शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांसाठी अडीच लाख सुरक्षा कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 05:02 IST

२५ हेलिकॉप्टर्स, ५00 रेल्वेगाड्या : हजारो वाहने, जहाजे, घोडे व गाढवेही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची कल्पना आपल्याला सहजासहजी येणारी नाही. यंदा सात टप्प्यांमध्ये होत असलेल्या या निवडणुकीसाठी सुमारे ९० कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत. ५४३ लोकसभा सदस्यांच्या निवडीसाठी ३३ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये १० लाख मतदान केंद्रे असणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

निवडणुकीच्या विविध टप्प्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सुमारे अडीच लाख कर्मचाऱ्यांना देशात ठिकठिकाणी पाठविले जाणार आहे. यासाठी २५ हेलिकॉप्टर्स, ५०० हून अधिक रेल्वे गाड्या, १७ हजार ५०० अन्य प्रकारची वाहने तसेच शेकडो बोटी आणि जहाजे यांचा वापर केला जाणार आहे. याशिवाय हजारो घोडे, खेचरे, हत्ती तसेच उंटांचाही वापर केला जातो. या सर्वांच्या प्रयत्नांमधूनच ही सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत असते.

देशपातळीवर निवडणूक पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पुरेसे कर्मचारी नसतात. त्यामुळेच ते राज्य सरकारांचे तसेच निमशासकीय संस्थांचे कर्मचारी या कामासाठी घेतात. १९९३मध्ये या कर्मचारी घेण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली. त्यानुसार आता आयोग आणि सरकार हे परस्पर सहकार्याने लागणाºया मनुष्यबळाची तरतूद करतात.

निवडणूक घेण्याची प्रमुख जबाबदारी निवडणूक आयोगाची असली तरी या प्रक्रियेमध्ये केंद्रीय गृह मंत्रालय तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचाही महत्त्वाचा सहभाग असतो. गेल्या दोन महिन्यांमध्ये या तीनही संस्थांनी अनेक संयुक्त बैठका घेऊन निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे कशी पार पाडता येईल, याचे नियोजन केले आहे.गृह खात्यातर्फे समन्वयकेंद्रीय गृहमंत्रालय निवडणुकीसाठीच्या सुरक्षा दलांची गरज भागविते. रेल्वे व अन्य मंत्रालये तसेच विविध राज्यांच्या गृह मंत्रालयांशी समन्वय साधून सुुरक्षेची व्यवस्था करीत असते. दलाचे जवान देण्याचे, त्यांना ठिकठिकाणी पाठविण्याचे आणि त्यांना अन्य सोयी-सुविधा देण्याचे जबाबदारीचे कामही गृह मंत्रालयच करते.