शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

२५ कोटींच्या विनियोगावरून मतभिन्नता मनपा: सत्ताधारी म्हणतात रस्त्यांची गरज महत्त्वाची; विरोधक म्हणतात घनकचरा प्रकल्प व इतर कामेही घ्या

By admin | Updated: October 21, 2016 00:14 IST

जळगाव: मुख्यमंत्र्यांनी मनपाला जाहीर केलेला २५ कोटींचा निधी अखेर मंजूर झाला आहे. तसे पत्र मनपाला प्राप्त होताच हा निधी कसा खर्च व्हावा? यावरून मनपा सत्ताधारी, विरोधी पक्षांमध्ये खल सुरू झाला आहे. बहुतांश सदस्यांनी तसेच सत्ताधार्‍यांनी रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले आहे. तर भाजपा गटनेते सुनील माळी यांनी मात्र घनकचरा प्रकल्पाचे काम करावे. तसेच नव्याने प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने तो तयार करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेण्याची मागणी केली आहे. ठरावीक भागातच कामे न करता सर्व भागात कामे होतील,याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जळगाव: मुख्यमंत्र्यांनी मनपाला जाहीर केलेला २५ कोटींचा निधी अखेर मंजूर झाला आहे. तसे पत्र मनपाला प्राप्त होताच हा निधी कसा खर्च व्हावा? यावरून मनपा सत्ताधारी, विरोधी पक्षांमध्ये खल सुरू झाला आहे. बहुतांश सदस्यांनी तसेच सत्ताधार्‍यांनी रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले आहे. तर भाजपा गटनेते सुनील माळी यांनी मात्र घनकचरा प्रकल्पाचे काम करावे. तसेच नव्याने प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने तो तयार करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेण्याची मागणी केली आहे. ठरावीक भागातच कामे न करता सर्व भागात कामे होतील,याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पथदिवे, शौचालयांची कामे व्हावीत-सुनील माळी
माळी यांनी बुधवारीच याबाबत निवेदन प्रसिद्ध करून भूमिका स्पष्ट केली आहे. कांचननगर, चौघुले प्लॉट, प्रजापतनगर, भुरेमामलेदार प्लॉट, के.सी.पार्क, इंद्रप्रस्थनगर, भोईटेनगर, पिंप्राळा, दादावाडी, निमखेडी रोड, खोटेनगर, कोल्हेनगर,शिवकॉलनी, रामानंदनगर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, पवननगर आदी भागात पाणीपुरवठा, पथदिवे, शौचालये याबाबतची कामे करावीत, अशी मागणी केली आहे.
रस्त्यांची कामेच व्हावीत- अनंत जोशी,
मनसेचे अनंत जोशी म्हणाले की, शहरातील पिण्याच्या पाईपलाईनचा विषय अमृतमधून मार्गी लागला असून भूमिगत गटारींचा विषयही एक-दोन वर्षात अमृत योजनेतूनच मार्गी लागेल. आरोग्याचा विषयही गंभीर आहे. मात्र त्यासाठी सफाई मक्ता देणे, वाहन खरेदी करणे आदी कामे १४व्या वित्त आयोगातून करण्यात येत आहेत. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम होणे आवश्यक आहे. मात्र सर्वच कामे २५ कोटींच्या निधीतून होणे शक्य नाही. त्यातुलनेत शहरातील रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निधी अभावी रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे नागरिक त्रास सहन करत आहेत. त्यांच्या सोयीचा विचार करून ही कामे करणे आवश्यक आहे.
रस्ते, गटारींना प्राधान्य हवे-अश्विनी देशमुख
राष्ट्रवादीच्या अश्विनी देशमुख म्हणाल्या की, रस्ते, गटारी, व महिला शौचालयांना प्राधान्य देण्याची गरज आहे बाजारपेठेत, मुख्य रस्त्यावर महिलांसाठी शौचालय, स्वच्छतागृह नाहीत. ती बांधावीत. तसेच शहरातील एखादा चांगला बगिचा विकसित करण्याची गरज आहे. नवीन वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स टाकण्याची गरज आहे. अमृत योजनेतून ही गरज काही प्रमाणात भागणार असली तरीही लहान आकाराच्या पाईपलाईन त्यात होणार नाहीत. त्याची कामे या निधीतून केली जावीत. मुख्य रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यात यावीत. जे रस्ते बर्‍याच वर्षांपासून झालेले नाहीत, त्यावरून वाहतूक करणार्‍या नागरिकांना पाठीचे, मणक्याचे आजार झाले आहेत. असे रस्ते तसेच जास्तीत जास्त वापराचे रस्ते तातडीने केले जावेत. भुयारी गटारींची योजना अमृतमधून प्रस्तावित असली तरीही ती मोठी योजना असून त्याचा १० टक्के हिस्सा भरणेदेखील मनपाला अवघड होईल. त्यामुळे त्या योजनेस विलंब होणार आहे. त्यामुळे शहरातील गटारींची कामेही केली जावीत.