शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

26/11 मुंबई हल्ला : भारतीय साक्षीदारांच्या चौकशीवरुन अडला पाकिस्तान, भारत देणार दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 08:57 IST

26/11 मुंबई हल्ल्याची सुनावणी करत असलेल्या पाकिस्तान कोर्टाला भारत दणका देण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पाकिस्तानी कोर्टाकडून वारंवार होणारी दिरंगाई तसंच मुंबई हल्ल्यातील 24 भारतीय साक्षीदारांना पाकिस्तानी अधिका-यांसमोर सादर करण्याच्या हट्टापायी या प्रकरणाची सुनावणी कोणत्याही ठोस परिणामांशिवाय समाप्त होताना दिसत नाही.

नवी दिल्ली - 26/11 मुंबई हल्ल्याची सुनावणी करत असलेल्या पाकिस्तान कोर्टाला भारत दणका देण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पाकिस्तानी कोर्टाकडून वारंवार होणारी दिरंगाई तसंच मुंबई हल्ल्यातील 24 भारतीय साक्षीदारांना पाकिस्तानी अधिका-यांसमोर सादर करण्याच्या हट्टापायी या प्रकरणाची सुनावणी कोणत्याही ठोस परिणामांशिवाय समाप्त होताना दिसत नाही. पाकिस्तानी कोर्ट मुंबई हल्ल्यातील 24 भारतीय साक्षीदारांची पाकिस्तानी अधिका-यांद्वारे विचारपूस चौकशी करू इच्छित आहे, याशिवाय पाकिस्तानी कोर्ट पुढे जाण्यास तयार नाही. आता साक्षीदारांच्या मुद्यावरुन पाकिस्तानची आडमुठी भूमिका समोर येत आहे.  तर दुसरीकडे, भारत साक्षीदारांना पाकिस्तानमध्ये पाठवण्यासाठी क्वचितच तयार आहे. यावर भारताचं असे म्हणणे आहे की, पाकिस्तान 26/11 हल्ल्याची सुनवाणीसंदर्भात गंभीर नाही आणि पाकिस्तानची याबाबत कोणत्याही तर्कशुद्ध परिणामांपर्यंत पोहोचवण्याची इच्छादेखील नाही.

गेल्या आठवड्यात युरोपीयन युनियनसोबत पार पडलेल्या संयुक्त निवेदनादरम्यान भारतानं 26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा देण्याची बाब पुन्हा मांडली होती. एका भारतीय अधिका-यानं सांगितले होते की, मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद पाकिस्तान सरकारच्या सुरक्षेत बिनधास्तपणे मोकाट फिरत आहे. भारतानं हाफिजविरोधातील पाकिस्तानकडे ठोस पुरावे सादर केले होते तरी अद्यापपर्यंत तो मोकाटच आहे.  दरम्यान, मुंबई हल्ल्याच्या सुनावणीसाठी सर्व 24 साक्षीदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याच्या मुद्यावर भारतानं विचारविनिमय केला आहे, मात्र पाकिस्तानकडून अद्यापपर्यंत यासंदर्भात कोणताही औपचारिकरित्या प्रस्ताव आलेला नाही.  पाकिस्तानी कोर्ट याप्रकरणी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख जकीउर रहमान लख्वीसहीत 7 जणांविरोधात सुनावणी करत आहे. लख्वीव्यतिरिक्त वाजिद, मजहर इकबाल, हामिद अमीन सादिक, शहीद जमीन रियाज, जमील अहमद आणि युनूस अंजुमवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि 2008मध्ये मुंबईत हल्ला घडवण्यासाठी कट रचल्याचा आरोप आहे. 

मुंबई हल्ल्यासंदर्भात सर्व ठोस पुरावे पाकिस्तानला सोपवण्यात आले आहेत, असे यापूर्वीच भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पुराव्यांद्वारे 26/11 च्या आरोपींना शिक्षा मिळू शकते,असंही सांगण्यात आले आहे. गेल्या 8 वर्षांपासून मुंबई हल्ला प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. मात्र, कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे पाकिस्तानकडून याप्रकरणात दिरंगाई केली जात आहे. गेल्या 8 वर्षांत 9 न्यायाधीशांची बदलीदेखील करण्यात आली. 

दरम्यान, पाकिस्तानी कोर्टाच्या एका अधिका-यानं सांगितले की, भारतीय साक्षीदारांना येथे आणण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे. जर साक्षीदारांना सादर करण्यात आले नाही तर भारतीय साक्षीदारांचा जबाब नोंदवल्याशिवाय कोर्ट या प्रकरणाची सुनावणी करण्याची शक्यता आहे, अशा उलट्या बोंबा पाकिस्ताननं मारल्या आहेत.