शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

बिहारमध्ये १८ लोकांचा विषारी दारूने मृत्यू? कुटुंबीयांचा दावा प्रशासनाला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 06:11 IST

बिहारमध्ये होळीच्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यांत किमान दीड डझनपेक्षा जास्त लोकांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला आहे.

एस. पी. सिन्हा, लाेकमत न्यूज नेटवर्क

पाटणा :बिहारमध्ये होळीच्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यांत किमान दीड डझनपेक्षा जास्त लोकांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला आहे. बांका, भागलपूर, मधेपुरातील घटना विषारी दारूशी जोडून पाहिल्या जात आहेत. अनेक मृतांच्या कुटुंबीयांनी व स्थानिकांनी विषारी दारू पिण्यात आल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा दावा केला असला तरी पोलीस आणि प्रशासनाने तो फेटाळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बांका जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांत महिलेसह ८ जणांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला, तर अनेक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक अरविंद कुमार गुप्ता म्हणाले की, कोणाचेही शवविच्छेदन करा, अशा सूचना नाहीत. अमरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लौसा गावातही एकाचा मृत्यू झाला.

भागलपूर जिल्ह्यात होळीच्या दिवशी विषारी दारू पिण्यात आल्यामुळे ७ जणांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला. अनेक जण आजारी आहेत. मृतांच्या कुटुंबीयांचे म्हणणे असे की, होळीच्या दिवशी ते दारू प्यायले होते. अभिषेक कुमार उर्फ छोटू साह (२४) याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली आहे. उपपोलीस अधीक्षक प्रकाश कुमार म्हणाले की, आतापर्यंत ३ मृत्यूंना दुजोरा मिळाला असला तरी हे मृत्यू कसे झाले याची स्पष्ट माहिती मिळालेली नाही. लोकांचे म्हणणे असे की, हे मृत्यू विषारी दारूमुळे झाले आहेत. मधेपुरा जिल्ह्यात ४ जणांचा संदिग्ध मृत्यू झाला असून हे मृत्यूही विषारी दारूमुळे झाल्याचे सांगितले. 

टॅग्स :Biharबिहार