शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आखाड्यात २२९३ राजकीय पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:40 IST

चित्रविचित्र नावे : फेब्रुवारी-मार्चमध्ये १४९ नव्या पक्षांची नोंदणी

संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात यंदा २२९३ राजकीय पक्ष उतरले असून, निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजे ९ मार्चपर्यंतची ही आकडेवारी निवडणूक आयोगाने जारी केली आहे. सात मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि ५९ मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांचा यात समावेश आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात १४९ नव्या पक्षांची नोंदणी झाली आहे. भरोसा पार्टी, सबसे बडी पार्टी आणि राष्ट्रीय साफ नीती पार्टी यासारखी चित्रविचित्र नावेही या यादीत आहेत.

देशात २१४३ राजकीय पक्षांची नोंद झाली आहे. यातील ५८ नव्या राजकीय पक्षांची नोंद गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकांच्या वेळी झाली होती.

नोंदविण्यात आलेल्या पक्षांमध्ये बहुजन आजाद पार्टी (बिहार), सामूहिक एकता पार्टी (उत्तर प्रदेश), राष्ट्रीय साफ नीती पार्टी (राजस्थान), सबसे बडी पार्टी (दिल्ली), भरोसा पार्टी (तेलंगणा), न्यू जनरेशन पार्टी (तामिळनाडू) यांचा समावेश आहे. ज्यांची नोंदणी आहे. परंतु मान्यता नाहीत, अशा पक्षांना निश्चित चिन्हे दिली जात नाहीत. त्यांना आयोगाच्या समितीने सुचविलेल्या चिन्हांची निवड करावी लागते. सध्या अशा पद्धतीची ८४ चिन्हे आहेत. 

महाराष्ट्रातूनही पाच नवे पक्षमहाराष्ट्रातूनही पाच राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. यामध्ये इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टी (नवी मुंबई), आॅल इंडियन रिपब्लिक पार्टी (चंद्रपूर), अखिल भारतीय एकता पार्टी (उस्मानाबाद), महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष (मुंबई) आणि दक्ष पार्टी (मुंबई) या पक्षांचा समावेश आहे.