शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पंधरा दिवस लोटले, अरुणाचल प्रदेशातील दोन बेपत्ता जवानांचा थांगपत्ता लागेना; धाकधुक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:22 IST

या भागात जोरदार पाऊस सुरु आहे यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत देखील आपल्या सैनिकांना शोधण्यासाठी जवान दिवसरात्र एक करत आहेत. 

अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या महिन्याच्या २८ तारखेला लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाले होते. भारतीय सैन्यदलाने दिवसरात्र एक करून त्यांचा गेल्या १५ दिवसांपासून शोध सुरु ठेवला आहे. परंतू, अद्याप ते सापडले नसल्याने धाकधुक वाढली आहे. सैन्य दलाने रविवारी याबाबत माहिती दिली आहे. शोधमोहिमेला अद्याप यश आलेले नाही, आपले सैनिक सापडलेले नाहीत, असे यामध्ये म्हटले आहे. 

पीआरओ तेजपुर कर्नल अमरिंदर वालिया यांनी ही माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशच्या अंजॉ जिल्ह्यात देशाच्या सुरक्षेसाठी अतिमहत्वाच्या असलेल्या भागातील चौकीवर हे दोन जवान तैनात होते. वालिया यांनी सांगितले की, नायक प्रकाश सिंह आणि लांस नायक हरेंद्र सिंह हे दोघे बेपत्ता झाले आहेत. ते चुकून नदीत पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या शोधासाठी गस्ती विमाने आणि डॉग स्क्वॉडसह भारतीय जवान तेनात करण्यात आले आहेत. अद्याप या दोघांचा शोध लागलेला नाही. 

गेल्या दोन आठवड्यांपासून दिवस रात्र शोध मोहिम सुरु आहे. सैन्य दलाने या घटनेवर 'कोर्ट ऑफ इंक्वायरी' बसविली आहे. हे दोन्ही सैनिक उत्तराखंडचे राहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना दररोज इथल्या परिस्थितीची माहिती दिली जात आहे. चीनच्या सीमेवरील हा भाग गढ़वाल रेजिमेंटच्या ताब्यात आहे. हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. एलएसीजवळ असल्याने कोलकाताहून या रेजिमेंटच्या ईस्टर्न कमांडकडून येथील देखरेख केली जाते. या भागात जोरदार पाऊस सुरु आहे यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत देखील आपल्या सैनिकांना शोधण्यासाठी जवान दिवसरात्र एक करत आहेत. 

या भागात अशी अनेक पोस्ट आहेत जिथे चीनचे सैन्य अत्यंत जवळ आहे. चीन नेहमी अरुणाचल प्रदेशवरून हा भाग आपला असल्याचा दावा ठोकत असतो. हा भाग डोंगराळ आणि तीव्र उताराचा व जंगलांचा आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीन