शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

चेंगराचेंगरीत २४ भाविक ठार

By admin | Updated: October 16, 2016 04:39 IST

उत्तर प्रदेशच्या चंदोली आणि वाराणसी जिल्ह्याच्या सीमेवर बाबा जय गुरुदेव जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांची चेंगराचेंगरी होऊन २४ जण मृत्युमुखी, तर ५0हून

चंदौली : उत्तर प्रदेशच्या चंदोली आणि वाराणसी जिल्ह्याच्या सीमेवर बाबा जय गुरुदेव जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांची चेंगराचेंगरी होऊन २४ जण मृत्युमुखी, तर ५0हून अधिक लोक जखमी झाले. शनिवारी हा प्रकार घडला. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून, त्यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५0 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देतानाच, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. (वृत्तसंस्था)अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी- चंदौली जिल्ह्यात गंगेच्या किनाऱ्यावर डोमरी गावात बाबा जय गुरुदेव यांच्या जयंतीनिमित्त दोनदिवसीय जागरूकता शिबिर आयोजित करण्यात आले होते. यासाठी मोठ्या संख्येने भाविक वाराणसीच्या पिली कोठी येथून डोमरीकडे जात होते. रस्त्यात राजघाट पुलावरून लोक जात असताना, अचानक चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी सांगितले की, कार्यक्रमाला दोन ते तीन हजार लोक येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले होते. पण त्याहून अधिक लोक आले. त्यामुळे पुलावर गोंधळ उडाला आणि त्यातून चेंगराचेंगरी झाली. आयोजकांनी येणाऱ्या लोकांची काहीच व्यवस्था न केल्यामुळे हा प्रकार घडला.- आयोजकांनी म्हटले आहे की, आलेले लोक पुलावरून पुढे सरकत असताना, पोलिसांनी त्यांना मागे ढकलण्यास सुरुवात केली. त्यातून गोंधळ उडाला. मागे असलेल्या लोकांमध्ये पूल कोसळल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली.- जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचनाही खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. वाराणसी हा पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ आहे.