शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

‘वंदे भारत’ने वाचवले लोकांचे २५०० तास; राजस्थानात ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 06:16 IST

राजस्थानला बुधवारी पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस मिळाली. या मध्यम उच्चगती रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

जयपूर :

राजस्थानला बुधवारी पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस मिळाली. या मध्यम उच्चगती रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेमुळे देशवासीयांचे प्रवासातील आतापर्यंत २५०० तास वाचले, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमात सामील झाले. त्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर जयपूरहून सकाळी साडेअकराच्या सुमारास वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली कॅन्टोन्मेंटसाठी रवाना झाली. मोदी गेहलोत यांना म्हणाले, तुमच्या दोन्ही हातात लाडू आहेत. रेल्वेमंत्री राजस्थानचे आहेत आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्षही राजस्थानचे आहेत. २०१४ नंतर रेल्वेत झपाट्याने बदल सुरू झाले. वंदे भारत रेल्वेने जयपूरहून दिल्लीला जाणे सोपे होईल. या रेल्वेमुळे राजस्थानच्या पर्यटनालाही मदत होणार आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही सहावी वंदे भारत रेल्वे आहे, जिचे लोकार्पण झाले, असे मोदी म्हणाले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, खासदार कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड आणि इतर काँग्रेस-भाजप नेतेही उपस्थित होते.

रेल्वेला राजकारणाचा आखाडा बनवले होते...वंदे भारत रेल्वे भारताला एका विकासाच्या प्रवासाकडे घेऊन जाईल. रेल्वेसारख्या महत्त्वाच्या यंत्रणेलाही रेल्वे भरतीच्या माध्यमातून राजकारणाचा आखाडा बनवण्यात आले होते हे देशाचे दुर्दैव आहे. ६० लाख प्रवाशांना लाभवंदे भारत रेल्वे सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६० लाख लोकांनी या गाड्यांमधून प्रवास केला आहे. गती हे तिचे वैशिष्ट्य आहे. यामुळे वेळेची बचत होत आहे. देशभरात धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेमुळे लोकांचे २५०० तास वाचवले आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

संकटात असतानाही...मुख्यमंत्री गेहलोत यांनी रेल्वेशी संबंधित काही मागण्या केल्या आहेत, याकडे लक्ष वेधून मोदी म्हणाले, ‘एक मित्र म्हणून, तुम्ही (गेहलोत) दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. मी गेहलोतजींचे विशेष आभार व्यक्त करतो की, सध्या राजकीय संकटात असतानाही त्यांनी विकासकामांसाठी वेळ काढला, रेल्वेच्या कार्यक्रमात भाग घेतला. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस