शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

द्विवर्षपूर्तीनिमित्त भाजपाचे २६ मे ते १५ जूनपर्यंत विकासपर्व

By admin | Updated: May 25, 2016 03:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त देशभरातील दोनशे विशेष केंद्रातून सरकारच्या विकास कामांची यशोगाथा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त देशभरातील दोनशे विशेष केंद्रातून सरकारच्या विकास कामांची यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. यासाठी भाजपच्या वतीने २६ मे ते १५ जूनपर्यंत ‘विकास पर्व’ आयोजित केले जाणार आहे. एक केंद्रीय मंत्री, एक राज्यमंत्र, राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील नेत्यांचा समावेश असलेली ३३ पथके या विशेष केंद्रांना भेट देऊन मोदी सरकारची कामगिरीचा लेखाजोखा मांडणार आहेत.विरोधकांनी महत्त्वपूर्ण विधेयकांचा मार्ग रोखत विकासाच्या मार्गात कशापद्धतीने आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला. तसेच यावर मात करून दोन वर्षाच्या अल्पावधीत सरकारने लोककल्याणासोबत विकासाची काय-काय कामे केली, याचीही जनतेला माहिती दिली जाणार आहे, असे सर्व मंत्री आणि विभाग प्रमुखांंना पाठविण्यात आलेल्या अंतर्गत चिठ्ठीत म्हटले आहे.२६ मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्ववाखाली सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहे. या दोन वर्षातील सरकारची कामगिरी मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचविण्यात येणार आहे. त्यानुसार सरकारच्या विविध योजनांच्या फायद्याबाबत माहिती देणे, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना, संस्थासोबत तसेच बिगरराजकीय बैठकी घेणे, शेतकरी, महिला संघटना, वकील, डॉक्टरांशीही संवाद साधणे, आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय पत्रकार परिषद घेणे, मुलाखतीच्या माध्यमातूनही सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. रालोआ खासदारांना कमीत कमी दोन दिवस आणि एक सायंकाळ आपापल्या मतदार संघात जाऊन लोकांची गाऱ्हाणी ऐकून त्यावर काढण्यास सांगण्यात आले आहे.खासदार आणि पथकातील सदस्यांना सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच भाजपचे आठ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन दिवस योजनांचा प्रचार करतील.