शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘वंदे भारत’ने वाचवले लोकांचे २५०० तास; राजस्थानात ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 06:16 IST

राजस्थानला बुधवारी पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस मिळाली. या मध्यम उच्चगती रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

जयपूर :

राजस्थानला बुधवारी पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस मिळाली. या मध्यम उच्चगती रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेमुळे देशवासीयांचे प्रवासातील आतापर्यंत २५०० तास वाचले, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमात सामील झाले. त्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर जयपूरहून सकाळी साडेअकराच्या सुमारास वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली कॅन्टोन्मेंटसाठी रवाना झाली. मोदी गेहलोत यांना म्हणाले, तुमच्या दोन्ही हातात लाडू आहेत. रेल्वेमंत्री राजस्थानचे आहेत आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्षही राजस्थानचे आहेत. २०१४ नंतर रेल्वेत झपाट्याने बदल सुरू झाले. वंदे भारत रेल्वेने जयपूरहून दिल्लीला जाणे सोपे होईल. या रेल्वेमुळे राजस्थानच्या पर्यटनालाही मदत होणार आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही सहावी वंदे भारत रेल्वे आहे, जिचे लोकार्पण झाले, असे मोदी म्हणाले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, खासदार कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड आणि इतर काँग्रेस-भाजप नेतेही उपस्थित होते.

रेल्वेला राजकारणाचा आखाडा बनवले होते...वंदे भारत रेल्वे भारताला एका विकासाच्या प्रवासाकडे घेऊन जाईल. रेल्वेसारख्या महत्त्वाच्या यंत्रणेलाही रेल्वे भरतीच्या माध्यमातून राजकारणाचा आखाडा बनवण्यात आले होते हे देशाचे दुर्दैव आहे. ६० लाख प्रवाशांना लाभवंदे भारत रेल्वे सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६० लाख लोकांनी या गाड्यांमधून प्रवास केला आहे. गती हे तिचे वैशिष्ट्य आहे. यामुळे वेळेची बचत होत आहे. देशभरात धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेमुळे लोकांचे २५०० तास वाचवले आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

संकटात असतानाही...मुख्यमंत्री गेहलोत यांनी रेल्वेशी संबंधित काही मागण्या केल्या आहेत, याकडे लक्ष वेधून मोदी म्हणाले, ‘एक मित्र म्हणून, तुम्ही (गेहलोत) दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. मी गेहलोतजींचे विशेष आभार व्यक्त करतो की, सध्या राजकीय संकटात असतानाही त्यांनी विकासकामांसाठी वेळ काढला, रेल्वेच्या कार्यक्रमात भाग घेतला. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस