शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२४ धार्मिक नेते पंतप्रधानांच्या भेटीला; भारताच्या आंतरधर्मीय एकतेचा जगाला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 06:57 IST

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कडाडून टीका केली

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : “अनेक दशके तुम्ही इथे (सत्ताधारी बाकांवर) बसला होता, पण आता तुम्ही अनेक दशके तिथे (विरोधी बाकांवर) राहण्याचा संकल्प केला आहे. लोक तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्हाला तिथेच ठेवतील. तुम्ही अधिक उंची गाठाल आणि लवकरच लोकसभेच्या प्रेक्षागृहात दिसाल,” अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली. 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कडाडून टीका केली. “काही विरोधी नेते त्यांच्या संसदीय जागा बदलण्यास उत्सुक आहेत, तर काही राज्यसभेत जाण्याचा विचार करत आहेत,” अशी खोचक टीकाही त्यांनी केली. “विरोधकांनी घेतलेल्या ठरावाचे मी कौतुक करतो. त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दाने माझ्या आणि देशाच्या विश्वासाला पुष्टी दिली आहे की, त्यांनी दीर्घकाळ तेथे (विरोधी पक्षात) राहण्याचा निर्धार केला आहे,” असे मोदी म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन ही काही विधायक सूचना करण्याची चांगली संधी होती; परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ही चांगली संधी गमावली आहे. तुम्ही देशाचा भ्रमनिरास करून निघून गेलात... नेते बदलले, पण तोच सूर कायम आहे,” असे ते म्हणाले. निवडणुकीच्या वर्षात विरोधी पक्ष जनतेला काही संदेश देऊ शकले असते, असे सांगून मोदी म्हणाले की, विरोधकांच्या सध्याच्या स्थितीला काँग्रेस जबाबदार आहे. “काँग्रेसला चांगल्या विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची चांगली संधी होती, पण त्या भूमिकेत ते अपयशी ठरले.

काँग्रेसची ‘रद्द करा’ संस्कृतीकाँग्रेस ‘रद्द करा’ संस्कृतीत इतकी अडकली आहे की ती देशाचे यशही ‘रद्द’ करत आहे. जेव्हा आपण देश तिसरी अर्थव्यवस्था बनत असल्याबद्दल बोलतो तेव्हा काँग्रेसचे सहकारी खिल्ली उडवितात. २०१४ च्या अंतरिम अर्थसंकल्पात तत्कालीन यूपीए सरकारच्या अर्थमंत्र्यांनीही भारत जगातील ११वी अर्थव्यवस्था बनल्याबद्दल अभिमान व्यक्त केला होता आणि पुढील काळात भारताचा जीडीपी अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर नेण्याची योजना आखली होती, याची आठवण करून दिली. आज भारत पाचवी आर्थिक महासत्ता झाल्याचा अभिमान त्यांना वाटत नाही, असे मोदी म्हणाले.

तुम्ही अपयशी ठरलात...nपंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस तेच तेच उत्पादन वारंवार लाँच करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे लवकरच त्यांना ‘दुकान बंद’ करावे लागेल, अशी टीकाही मोदी यांनी केली. “निवडणुकीची वेळ आहे. तुम्ही जरा जास्त मेहनत करून काहीतरी नवीन आणून लोकांना संदेश पाठवायला हवा होता. मात्र, तुम्ही सपशेल अपयशी ठरलात. nमाझी तुम्हाला हीच शिकवण आहे. विरोधकांच्या सद्य:स्थितीला काँग्रेस पक्ष जबाबदार आहे. काँग्रेसला चांगला विरोधक बनण्याची संधी मिळाली. मात्र, गेल्या दहा वर्षांत त्यांची जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरले आहेत,” असे मोदी यांनी निक्षून सांगितले.

राम मंदिराच्या रूपाने परंपरांना नवीन ऊर्जाआमच्या सरकारने पहिल्या कार्यकाळात यूपीएच्या काळातील खड्डे भरण्यात वेळ आणि शक्ती खर्च केली, दुसऱ्या कार्यकाळात नवीन भारताचा पाया घातला आणि तिसऱ्या कार्यकाळात विकसित भारताच्या उभारणीला नवी चालना देईल, असे मोदी म्हणाले. कलम ३७० रद्द करणे, नारी शक्ती वंदन कायद्याची अंमलबजावणी, नवे कायदे आदी सरकारच्या उपलब्धींचा उल्लेख मोदी यांनी केला. दुसऱ्या कार्यकाळात भगवान राम केवळ त्यांच्या घरी परतले नाहीत, तर एक मंदिर बांधले गेले जे भारताच्या महान सांस्कृतिक परंपरांना नवीन ऊर्जा देत राहील,” असे ते म्हणाले.  

इंडियन मायनॉरिटीज फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली २४ धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि सांगितले की, ते भारतातील आंतरधर्मीय एकतेचा संदेश बाहेरच्या जगापर्यंत पोहोचवू इच्छित आहेत. शिष्टमंडळात शीख, जैन, ख्रिश्चन, पारशी समुदायांचे प्रतिनिधी, अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी आणि महाबोधी आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष भिक्खू संघसेना यांचा समावेश होता. आज संसदेत धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेटून आनंद झाला, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदReligious programmeधार्मिक कार्यक्रम