शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

26/11 मुंबई हल्ला : भारतीय साक्षीदारांच्या चौकशीवरुन अडला पाकिस्तान, भारत देणार दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 08:57 IST

26/11 मुंबई हल्ल्याची सुनावणी करत असलेल्या पाकिस्तान कोर्टाला भारत दणका देण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पाकिस्तानी कोर्टाकडून वारंवार होणारी दिरंगाई तसंच मुंबई हल्ल्यातील 24 भारतीय साक्षीदारांना पाकिस्तानी अधिका-यांसमोर सादर करण्याच्या हट्टापायी या प्रकरणाची सुनावणी कोणत्याही ठोस परिणामांशिवाय समाप्त होताना दिसत नाही.

नवी दिल्ली - 26/11 मुंबई हल्ल्याची सुनावणी करत असलेल्या पाकिस्तान कोर्टाला भारत दणका देण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पाकिस्तानी कोर्टाकडून वारंवार होणारी दिरंगाई तसंच मुंबई हल्ल्यातील 24 भारतीय साक्षीदारांना पाकिस्तानी अधिका-यांसमोर सादर करण्याच्या हट्टापायी या प्रकरणाची सुनावणी कोणत्याही ठोस परिणामांशिवाय समाप्त होताना दिसत नाही. पाकिस्तानी कोर्ट मुंबई हल्ल्यातील 24 भारतीय साक्षीदारांची पाकिस्तानी अधिका-यांद्वारे विचारपूस चौकशी करू इच्छित आहे, याशिवाय पाकिस्तानी कोर्ट पुढे जाण्यास तयार नाही. आता साक्षीदारांच्या मुद्यावरुन पाकिस्तानची आडमुठी भूमिका समोर येत आहे.  तर दुसरीकडे, भारत साक्षीदारांना पाकिस्तानमध्ये पाठवण्यासाठी क्वचितच तयार आहे. यावर भारताचं असे म्हणणे आहे की, पाकिस्तान 26/11 हल्ल्याची सुनवाणीसंदर्भात गंभीर नाही आणि पाकिस्तानची याबाबत कोणत्याही तर्कशुद्ध परिणामांपर्यंत पोहोचवण्याची इच्छादेखील नाही.

गेल्या आठवड्यात युरोपीयन युनियनसोबत पार पडलेल्या संयुक्त निवेदनादरम्यान भारतानं 26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा देण्याची बाब पुन्हा मांडली होती. एका भारतीय अधिका-यानं सांगितले होते की, मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद पाकिस्तान सरकारच्या सुरक्षेत बिनधास्तपणे मोकाट फिरत आहे. भारतानं हाफिजविरोधातील पाकिस्तानकडे ठोस पुरावे सादर केले होते तरी अद्यापपर्यंत तो मोकाटच आहे.  दरम्यान, मुंबई हल्ल्याच्या सुनावणीसाठी सर्व 24 साक्षीदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याच्या मुद्यावर भारतानं विचारविनिमय केला आहे, मात्र पाकिस्तानकडून अद्यापपर्यंत यासंदर्भात कोणताही औपचारिकरित्या प्रस्ताव आलेला नाही.  पाकिस्तानी कोर्ट याप्रकरणी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख जकीउर रहमान लख्वीसहीत 7 जणांविरोधात सुनावणी करत आहे. लख्वीव्यतिरिक्त वाजिद, मजहर इकबाल, हामिद अमीन सादिक, शहीद जमीन रियाज, जमील अहमद आणि युनूस अंजुमवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि 2008मध्ये मुंबईत हल्ला घडवण्यासाठी कट रचल्याचा आरोप आहे. 

मुंबई हल्ल्यासंदर्भात सर्व ठोस पुरावे पाकिस्तानला सोपवण्यात आले आहेत, असे यापूर्वीच भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पुराव्यांद्वारे 26/11 च्या आरोपींना शिक्षा मिळू शकते,असंही सांगण्यात आले आहे. गेल्या 8 वर्षांपासून मुंबई हल्ला प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. मात्र, कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे पाकिस्तानकडून याप्रकरणात दिरंगाई केली जात आहे. गेल्या 8 वर्षांत 9 न्यायाधीशांची बदलीदेखील करण्यात आली. 

दरम्यान, पाकिस्तानी कोर्टाच्या एका अधिका-यानं सांगितले की, भारतीय साक्षीदारांना येथे आणण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे. जर साक्षीदारांना सादर करण्यात आले नाही तर भारतीय साक्षीदारांचा जबाब नोंदवल्याशिवाय कोर्ट या प्रकरणाची सुनावणी करण्याची शक्यता आहे, अशा उलट्या बोंबा पाकिस्ताननं मारल्या आहेत.