शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

टीबीमुक्तीसाठी २३,३६८ कोटी खर्च, तरी ३४ लाख मृत्यू; भारतात दर ५ मिनिटांत जातो ३ रुग्णांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 09:40 IST

जगातील प्रत्येक चौथा टीबी रुग्ण भारतात आढळतो

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सरकारने टीबीच्या विरोधात लढा देण्यासाठी आणि देशातून क्षयरोग (टीबी) निर्मूलनासाठी गेल्या दशकात तब्बल २३,३६८ कोटी रुपये खर्च करूनही, ३४.५ लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. टीबी निर्मूलनासाठी वार्षिक खर्च २.२३ पट वाढवूनही आजही जगातील प्रत्येक चौथा टीबी रुग्ण भारतात आढळतो आणि दर पाच मिनिटांनी तीनजण टीबीमुळे मृत्युमुखी पडत आहेत.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात संरक्षण, आयुष, आदिवासी व्यवहार, रेल्वे, कामगार, पंचायती राज, कोळसा, अवजड उद्योग, एमएसएमई आणि इतर अनेक मंत्रालयांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ३४७ जिल्ह्यांमध्ये १०० दिवसांची क्षयरोग-मुक्त भारत मोहीम सुरू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२३ मध्ये जगभरातील एकूण टीबी रुग्णांपैकी २६ टक्के रुग्णसंख्या भारतात होती.

यंदाच्याच वर्षी क्षयरोगमुक्तीचे ठेवले आहे लक्ष्य

सरकारने २०२५ पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. तथापि, देशात अजूनही क्षयरोगाचे रुग्ण आणि मृत्यूची संख्या जास्त आहे. महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की, भारत २०२५ पर्यंत खरोखरच क्षयरोगमुक्तीचे ध्येय साध्य करेल का? हा कळीचा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्य