शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

२५ कोटींच्या विनियोगावरून मतभिन्नता मनपा: सत्ताधारी म्हणतात रस्त्यांची गरज महत्त्वाची; विरोधक म्हणतात घनकचरा प्रकल्प व इतर कामेही घ्या

By admin | Updated: October 21, 2016 00:14 IST

जळगाव: मुख्यमंत्र्यांनी मनपाला जाहीर केलेला २५ कोटींचा निधी अखेर मंजूर झाला आहे. तसे पत्र मनपाला प्राप्त होताच हा निधी कसा खर्च व्हावा? यावरून मनपा सत्ताधारी, विरोधी पक्षांमध्ये खल सुरू झाला आहे. बहुतांश सदस्यांनी तसेच सत्ताधार्‍यांनी रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले आहे. तर भाजपा गटनेते सुनील माळी यांनी मात्र घनकचरा प्रकल्पाचे काम करावे. तसेच नव्याने प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने तो तयार करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेण्याची मागणी केली आहे. ठरावीक भागातच कामे न करता सर्व भागात कामे होतील,याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जळगाव: मुख्यमंत्र्यांनी मनपाला जाहीर केलेला २५ कोटींचा निधी अखेर मंजूर झाला आहे. तसे पत्र मनपाला प्राप्त होताच हा निधी कसा खर्च व्हावा? यावरून मनपा सत्ताधारी, विरोधी पक्षांमध्ये खल सुरू झाला आहे. बहुतांश सदस्यांनी तसेच सत्ताधार्‍यांनी रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले आहे. तर भाजपा गटनेते सुनील माळी यांनी मात्र घनकचरा प्रकल्पाचे काम करावे. तसेच नव्याने प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने तो तयार करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेण्याची मागणी केली आहे. ठरावीक भागातच कामे न करता सर्व भागात कामे होतील,याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पथदिवे, शौचालयांची कामे व्हावीत-सुनील माळी
माळी यांनी बुधवारीच याबाबत निवेदन प्रसिद्ध करून भूमिका स्पष्ट केली आहे. कांचननगर, चौघुले प्लॉट, प्रजापतनगर, भुरेमामलेदार प्लॉट, के.सी.पार्क, इंद्रप्रस्थनगर, भोईटेनगर, पिंप्राळा, दादावाडी, निमखेडी रोड, खोटेनगर, कोल्हेनगर,शिवकॉलनी, रामानंदनगर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, पवननगर आदी भागात पाणीपुरवठा, पथदिवे, शौचालये याबाबतची कामे करावीत, अशी मागणी केली आहे.
रस्त्यांची कामेच व्हावीत- अनंत जोशी,
मनसेचे अनंत जोशी म्हणाले की, शहरातील पिण्याच्या पाईपलाईनचा विषय अमृतमधून मार्गी लागला असून भूमिगत गटारींचा विषयही एक-दोन वर्षात अमृत योजनेतूनच मार्गी लागेल. आरोग्याचा विषयही गंभीर आहे. मात्र त्यासाठी सफाई मक्ता देणे, वाहन खरेदी करणे आदी कामे १४व्या वित्त आयोगातून करण्यात येत आहेत. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम होणे आवश्यक आहे. मात्र सर्वच कामे २५ कोटींच्या निधीतून होणे शक्य नाही. त्यातुलनेत शहरातील रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निधी अभावी रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे नागरिक त्रास सहन करत आहेत. त्यांच्या सोयीचा विचार करून ही कामे करणे आवश्यक आहे.
रस्ते, गटारींना प्राधान्य हवे-अश्विनी देशमुख
राष्ट्रवादीच्या अश्विनी देशमुख म्हणाल्या की, रस्ते, गटारी, व महिला शौचालयांना प्राधान्य देण्याची गरज आहे बाजारपेठेत, मुख्य रस्त्यावर महिलांसाठी शौचालय, स्वच्छतागृह नाहीत. ती बांधावीत. तसेच शहरातील एखादा चांगला बगिचा विकसित करण्याची गरज आहे. नवीन वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स टाकण्याची गरज आहे. अमृत योजनेतून ही गरज काही प्रमाणात भागणार असली तरीही लहान आकाराच्या पाईपलाईन त्यात होणार नाहीत. त्याची कामे या निधीतून केली जावीत. मुख्य रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यात यावीत. जे रस्ते बर्‍याच वर्षांपासून झालेले नाहीत, त्यावरून वाहतूक करणार्‍या नागरिकांना पाठीचे, मणक्याचे आजार झाले आहेत. असे रस्ते तसेच जास्तीत जास्त वापराचे रस्ते तातडीने केले जावेत. भुयारी गटारींची योजना अमृतमधून प्रस्तावित असली तरीही ती मोठी योजना असून त्याचा १० टक्के हिस्सा भरणेदेखील मनपाला अवघड होईल. त्यामुळे त्या योजनेस विलंब होणार आहे. त्यामुळे शहरातील गटारींची कामेही केली जावीत.