शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवस लोटले, अरुणाचल प्रदेशातील दोन बेपत्ता जवानांचा थांगपत्ता लागेना; धाकधुक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:22 IST

या भागात जोरदार पाऊस सुरु आहे यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत देखील आपल्या सैनिकांना शोधण्यासाठी जवान दिवसरात्र एक करत आहेत. 

अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या महिन्याच्या २८ तारखेला लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाले होते. भारतीय सैन्यदलाने दिवसरात्र एक करून त्यांचा गेल्या १५ दिवसांपासून शोध सुरु ठेवला आहे. परंतू, अद्याप ते सापडले नसल्याने धाकधुक वाढली आहे. सैन्य दलाने रविवारी याबाबत माहिती दिली आहे. शोधमोहिमेला अद्याप यश आलेले नाही, आपले सैनिक सापडलेले नाहीत, असे यामध्ये म्हटले आहे. 

पीआरओ तेजपुर कर्नल अमरिंदर वालिया यांनी ही माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशच्या अंजॉ जिल्ह्यात देशाच्या सुरक्षेसाठी अतिमहत्वाच्या असलेल्या भागातील चौकीवर हे दोन जवान तैनात होते. वालिया यांनी सांगितले की, नायक प्रकाश सिंह आणि लांस नायक हरेंद्र सिंह हे दोघे बेपत्ता झाले आहेत. ते चुकून नदीत पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या शोधासाठी गस्ती विमाने आणि डॉग स्क्वॉडसह भारतीय जवान तेनात करण्यात आले आहेत. अद्याप या दोघांचा शोध लागलेला नाही. 

गेल्या दोन आठवड्यांपासून दिवस रात्र शोध मोहिम सुरु आहे. सैन्य दलाने या घटनेवर 'कोर्ट ऑफ इंक्वायरी' बसविली आहे. हे दोन्ही सैनिक उत्तराखंडचे राहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना दररोज इथल्या परिस्थितीची माहिती दिली जात आहे. चीनच्या सीमेवरील हा भाग गढ़वाल रेजिमेंटच्या ताब्यात आहे. हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. एलएसीजवळ असल्याने कोलकाताहून या रेजिमेंटच्या ईस्टर्न कमांडकडून येथील देखरेख केली जाते. या भागात जोरदार पाऊस सुरु आहे यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत देखील आपल्या सैनिकांना शोधण्यासाठी जवान दिवसरात्र एक करत आहेत. 

या भागात अशी अनेक पोस्ट आहेत जिथे चीनचे सैन्य अत्यंत जवळ आहे. चीन नेहमी अरुणाचल प्रदेशवरून हा भाग आपला असल्याचा दावा ठोकत असतो. हा भाग डोंगराळ आणि तीव्र उताराचा व जंगलांचा आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीन