शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले २१३ नवे राजकीय पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:19 IST

संख्या गेली ६७७ वर; १० वर्षांत ३०० नव्या पक्षांची झाली नोंदणी

नवी दिल्ली : सन २००९ च्या तुलनेत आताच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल २१३ नवे राजकीय पक्ष उतरल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. गेल्या १० वर्षांत निवडणूक रिंगणात नव्याने उतरलेल्या राजकीय पक्षांच्या संख्येत सुमारे ३०० ने वाढ झाली आहे.

आयोगाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सन २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्षांची संख्या ३६८ होती. सन २०१४ मध्ये ती वाढून ४६४ झाली व आताच्या लोकसभा निवडणुकीत ती ६७७ वर पोहोचली. नव्या पक्षांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेली ८४ टक्के वाढ ही लक्षणीय आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुुकीच्या आधी नव्या राजकीय पक्षांची नोंदणी करण्याचे जणू पेवच फुटले. एप्रिल २०१८पर्यंत निवडणूक आयोगाकडे सुमारे दोन हजार अमान्यताप्राप्त पक्ष नोंदलेले होते. त्यानंतर डिसेंबरपर्यंत आणखी २३८ नवे पक्षांची नोंदणी झाली आणि आणखी २४ पक्षांनी नोदणीसाठी अर्ज केले.मिळणारी मते मात्र किरकोळनिवडणुकीत उमेदवार उभे करणाºया अशा पक्षांची संख्या खूप मोठी असली व ती सतत वाढत असली तरी त्यांची मतांची टक्केवारी जेमतेम एक टक्का आहे. आयोगाच्या एका अधिकाºयाच्या मतानुसार भारतातील पक्ष नोंदणीची प्रक्रिया खूपच सोपी व सुलभ असणे हे या मोठ्या संख्येचे एक कारण आहे. जाणकारांना मात्र राजकीय पक्ष काडण्यामागे केवळ निवडणुका लढविणे हेच कारण असल्याचे वाटत नाही. त्यांच्या मते अनेक पक्ष काळा पैसा पांढरा करण्यासाठी, देणग्या जमविण्यासाठी व प्राप्तिकरात सूट मिळविण्यासाठी काढले जातात.