शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

दादर, कल्याण, ठाकुर्ली, अंधेरीसह १९ स्थानकांचा करणार पुनर्विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 06:09 IST

रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती, चार वर्षांत २४९४ कोटींचा झाला खर्च 

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रातील १९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यासाच्या आधारावर या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यात मुंबई महानगर क्षेत्रातील दादरसह ७ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तर राज्यातील पुणे, नाशिक, नांदेड, अमरावती, भुसावळ या प्रमुख रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास होणार आहे.

रेल्वे, दळणवळण व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितले की, या स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येईल. या कामांमध्ये महत्त्वाची शहरे आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना यात प्राधान्य देण्यात येणार आहे. इम्रान प्रतापगढी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.

या स्थानकांचे काम यापूर्वीच हातीअजनी, जालना, औरंगाबाद, मुंबई सेंट्रल, ठाणे व नागपूर रेल्वेस्थानके यापूर्वीच मेजर अपग्रेडेशन ऑफ स्टेशन्स पुनर्विकासासाठी हाती घेतली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाला आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कॅबिनेट कमिटीने यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे.

या स्थानकांचा होणार पुनर्विकासअकोला, अंधेरी, अमरावती, बांद्रा टर्मिनस, भुसावळ, बोरिवली, दादर, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणावळा, मिरज, नांदेड, नाशिक रोड, पुणे, साईनगर शिर्डी, शिवाजीनगर पुणे, ठाकुर्ली, वर्धा रेल्वेस्थानकांचा पुनर्विकासासाठी अभ्यास करण्यात येणार आहे. 

राज्यातील १०८ रेल्वेस्थानकांचा समावेशnमहाराष्ट्रातील १०८ रेल्वेस्थानकांचा यापूर्वीच आदर्श स्थानकांच्या योजनेत विकास करण्यात आलेला आहे. देशभरात आदर्श रेल्वे स्थानक योजनेत १२५२ स्थानकांची निवड करण्यात आली. nत्यापैकी १२१८ स्थानके आजवर विकसित करण्यात आली आहेत. उर्वरित स्थानकांचा जून २०२३ पर्यंत विकास करण्यात येणार आहे. nग्राहक सुविधा योजनेत महाराष्ट्राला रेल्वेकडून सिंहाचा वाटा मिळाला आहे. चार वर्षांत २४९४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे