१९... सारांश... जोड
By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST
शेततळ्यांना मंजुरी देण्याची मागणी
१९... सारांश... जोड
शेततळ्यांना मंजुरी देण्याची मागणीनरखेड : तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. विहिरी कोरड्या पडत असल्याने उन्हाळ्यात संत्र्याची छोटी झाडे पाण्याअभावी जगविणे शक्य होत नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तालुक्यात शेततळ्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.***बंधारे दुरुस्ती कामे सुरू कराकाटोल : तालुक्यातील कोल्हापुरी व साठवणूक बंधाऱ्यांची दैनावस्था झाली आहे. शिवाय, तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने रोजगार मिळत नाही. मजुरांना काम व शेतकऱ्यांना ओलितासाठी पाणी मिळावे यासाठी बंधारे दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. ***फ्लाय ॲशची वाहतूक बंद कराखापरखेडा : वीज केंद्रातील राख ट्रकद्वारे वाहून नेली जाते. ट्रकमधील राख रोडच्या मध्यभागी पडत असल्याने तसेच ती इतर वाहनांमुळे उडत असल्याने अपघात होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील राखेची वाहतूक बंद करण्याची मागणी केली जात आहे.***ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दैनावस्थामेंढला : परिसरातील वर्धा व जाम नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. या रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याने रस्ते खराब झाले आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांना त्रास होत असल्याचे रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. ***