शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

पंधरा दिवस लोटले, अरुणाचल प्रदेशातील दोन बेपत्ता जवानांचा थांगपत्ता लागेना; धाकधुक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:22 IST

या भागात जोरदार पाऊस सुरु आहे यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत देखील आपल्या सैनिकांना शोधण्यासाठी जवान दिवसरात्र एक करत आहेत. 

अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या महिन्याच्या २८ तारखेला लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाले होते. भारतीय सैन्यदलाने दिवसरात्र एक करून त्यांचा गेल्या १५ दिवसांपासून शोध सुरु ठेवला आहे. परंतू, अद्याप ते सापडले नसल्याने धाकधुक वाढली आहे. सैन्य दलाने रविवारी याबाबत माहिती दिली आहे. शोधमोहिमेला अद्याप यश आलेले नाही, आपले सैनिक सापडलेले नाहीत, असे यामध्ये म्हटले आहे. 

पीआरओ तेजपुर कर्नल अमरिंदर वालिया यांनी ही माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशच्या अंजॉ जिल्ह्यात देशाच्या सुरक्षेसाठी अतिमहत्वाच्या असलेल्या भागातील चौकीवर हे दोन जवान तैनात होते. वालिया यांनी सांगितले की, नायक प्रकाश सिंह आणि लांस नायक हरेंद्र सिंह हे दोघे बेपत्ता झाले आहेत. ते चुकून नदीत पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या शोधासाठी गस्ती विमाने आणि डॉग स्क्वॉडसह भारतीय जवान तेनात करण्यात आले आहेत. अद्याप या दोघांचा शोध लागलेला नाही. 

गेल्या दोन आठवड्यांपासून दिवस रात्र शोध मोहिम सुरु आहे. सैन्य दलाने या घटनेवर 'कोर्ट ऑफ इंक्वायरी' बसविली आहे. हे दोन्ही सैनिक उत्तराखंडचे राहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना दररोज इथल्या परिस्थितीची माहिती दिली जात आहे. चीनच्या सीमेवरील हा भाग गढ़वाल रेजिमेंटच्या ताब्यात आहे. हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. एलएसीजवळ असल्याने कोलकाताहून या रेजिमेंटच्या ईस्टर्न कमांडकडून येथील देखरेख केली जाते. या भागात जोरदार पाऊस सुरु आहे यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत देखील आपल्या सैनिकांना शोधण्यासाठी जवान दिवसरात्र एक करत आहेत. 

या भागात अशी अनेक पोस्ट आहेत जिथे चीनचे सैन्य अत्यंत जवळ आहे. चीन नेहमी अरुणाचल प्रदेशवरून हा भाग आपला असल्याचा दावा ठोकत असतो. हा भाग डोंगराळ आणि तीव्र उताराचा व जंगलांचा आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीन