शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

तीन वर्षांत शहरांत बांधली १५ टक्के घरे; गृहनिर्माण खात्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 06:54 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागांमध्ये ५४ लाख ९५ हजार घरे बांधण्याचे जे उद्दिष्ट राखण्यात आले आहे, त्यातील १५ टक्के घरे गेल्या तीन वर्षांत बांधून पूर्ण झाली, असा दावा केंद्रीय नागरी व्यवहार आणि गृहनिर्माण खात्याने केला आहे.

नवी दिल्ली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागांमध्ये ५४ लाख ९५ हजार घरे बांधण्याचे जे उद्दिष्ट राखण्यात आले आहे, त्यातील १५ टक्के घरे गेल्या तीन वर्षांत बांधून पूर्ण झाली, असा दावा केंद्रीय नागरी व्यवहार आणि गृहनिर्माण खात्याने केला आहे.या खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत २०१५ ते २०२२ या कालावधीत देशभरात १ कोटी घरे बांधण्याचे ठरविले आहे. त्या दिशेने वेगात काम सुरू आहे.या योजनेखाली गेल्या महिन्यात शहरी भागांमध्ये १ लाख १२ हजार घरे बांधण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे केंद्रातर्फे बांधकामासाठी आर्थिक मदत दिली जाणाऱ्या अशा घरांची संख्या ५४ लाख ९५ हजार ४४३ इतकी झाली आहे. नगर आणि गृहनिर्माण खात्याचे प्रवक्ते राजीव जैन म्हणाले की, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही घरे लवकरात लवकर बांधून कशी पूर्ण करता येतील, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.या योजनेत ४३२० शहरे, छोटी शहरे यांचा समावेश करण्यात आला असून यंदा जुलै अखेरपर्यंत ११,२२६ गृहनिर्माण प्रकल्प मंजूर करण्यात आले. ज्या नागरिकाचे देशातील कोणत्याही भागात स्वत:च्या नावावर पक्के घर नाही, अशा कोणालाही या योजनेत सहभागी होता येईल.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला तेव्हापासून ते यंदा २१ आॅगस्टपर्यंत शहरी भागात ८.५५ लाख घरे बांधून पूर्ण झाली आहेत. देशभरात ३०.४ लाख घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे या सरकारच्या दाव्यावर टीका काँग्रेसचे प्रवक्ते आर. पी. एन. सिंग यांनी टीका केली. ते म्हणाले की, या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत पूर्ण झालेले काम हे नगण्य आहे; पण त्याचेही भांडवल करणे हा भाजपचा नवीन जुमला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी