शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मुंबईसह महाराष्ट्रातील १८ शहरे प्रदूषित

By admin | Updated: April 29, 2015 01:47 IST

सर्व प्रकारचे प्रयत्न केल्यानंतरही सरकारला वायुप्रदूषणाला आळा घालण्यात अपयश आले आहे. महानगरानंतर आता मध्यम आणि छोट्या शहरांमध्येही या वायुप्रदूषणाचा कहर वाढत चालला आहे.

नितीन अग्रवाल ल्ल नवी दिल्लीसर्व प्रकारचे प्रयत्न केल्यानंतरही सरकारला वायुप्रदूषणाला आळा घालण्यात अपयश आले आहे. महानगरानंतर आता मध्यम आणि छोट्या शहरांमध्येही या वायुप्रदूषणाचा कहर वाढत चालला आहे. बहुतांश शहरांमधील हवा मापदंडापेक्षा अधिक प्रदूषित असल्याची कबुली केंद्र सरकारने दिली आहे. वायुप्रदूषणाचा स्तर वाढलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरसह १८ शहरांचा समावेश आहे.महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई, चंद्रपूर, अमरावती, अकोला, डोंबिवली/अंबरनाथ, जळगाव, बदलापूर, नवी मुंबई, उल्हासनगर, पुणे, लातूर, जालना, नागदा, नासिक, सोलापूर, सांगली, औरंगाबाद आणि ठाणे या शहरांमधील वायुप्रदूषण मापदंडापेक्षा कितीतरी अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.जावडेकर म्हणाले, २०१२ मध्ये देशभरातील १७५ शहरांमधून गोळा करण्यात आलेल्या वायुप्रदूषणाच्या आकडेवारीनुसार, १२५ शहरांमध्ये १० मायक्रॉनपेक्षाही लहान वायुकणांचे प्रमाण (पर्टिक्युलेट मायक्रॉन - पीएम) मापदंडापेक्षा जास्त आहे. १२५ पैकी १२ शहरांमध्ये नायट्रोजन आॅक्साईड (एनओ) आणि एका शहरांत सल्फर डायआॅक्साईडचे सरासरी प्रमाण सामान्यापेक्षा जास्त आहे. वायुप्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छ इंधनाचा पुरवठा, गॅसवर चालणारे सार्वजनिक वाहन, मेट्रो रेल्वेचा विस्तार, वीज निर्मिती प्रकल्पांना उच्च गुणवत्ता असलेल्या कोळशाचा पुरवठा आणि जेनसेटसाठी कडक उत्सर्जन मापदंड तयार करून ते लागू करण्यात आले आहेत.डोंबिवली/अंबरनाथ११५८७ जळगाव१३०४४बदलापूर१२४८६नवी मुंबई१२०४३ उल्हासनगर१११७९पुणे९२४५ चंद्रपूर१४८-अकोला१३९-मुंबई११७-लातूर११७-जालना१०९-नागपूर१०३-अमरावती१००-नासिक९५-सोलापूर८३-सांगली८०-औरंगाबाद८०-ठाणे७३-