शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

१५०० हिंदूंनी भारत सोडला; पाकिस्तानात परत गेले, PM मोदी-शाहांनी केली घोर निराशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 17:24 IST

मोदी सरकार येण्यापूर्वी १३ हजार लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले होते. मात्र, गेल्या ५ वर्षांत २ हजार पाकिस्तानी हिंदूना भारतीय नागरिकत्व मिळाले, असे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली: भारतीय नागरिकत्व मिळेल या आशेने आलेल्या हिंदूंवर पुन्हा पाकिस्तानात परतण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींना भारतीयांना नागरिकत्व मिळवताना अडचणी येत आहेत. केंद्र सरकारचे नियम अतिशय कठोर आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील अत्याचारांना कंटाळून भारतात आलेले हिंदू पुन्हा पाकिस्तानला परतत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये ३३४ पाकिस्तानी हिंदू शरणार्थी मायदेशात परत गेले असून, गेल्या दोन वर्षांतील ही संख्या १५०० च्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. 

उच्चपदस्थांच्या माहितीनुसार, जानेवारी ते जुलै २०२२ या कालावधीत ३३४ पाकिस्तानी हिंदू शरणार्थी पाकिस्तानला परत गेले. २०२१ पासून या वर्षीपर्यंत जवळपास १५०० पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानला परत गेले आहेत, अशी माहिती सीमांत लोक संघटनेचे अध्यक्ष हिंदू सिंह सोधा यांनी दिली. पाकिस्तानातून आलेल्या अनेक हिंदूंकडे पैसा किंवा संसाधने नाहीत. त्यामुळे त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ते पाकिस्तानला परत जात आहेत, असे त्यांनी सांगितले. राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारामुळे पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंच्या पदरी निराशा आल्याचेही ते म्हणाले. 

भारतीय नागरिकत्वासाठी २५ हजार पाकिस्तानी हिंदू प्रतिक्षेत

पैसे खर्च करूनही भारतीय नागरिकत्व मिळेल याची खात्री नाही. भारतीय नागरिकत्व हव्या असलेल्या पाकिस्तानी हिंदूंची संख्या जवळपास २५ हजार इतकी आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हे पाकिस्तानी हिंदू भारतात राहत आहेत, असे सोधा म्हणाले. २००४ आणि २००५ मध्ये जवळपास १३ हजार पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्व देण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. त्यांना नागरिकत्वही मिळाले. मात्र गेल्या ५ वर्षांत केवळ २ हजार पाकिस्तानी हिंदूंनाच नागरिकत्व मिळाले.

दरम्यान, पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. भारतीय गृह मंत्रालयाच्या नियमांनुसार, नागरिकत्वासाठी अर्ज करताना नुतनीकरण करण्यात आलेला पासपोर्ट आणि पासपोर्ट सरेंडर करत असल्याचे पाकिस्तानी दूतावासाचं प्रमाणपत्र जमा करावं लागते. पाकिस्तानी दूतावासानं पासपोर्ट नुतनीकरणाच्या शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार