शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

२४ धार्मिक नेते पंतप्रधानांच्या भेटीला; भारताच्या आंतरधर्मीय एकतेचा जगाला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 06:57 IST

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कडाडून टीका केली

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : “अनेक दशके तुम्ही इथे (सत्ताधारी बाकांवर) बसला होता, पण आता तुम्ही अनेक दशके तिथे (विरोधी बाकांवर) राहण्याचा संकल्प केला आहे. लोक तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्हाला तिथेच ठेवतील. तुम्ही अधिक उंची गाठाल आणि लवकरच लोकसभेच्या प्रेक्षागृहात दिसाल,” अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली. 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कडाडून टीका केली. “काही विरोधी नेते त्यांच्या संसदीय जागा बदलण्यास उत्सुक आहेत, तर काही राज्यसभेत जाण्याचा विचार करत आहेत,” अशी खोचक टीकाही त्यांनी केली. “विरोधकांनी घेतलेल्या ठरावाचे मी कौतुक करतो. त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दाने माझ्या आणि देशाच्या विश्वासाला पुष्टी दिली आहे की, त्यांनी दीर्घकाळ तेथे (विरोधी पक्षात) राहण्याचा निर्धार केला आहे,” असे मोदी म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन ही काही विधायक सूचना करण्याची चांगली संधी होती; परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ही चांगली संधी गमावली आहे. तुम्ही देशाचा भ्रमनिरास करून निघून गेलात... नेते बदलले, पण तोच सूर कायम आहे,” असे ते म्हणाले. निवडणुकीच्या वर्षात विरोधी पक्ष जनतेला काही संदेश देऊ शकले असते, असे सांगून मोदी म्हणाले की, विरोधकांच्या सध्याच्या स्थितीला काँग्रेस जबाबदार आहे. “काँग्रेसला चांगल्या विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची चांगली संधी होती, पण त्या भूमिकेत ते अपयशी ठरले.

काँग्रेसची ‘रद्द करा’ संस्कृतीकाँग्रेस ‘रद्द करा’ संस्कृतीत इतकी अडकली आहे की ती देशाचे यशही ‘रद्द’ करत आहे. जेव्हा आपण देश तिसरी अर्थव्यवस्था बनत असल्याबद्दल बोलतो तेव्हा काँग्रेसचे सहकारी खिल्ली उडवितात. २०१४ च्या अंतरिम अर्थसंकल्पात तत्कालीन यूपीए सरकारच्या अर्थमंत्र्यांनीही भारत जगातील ११वी अर्थव्यवस्था बनल्याबद्दल अभिमान व्यक्त केला होता आणि पुढील काळात भारताचा जीडीपी अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर नेण्याची योजना आखली होती, याची आठवण करून दिली. आज भारत पाचवी आर्थिक महासत्ता झाल्याचा अभिमान त्यांना वाटत नाही, असे मोदी म्हणाले.

तुम्ही अपयशी ठरलात...nपंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस तेच तेच उत्पादन वारंवार लाँच करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे लवकरच त्यांना ‘दुकान बंद’ करावे लागेल, अशी टीकाही मोदी यांनी केली. “निवडणुकीची वेळ आहे. तुम्ही जरा जास्त मेहनत करून काहीतरी नवीन आणून लोकांना संदेश पाठवायला हवा होता. मात्र, तुम्ही सपशेल अपयशी ठरलात. nमाझी तुम्हाला हीच शिकवण आहे. विरोधकांच्या सद्य:स्थितीला काँग्रेस पक्ष जबाबदार आहे. काँग्रेसला चांगला विरोधक बनण्याची संधी मिळाली. मात्र, गेल्या दहा वर्षांत त्यांची जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरले आहेत,” असे मोदी यांनी निक्षून सांगितले.

राम मंदिराच्या रूपाने परंपरांना नवीन ऊर्जाआमच्या सरकारने पहिल्या कार्यकाळात यूपीएच्या काळातील खड्डे भरण्यात वेळ आणि शक्ती खर्च केली, दुसऱ्या कार्यकाळात नवीन भारताचा पाया घातला आणि तिसऱ्या कार्यकाळात विकसित भारताच्या उभारणीला नवी चालना देईल, असे मोदी म्हणाले. कलम ३७० रद्द करणे, नारी शक्ती वंदन कायद्याची अंमलबजावणी, नवे कायदे आदी सरकारच्या उपलब्धींचा उल्लेख मोदी यांनी केला. दुसऱ्या कार्यकाळात भगवान राम केवळ त्यांच्या घरी परतले नाहीत, तर एक मंदिर बांधले गेले जे भारताच्या महान सांस्कृतिक परंपरांना नवीन ऊर्जा देत राहील,” असे ते म्हणाले.  

इंडियन मायनॉरिटीज फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली २४ धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि सांगितले की, ते भारतातील आंतरधर्मीय एकतेचा संदेश बाहेरच्या जगापर्यंत पोहोचवू इच्छित आहेत. शिष्टमंडळात शीख, जैन, ख्रिश्चन, पारशी समुदायांचे प्रतिनिधी, अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी आणि महाबोधी आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष भिक्खू संघसेना यांचा समावेश होता. आज संसदेत धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेटून आनंद झाला, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदReligious programmeधार्मिक कार्यक्रम