाने ज्या दिवशी तपास हाती घेतला त्या दिवसापासून सरकारची भूमिका संपली आहे. राज्य सरकारला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयापेक्षा वरचे स्थान नाही, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)ही मृत्यूची मालिका दुर्दैवी - दिग्विजयसिंग यापूर्वीचे डीन डॉ. सकाल्ले यांच्या पाठोपाठ डॉ. शर्मा यांच्या मृत्यूची भर पडली आहे. डॉ. शर्मा यांचे वडील एन.के. शर्मा हे मंत्री होते. ते मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही राहिले होते, असा उल्लेख काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी टिष्ट्वटमध्ये केला आहे. तपास उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एसआयटीकडून केला जात असून उच्च न्यायालय अन्य कोणत्याही संस्थेमार्फत तपासाचे आदेश देत असेल तर आमचा आक्षेप नाही. काँग्रेसने मागणी केल्याप्रमाणे सीबीआय तपासालाही विरोध नाही. -शिवराज सिंह चौहान-----------------तपासाची ठोसपावले उचललीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीवर १० मिनिटे चर्चा करीत व्यापमं घोटाळ्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. टीव्ही पत्रकार अक्षयसिंग यांच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी व्हावी असा आदेश त्यांनी दिला. चौहान यांनी अक्षयसिंग यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली परिस्थिती तसेच तपासाच्या अनुषंगाने कोणती पावले उचलण्यात आली याची विस्तृत माहिती दिल्याचे समजते. या प्रकरणाशी संबंधित सर्व लोकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासही राजनाथसिंह यांनी सुचविले आहे.