शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

२० हजार विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशासाठी राज्यभरातून ३० हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ १० हजार विद्यार्थ्यांचीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून अद्याप २० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्यानंतरही, प्रवेशाची पहिली फेरीही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे दुसर्‍या फेरीच्या तारखा जाहीर कधी होणार आणि प्रवेश प्रक्रिया राबवली कधी जाणार याबाबत पालक प्रश्न उपस्थित करत आहेत.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशासाठी राज्यभरातून ३० हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ १० हजार विद्यार्थ्यांचीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून अद्याप २० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्यानंतरही, प्रवेशाची पहिली फेरीही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे दुसर्‍या फेरीच्या तारखा जाहीर कधी होणार आणि प्रवेश प्रक्रिया राबवली कधी जाणार याबाबत पालक प्रश्न उपस्थित करत आहेत.
दरम्यान पुण्यातील पहिली प्रवेश फेरी रखडलेली असल्याने ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच दुसर्‍या फेरीचे नियोजन जाहीर होणार आहे. पुणे विभागाचा परिणाम राज्यांतील विद्यार्थ्यांवर होणार आहे. दुसरीकडे लातूर, अमरावती, नागपूर, नाशिक, पनवेल, कोल्हापूर या विभागांची प्रवेशाची पहिली फेरी ही पूर्ण झाली आहे. या विभागांकडून दुसर्‍या फेरीची तारीख त्वरीत जाहीर करावी ही मागणी होत आहे. मात्र सर्व विभागातील पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेरी जाहीर करता येत नसल्याने अद्यापही २० हजार विद्यार्थी आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्राथमिक व पहिलीच्या प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षित जागेवर दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंबंधी उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यासाठी राज्यातून या जागांसाठी ३० हजार अर्ज आले होते. त्यातील पहिल्या फेरीसाठी १० हजार अर्जांची प्रक्रिया सुरू झाली आहे.