शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले २१३ नवे राजकीय पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:19 IST

संख्या गेली ६७७ वर; १० वर्षांत ३०० नव्या पक्षांची झाली नोंदणी

नवी दिल्ली : सन २००९ च्या तुलनेत आताच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल २१३ नवे राजकीय पक्ष उतरल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. गेल्या १० वर्षांत निवडणूक रिंगणात नव्याने उतरलेल्या राजकीय पक्षांच्या संख्येत सुमारे ३०० ने वाढ झाली आहे.

आयोगाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सन २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्षांची संख्या ३६८ होती. सन २०१४ मध्ये ती वाढून ४६४ झाली व आताच्या लोकसभा निवडणुकीत ती ६७७ वर पोहोचली. नव्या पक्षांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेली ८४ टक्के वाढ ही लक्षणीय आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुुकीच्या आधी नव्या राजकीय पक्षांची नोंदणी करण्याचे जणू पेवच फुटले. एप्रिल २०१८पर्यंत निवडणूक आयोगाकडे सुमारे दोन हजार अमान्यताप्राप्त पक्ष नोंदलेले होते. त्यानंतर डिसेंबरपर्यंत आणखी २३८ नवे पक्षांची नोंदणी झाली आणि आणखी २४ पक्षांनी नोदणीसाठी अर्ज केले.मिळणारी मते मात्र किरकोळनिवडणुकीत उमेदवार उभे करणाºया अशा पक्षांची संख्या खूप मोठी असली व ती सतत वाढत असली तरी त्यांची मतांची टक्केवारी जेमतेम एक टक्का आहे. आयोगाच्या एका अधिकाºयाच्या मतानुसार भारतातील पक्ष नोंदणीची प्रक्रिया खूपच सोपी व सुलभ असणे हे या मोठ्या संख्येचे एक कारण आहे. जाणकारांना मात्र राजकीय पक्ष काडण्यामागे केवळ निवडणुका लढविणे हेच कारण असल्याचे वाटत नाही. त्यांच्या मते अनेक पक्ष काळा पैसा पांढरा करण्यासाठी, देणग्या जमविण्यासाठी व प्राप्तिकरात सूट मिळविण्यासाठी काढले जातात.