शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

टीबीमुक्तीसाठी २३,३६८ कोटी खर्च, तरी ३४ लाख मृत्यू; भारतात दर ५ मिनिटांत जातो ३ रुग्णांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 09:40 IST

जगातील प्रत्येक चौथा टीबी रुग्ण भारतात आढळतो

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सरकारने टीबीच्या विरोधात लढा देण्यासाठी आणि देशातून क्षयरोग (टीबी) निर्मूलनासाठी गेल्या दशकात तब्बल २३,३६८ कोटी रुपये खर्च करूनही, ३४.५ लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. टीबी निर्मूलनासाठी वार्षिक खर्च २.२३ पट वाढवूनही आजही जगातील प्रत्येक चौथा टीबी रुग्ण भारतात आढळतो आणि दर पाच मिनिटांनी तीनजण टीबीमुळे मृत्युमुखी पडत आहेत.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात संरक्षण, आयुष, आदिवासी व्यवहार, रेल्वे, कामगार, पंचायती राज, कोळसा, अवजड उद्योग, एमएसएमई आणि इतर अनेक मंत्रालयांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ३४७ जिल्ह्यांमध्ये १०० दिवसांची क्षयरोग-मुक्त भारत मोहीम सुरू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२३ मध्ये जगभरातील एकूण टीबी रुग्णांपैकी २६ टक्के रुग्णसंख्या भारतात होती.

यंदाच्याच वर्षी क्षयरोगमुक्तीचे ठेवले आहे लक्ष्य

सरकारने २०२५ पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. तथापि, देशात अजूनही क्षयरोगाचे रुग्ण आणि मृत्यूची संख्या जास्त आहे. महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की, भारत २०२५ पर्यंत खरोखरच क्षयरोगमुक्तीचे ध्येय साध्य करेल का? हा कळीचा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्य