शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

‘वंदे भारत’ने वाचवले लोकांचे २५०० तास; राजस्थानात ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 06:16 IST

राजस्थानला बुधवारी पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस मिळाली. या मध्यम उच्चगती रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

जयपूर :

राजस्थानला बुधवारी पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस मिळाली. या मध्यम उच्चगती रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेमुळे देशवासीयांचे प्रवासातील आतापर्यंत २५०० तास वाचले, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमात सामील झाले. त्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर जयपूरहून सकाळी साडेअकराच्या सुमारास वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली कॅन्टोन्मेंटसाठी रवाना झाली. मोदी गेहलोत यांना म्हणाले, तुमच्या दोन्ही हातात लाडू आहेत. रेल्वेमंत्री राजस्थानचे आहेत आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्षही राजस्थानचे आहेत. २०१४ नंतर रेल्वेत झपाट्याने बदल सुरू झाले. वंदे भारत रेल्वेने जयपूरहून दिल्लीला जाणे सोपे होईल. या रेल्वेमुळे राजस्थानच्या पर्यटनालाही मदत होणार आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही सहावी वंदे भारत रेल्वे आहे, जिचे लोकार्पण झाले, असे मोदी म्हणाले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, खासदार कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड आणि इतर काँग्रेस-भाजप नेतेही उपस्थित होते.

रेल्वेला राजकारणाचा आखाडा बनवले होते...वंदे भारत रेल्वे भारताला एका विकासाच्या प्रवासाकडे घेऊन जाईल. रेल्वेसारख्या महत्त्वाच्या यंत्रणेलाही रेल्वे भरतीच्या माध्यमातून राजकारणाचा आखाडा बनवण्यात आले होते हे देशाचे दुर्दैव आहे. ६० लाख प्रवाशांना लाभवंदे भारत रेल्वे सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६० लाख लोकांनी या गाड्यांमधून प्रवास केला आहे. गती हे तिचे वैशिष्ट्य आहे. यामुळे वेळेची बचत होत आहे. देशभरात धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेमुळे लोकांचे २५०० तास वाचवले आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

संकटात असतानाही...मुख्यमंत्री गेहलोत यांनी रेल्वेशी संबंधित काही मागण्या केल्या आहेत, याकडे लक्ष वेधून मोदी म्हणाले, ‘एक मित्र म्हणून, तुम्ही (गेहलोत) दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. मी गेहलोतजींचे विशेष आभार व्यक्त करतो की, सध्या राजकीय संकटात असतानाही त्यांनी विकासकामांसाठी वेळ काढला, रेल्वेच्या कार्यक्रमात भाग घेतला. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस