शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

२०२४ ची तयारी? BRS च्या सभेत एकत्र येणार विरोधक, तेलंगणात एकाच व्यासपीठावरुन केजरीवाल-अखिलेश बरसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 16:09 IST

तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची (BRS) बुधवारी खम्मम शहरात जाहीर सभा होणार आहे

नवी दिल्ली-

तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची (BRS) बुधवारी खम्मम शहरात जाहीर सभा होणार आहे, ज्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकपा) नेते के डी राजा देखील सामील होतील.

तेलंगणातील ही जाहीर सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे कारण तेलंगणा राष्ट्र समितीने 'बीआरएस' असं नाव बदलल्यानंतर होणारी ही पहिलीच जाहीर सभा आहे. त्यात बीआरएस, आम आदमी पार्टी (आप), समाजवादी पार्टी (एसपी) यांच्यासह विविध विरोधी पक्षांचीही हजेरी असणार आहे. डाव्या पक्षांचे नेते व्यासपीठावर एकत्र दिसतील.

यदाद्री येथील भगवान लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरालाही भेट देणारबीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि इतर नेते बुधवारी खम्ममला जाण्यापूर्वी हैदराबादजवळील यदाद्री येथील भगवान लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराला भेट देतील. राव सरकारने नुकतंच मंदिराचं नूतनीकरण केलं आहे. वरिष्ठ बीआरएस नेते आणि माजी खासदार बी विनोद कुमार म्हणाले की, सभेसाठी हजर राहणारे नेते हैदराबादपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या खम्मममध्ये तेलंगणा सरकारच्या नेत्र तपासणी कार्यक्रमाच्या कांती वेलुगुच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.

एनडीए सरकारमध्ये धर्मनिरपेक्षता-समाजवादाची कमतरता भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि उदारमतवादासह संविधानाचा आत्मा कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात पर्यायी राजकारण आणण्यासाठी बीआरएस प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता खम्मम जाहीर सभेकडे विरोधी ऐक्याचे पाऊल म्हणून पाहिले जाऊ शकतं का, असं विचारलं असता कुमार म्हणाले की ही केवळ पुनरावृत्ती होणारी आघाडी नाही आणि बीआरएस हा देशाला नवा पर्याय ठरू शकतो असाही दावा करण्यात आला आहे. 

भाजपाचा 'केसीआर'वर हल्लाबोलदरम्यान, भाजपच्या प्रदेश युनिटचे अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार यांनी मुख्यमंत्री केसीआर राव यांच्यावर निशाणा साधला. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना यादद्री मंदिरात नेल्याबद्दल टिका केली. "मंदिरे या कुटुंबासाठी उद्योग केंद्रे बनली आहेत. हिंदू मंदिर ही गुंतवणुकीची संधी आहे हे दाखवण्यासाठी केसीआर राव बीआरएस खम्ममच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नेत आहेत का?". असा सवाल उपस्थित करत भाजपा खासदारानं टीका केली.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAkhilesh Yadavअखिलेश यादव