शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अमृतसरमध्ये १५० मराठी कुटुंबांचे बल्ले बल्ले; ‘गलाई’त कमावली विश्वासार्हता  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 08:45 IST

गलाई किंवा आपल्याकडे ज्याला आटणीचे काम म्हणतात, ते म्हणजे सोन्या-चांदीचे शुध्दीकरण. गुरू बाजार व कित्ता बाजार परिसरात अशी महाराष्ट्रीयन लोकांची दोनशे दुकाने आहेत.

विश्वास पाटीलअमृतसर : सोन्या-चांदीचे गलाईचे काम करण्यात महाराष्ट्रीयन लोकांचे येथे चांगले नाव आहे. या कामांतून मराठी उद्योजकांनी येथे चांगली विश्वासार्हता मिळवली असल्याचे चित्र बुधवारी सराफ बाजारात फिरल्यानंतर अनुभवण्यास मिळाले. महाराष्ट्रातील मुख्यत: सांगली, सातारा जिल्ह्यांतील दीडशेहून अधिक कुटुंबे येथे अगदी सुवर्णमंदिराच्या परिसरातच गेल्या ६०-७० वर्षांपासून स्थायिक आहेत. ते गणेश उत्सव, शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करतात.

वेजेगाव (ता. खानापूर) चे नागेश देवकर यांचे या परिसरात मोठे प्रस्थ आहे. आता पोपट यादव हे प्रधान म्हणून ती परंपरा पुढे चालवत आहेत. अशोक जाधव, संजय काशीद, राम देशमुख, प्रशांत घोटकर, संदीप पाटील असे काही प्रमुख लोक या व्यवसायात आहेत. सांगली जिल्ह्यातील मांजर्डी, गवाण, वेजेगाव, बेनापूर, सातारा जिल्ह्यातील मायणी व पुणे जिल्ह्यातील काही गावांतील तरुण या व्यवसायात आहेत. कधीकाळी दुष्काळी पट्ट्यातील हे लोक  रोजगाराच्या शोधात येथे आले आणि आता या व्यवसायात त्यांनी प्रतिष्ठा निर्माण केली आहे.

गलाई किंवा आपल्याकडे ज्याला आटणीचे काम म्हणतात, ते म्हणजे सोन्या-चांदीचे शुध्दीकरण. गुरू बाजार व कित्ता बाजार परिसरात अशी महाराष्ट्रीयन लोकांची दोनशे दुकाने आहेत. हा परिसर जुन्या शहरातील आहे. त्यामुळे देश स्वतंत्र होण्याच्या आधीच्या जुन्या इमारती आहेत. तिथे या लोकांची छोट्या दुकानातून ही कामे चालतात. त्यावरून त्यांचे या शहराशी किती जुने नाते असेल, याची कल्पना येते. सोन्याची शुध्दता तपासणाऱ्या लॅब काही लोकांनी सुरू केल्या आहेत. पंजाबचा व्यापारी सोन्या-चांदीचे शुध्दीकरणाचे काम महाराष्ट्रीयन लोकांकडून करून घेतो. कारण हे काम तो प्रामाणिकपणे करतो, असे सराफ व्यावसायिक हरजित सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मतांसाठीही फिल्डिंगमराठी माणूस नोकरी-व्यवसायासाठी गाव सोडत नाही, अशी पारंपरिक प्रतिमा असताना या लोकांनी मात्र येथे कामातून चांगला दबदबा निर्माण केला आहे. त्यांचे येथे मतदानही आहे. मराठी लोकांची असोसिएशन आहे. या असोसिएशनचा पाठिंबा मिळावा, यासाठी काँग्रेस व भाजपकडून प्रयत्न केला जात असल्याचे पाहायला मिळाले. हे लोक चांगले पंजाबी बोलतात. स्वत:ची घरे आहेत. या मातीशी ते एकरूप झाले आहेत.