शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

२५ कोटींच्या विनियोगावरून मतभिन्नता मनपा: सत्ताधारी म्हणतात रस्त्यांची गरज महत्त्वाची; विरोधक म्हणतात घनकचरा प्रकल्प व इतर कामेही घ्या

By admin | Updated: October 21, 2016 00:14 IST

जळगाव: मुख्यमंत्र्यांनी मनपाला जाहीर केलेला २५ कोटींचा निधी अखेर मंजूर झाला आहे. तसे पत्र मनपाला प्राप्त होताच हा निधी कसा खर्च व्हावा? यावरून मनपा सत्ताधारी, विरोधी पक्षांमध्ये खल सुरू झाला आहे. बहुतांश सदस्यांनी तसेच सत्ताधार्‍यांनी रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले आहे. तर भाजपा गटनेते सुनील माळी यांनी मात्र घनकचरा प्रकल्पाचे काम करावे. तसेच नव्याने प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने तो तयार करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेण्याची मागणी केली आहे. ठरावीक भागातच कामे न करता सर्व भागात कामे होतील,याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जळगाव: मुख्यमंत्र्यांनी मनपाला जाहीर केलेला २५ कोटींचा निधी अखेर मंजूर झाला आहे. तसे पत्र मनपाला प्राप्त होताच हा निधी कसा खर्च व्हावा? यावरून मनपा सत्ताधारी, विरोधी पक्षांमध्ये खल सुरू झाला आहे. बहुतांश सदस्यांनी तसेच सत्ताधार्‍यांनी रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले आहे. तर भाजपा गटनेते सुनील माळी यांनी मात्र घनकचरा प्रकल्पाचे काम करावे. तसेच नव्याने प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने तो तयार करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेण्याची मागणी केली आहे. ठरावीक भागातच कामे न करता सर्व भागात कामे होतील,याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पथदिवे, शौचालयांची कामे व्हावीत-सुनील माळी
माळी यांनी बुधवारीच याबाबत निवेदन प्रसिद्ध करून भूमिका स्पष्ट केली आहे. कांचननगर, चौघुले प्लॉट, प्रजापतनगर, भुरेमामलेदार प्लॉट, के.सी.पार्क, इंद्रप्रस्थनगर, भोईटेनगर, पिंप्राळा, दादावाडी, निमखेडी रोड, खोटेनगर, कोल्हेनगर,शिवकॉलनी, रामानंदनगर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, पवननगर आदी भागात पाणीपुरवठा, पथदिवे, शौचालये याबाबतची कामे करावीत, अशी मागणी केली आहे.
रस्त्यांची कामेच व्हावीत- अनंत जोशी,
मनसेचे अनंत जोशी म्हणाले की, शहरातील पिण्याच्या पाईपलाईनचा विषय अमृतमधून मार्गी लागला असून भूमिगत गटारींचा विषयही एक-दोन वर्षात अमृत योजनेतूनच मार्गी लागेल. आरोग्याचा विषयही गंभीर आहे. मात्र त्यासाठी सफाई मक्ता देणे, वाहन खरेदी करणे आदी कामे १४व्या वित्त आयोगातून करण्यात येत आहेत. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम होणे आवश्यक आहे. मात्र सर्वच कामे २५ कोटींच्या निधीतून होणे शक्य नाही. त्यातुलनेत शहरातील रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निधी अभावी रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे नागरिक त्रास सहन करत आहेत. त्यांच्या सोयीचा विचार करून ही कामे करणे आवश्यक आहे.
रस्ते, गटारींना प्राधान्य हवे-अश्विनी देशमुख
राष्ट्रवादीच्या अश्विनी देशमुख म्हणाल्या की, रस्ते, गटारी, व महिला शौचालयांना प्राधान्य देण्याची गरज आहे बाजारपेठेत, मुख्य रस्त्यावर महिलांसाठी शौचालय, स्वच्छतागृह नाहीत. ती बांधावीत. तसेच शहरातील एखादा चांगला बगिचा विकसित करण्याची गरज आहे. नवीन वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स टाकण्याची गरज आहे. अमृत योजनेतून ही गरज काही प्रमाणात भागणार असली तरीही लहान आकाराच्या पाईपलाईन त्यात होणार नाहीत. त्याची कामे या निधीतून केली जावीत. मुख्य रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यात यावीत. जे रस्ते बर्‍याच वर्षांपासून झालेले नाहीत, त्यावरून वाहतूक करणार्‍या नागरिकांना पाठीचे, मणक्याचे आजार झाले आहेत. असे रस्ते तसेच जास्तीत जास्त वापराचे रस्ते तातडीने केले जावेत. भुयारी गटारींची योजना अमृतमधून प्रस्तावित असली तरीही ती मोठी योजना असून त्याचा १० टक्के हिस्सा भरणेदेखील मनपाला अवघड होईल. त्यामुळे त्या योजनेस विलंब होणार आहे. त्यामुळे शहरातील गटारींची कामेही केली जावीत.