शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

२००० वर्षांपूर्वीच्या ममीचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जतन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 04:14 IST

तेलंगणा राज्य संग्रहालयातील दोन हजार वर्षांपेक्षाही जुन्या इजिप्शियन ममीला नष्ट होण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू

हैदराबाद : तेलंगणा राज्य संग्रहालयातील दोन हजार वर्षांपेक्षाही जुन्या इजिप्शियन ममीला नष्ट होण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू असून पुरातत्त्व आणि संग्रहालय विभागातर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार नष्ट होत असलेल्या ममीसाठी भारतात प्रथमच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. यामध्ये सीटी स्कॅन आणि एक्सरे चाचणीचाही समावेश आहे. १९२० साली सहावा निजाम मीर महबूब अली खान यांना ही ममी मिळाली होती. त्यांचे पुत्र आणि अखेरचे निजाम मीर उस्मान अली खान यांनी पुढे ही ममी संग्रहालयाच्या सुपूर्द केली. १९३० पासून ती संग्रहालयात आहे. युवा विकास, पर्यटन न संस्कृती विभागाचे सचिव बी. व्यंकटेशम यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांना यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, स्कॅनिंग केल्यावर ही ममी सुमारे २५ वर्षांच्या तरुणीची असून तिची लांबी १३६ सेंटीमीटर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ममीच्या बचावासाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा प्रयोग भारतात एखादी ममी अथवा मानवी अवशेषांच्या संवर्धनासाठी प्रथमच करण्यात आल्याचा दावा या प्रकल्पाचे वारसा संरक्षण सल्लागार विनोद डॅनियल यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, भविष्यात देशात अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरही ममींचे जतन करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. (वृत्तसंस्था)>टोलेमी युगातील ममीदेशातील विविध संग्रहालयांमध्ये जतन करण्यात आलेल्या इजिप्तच्या फक्त सहा ममींपैकी ही एक आहे. ही ममी १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलीची असून इ.स.पूर्व ३०० ते १०० वर्षांपूर्वीच्या टोलेमी युगातील ती असावी, असा अंदाज यापूर्वी बांधण्यात आला होता.>अधिक तापमानाचा फटका ४अधिक उष्णता, प्रकाश, तापमान, दमटपणा, किडे आणि प्राणवायूमुळे ही ममी नष्ट होण्याच्या मार्गावर होती. परंतु आता नवीन आॅक्सिजनरहित पेटीमुळे विषाणु आणि किड्यांचा प्रादुर्भाव होणार नाही तसेच आर्द्रताही एका ठराविक पातळीवर नियंत्रित राहील, असे डॅनियल यांनी सांगितले. ४सीटी स्कॅन आणि एक्स रे काढल्यानंतर ही ममी पुन्हा संग्रहालयात आणून नव्याने तयार करण्यात आलेल्या पेटीत शो केसमध्ये ठेवण्यात आली. ममीवर प्रक्रिया करताना तिचा मेंदू आणि मुख्य अवयव काढून टाकण्यात आले होते. बरगड्या पूर्णपणे तुटल्या होत्या तर पाठीचा कणा आणि एक मनगट किंचित निखळले होते. ४ममीला नष्ट होऊ नये म्हणून आॅक्सिजनरहित पेटीत ठेवण्यात आले आहे.