शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

२४ तास मोफत वीज : तेलंगण सरकारवर शेतकरीराजा झाला खूश ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 05:59 IST

तेलंगणा सरकारने आपल्या राज्यातील कृषी क्षेत्राला मोफत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन, तेथील शेतकºयांना नववर्षाची अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत.

हैदराबाद : तेलंगणा सरकारने आपल्या राज्यातील कृषी क्षेत्राला मोफत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन, तेथील शेतकºयांना नववर्षाची अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत.या राज्यात गेल्या १० वर्षांत अनेक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने मोठाच दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारच्या २३ लाख कृषिपंपांना बारमाही अखंड वीजपुरवठा करण्यात येईल. सर्व क्षेत्रांतील ग्राहकांना अहोरात्र अखंडित वीजपुरवठा करणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य बनले आहे.येत्या मार्चपर्यंत राज्यातील विजेची मागणी ११ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे असे सरकारच्या वीजपुरवठा कंपनीने म्हटले आहे. कालेश्वरमसहित काही जलसंधारण योजना जून महिन्यापासून अंमलात येणार असून, त्यामुळे विजेची मागणी व पुरवठा यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.पुरेशा प्रमाणात वीज उपलब्धकरून देऊ, हे शेतकºयांना दिलेलेआश्वासन पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी शेजारच्या राज्यांकडूनही आम्ही वीज खरेदी करू, असे मुख्यमंत्री राव यांनी सांगितले. राज्याच्या ऊर्जा विभागाने सध्याची वीजपुरवठा यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी १२,६१० कोटी रुपये आजवर खर्च केले आहेत. (वृत्तसंस्था)अनेक राज्ये शेतकºयांना अखंड व बारमाहीवीज देत असले, तरी ती मोफत नाही.सरकारने २०१४ मध्ये शेतकºयांना सलग ९ तास आणि औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांना अखंडित वीजपुरवठा देण्याचा निर्णय घेतलाजुलै २०१७ मध्ये मेडक, नालगोंडा, करीमनगरयेथील शेतकºयांना प्रायोगिक तत्त्वावर अहोरात्र वीजपुरवठा सुरू केला.नोव्हेंबर २०१७ मध्ये राज्यातील २३ लाख कृषिपंपांना प्रायोगिक तत्त्वावर अहोरात्र वीजपुरवठा सुरू झाला.तेलंगणा राज्य जेव्हा स्थापन झाले, तेव्हा तेथील वीजनिर्मितीची क्षमता ६,७५४ मेगावॅट होती. त्या वेळी वीज खंडित होण्याचे प्रमाणही अधिक होते. मात्र, त्यानंतर वीजनिर्मितीची क्षमता वाढून, ती ८,२७१ मेगावॅट झाली. नजीकच्या काळात ती १३ हजार मेगावॅटपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. 

टॅग्स :Telanganaतेलंगणा