शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

छत्तीसगडच्या गोशाळेत २00 गार्इंचा मृत्यू?  उपासमारीमुळे  गाई मेल्याचा स्थानिकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:49 IST

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील गोशाळेत झालेल्या गायींच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी गोशाळेच्या संचालकाला अटक केली आहे. हा संचालक भारतीय जनता पार्टीचा नेता आहे.

दुर्ग :  छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील गोशाळेत झालेल्या गायींच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी गोशाळेच्या संचालकाला अटक केली आहे. हा संचालक भारतीय जनता पार्टीचा नेता आहे. त्या गोशाळेत २७ गायींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी गावकºयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही काळात तिथे २00 हून अधिक गायी मरण पावल्या आहेत. छत्तीसगडमधील गोसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. गोशाळेची भिंत कोसळून २७ गायींचा मृत्यू झाला, असा दावा संचालक हरीश वर्मा याने केला आहे. तो जामुल नगरपालिकेचा उपाध्यक्ष आहे. गावकºयांनी आरोप केला की, तिथे रात्री जेसीबी मशिन आणल्या जात होत्या आणि जवळच खड्डे खणून त्यात अनेक गायी पुरण्यात आल्या आहेत.  गोसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीनुसार गोशाळेत प्रचंड अस्वच्छता होती. यामुळे प्रचंड दुर्गंधी व रोगराईही पसरली होती. दुर्गचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील धमधा विकासखंड अंतर्गत येणाºया राजपूर गावातील गोशाळेत गेल्या तीन दिवसांत २७ गायींचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ गायींच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पशुवैद्यांचे पथक चौकशीसाठी राजपूरला पाठवण्यात आले. उपविभागीय दंडाधिकाºयांनीही घटनास्थळाचा दौरा केला. पूर्ण चौकशीनंतरच जनावरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.  संचालक हरीश वर्माने सांगितले की, १५ आॅगस्ट रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे गोशाळेतील ९0 फूट लांब भिंत कोसळली. या दुर्घटनेत जखमी झाल्याने २७ गायींचा तीन दिवसांत मृत्यू झाला. जखमी गायींवर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)उपासमारीने मृत्यू : काँग्रेसकाँग्रेसने गायींचे मृत्यू उपासमारीमुळे झाल्याचा आरोप केला आहे. छत्तीसगड काँग्रेसचे प्रवक्ते आर. पी. सिंह म्हणाले की, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चारा व पाणी देण्यात न आल्यानेच गायींचा मृत्यू झाला आहे. या गोशाळेत प्रचंड अस्वच्छता आहे, ज्यामुळे आतापर्यंत या गोशाळेमध्ये सुमारे ३00 गायी मरण पावल्या आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.