शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

बिहारमध्ये १८ लोकांचा विषारी दारूने मृत्यू? कुटुंबीयांचा दावा प्रशासनाला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 06:11 IST

बिहारमध्ये होळीच्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यांत किमान दीड डझनपेक्षा जास्त लोकांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला आहे.

एस. पी. सिन्हा, लाेकमत न्यूज नेटवर्क

पाटणा :बिहारमध्ये होळीच्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यांत किमान दीड डझनपेक्षा जास्त लोकांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला आहे. बांका, भागलपूर, मधेपुरातील घटना विषारी दारूशी जोडून पाहिल्या जात आहेत. अनेक मृतांच्या कुटुंबीयांनी व स्थानिकांनी विषारी दारू पिण्यात आल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा दावा केला असला तरी पोलीस आणि प्रशासनाने तो फेटाळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बांका जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांत महिलेसह ८ जणांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला, तर अनेक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक अरविंद कुमार गुप्ता म्हणाले की, कोणाचेही शवविच्छेदन करा, अशा सूचना नाहीत. अमरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लौसा गावातही एकाचा मृत्यू झाला.

भागलपूर जिल्ह्यात होळीच्या दिवशी विषारी दारू पिण्यात आल्यामुळे ७ जणांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला. अनेक जण आजारी आहेत. मृतांच्या कुटुंबीयांचे म्हणणे असे की, होळीच्या दिवशी ते दारू प्यायले होते. अभिषेक कुमार उर्फ छोटू साह (२४) याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली आहे. उपपोलीस अधीक्षक प्रकाश कुमार म्हणाले की, आतापर्यंत ३ मृत्यूंना दुजोरा मिळाला असला तरी हे मृत्यू कसे झाले याची स्पष्ट माहिती मिळालेली नाही. लोकांचे म्हणणे असे की, हे मृत्यू विषारी दारूमुळे झाले आहेत. मधेपुरा जिल्ह्यात ४ जणांचा संदिग्ध मृत्यू झाला असून हे मृत्यूही विषारी दारूमुळे झाल्याचे सांगितले. 

टॅग्स :Biharबिहार