शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

१५ लाख रुग्ण सर्दी, तापाने बेजार खाजगी वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज : २०१२ नंतर सर्वात मोठा डेंग्यूचा कहर

By admin | Updated: September 20, 2016 22:52 IST

जळगाव : जिल्हाभरात ५० लाख लोकसंख्या आहे. पैकी तब्बल १५ लाख नागरिक हे सर्दी, ताप यामुळे बेजार झाले आहेत. यात डेंग्यूसदृश व डेंग्यूच्या रुग्णांचादेखील समावेश आहे. २०१२ नंतर डेंग्यूचा सर्वात मोठा कहर झाला असून, शहरी व ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या एकसारखीच असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

जळगाव : जिल्हाभरात ५० लाख लोकसंख्या आहे. पैकी तब्बल १५ लाख नागरिक हे सर्दी, ताप यामुळे बेजार झाले आहेत. यात डेंग्यूसदृश व डेंग्यूच्या रुग्णांचादेखील समावेश आहे. २०१२ नंतर डेंग्यूचा सर्वात मोठा कहर झाला असून, शहरी व ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या एकसारखीच असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
यंदा पावसाचे प्रमाण बर्‍यापैकी आहे. पावसाचे पाणी सतत तुंबून राहिल्याने त्यात डेंग्यू डासांच्या अळ्यांची निर्मिती झाली. अळ्या नष्ट करण्यासाठी वेळीच उपाययोजना न झाल्याने डेंग्यूचा फैलास वेगाने झाला.
सोबत सर्दी, ताप, खोकला, निमोनिया यामुळे रुग्ण बेजार झाले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच बेजार आहेत.
यात डेंग्यूच्या रुग्णांसह इतर रुग्णांनाही डेंग्यूसंबंधीची तपासणी व इतर खर्चाचा फटका बसत आहे. डेंगूच्या तपासणीसाठी किंवा चाचण्यांसाठी एक हजार रुपये खर्च येतो. शासन फक्त दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना तपासणीसंबंधी मदत करते, पण इतर रुग्णांना मदत मिळत नाही. तपासण्यांचा खर्च परवडणारा नसल्याने आजार अधिकचा त्रासदायक बनत आहे.
कुंड्या, पाण्याच्या मोठ्या टाक्या यातही डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच पावसाचे पाणी महिनाभर तुंबून राहिलेल्या ठिकाणीदेखील डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. शहरांमध्ये खुले भूखंड डेेंग्यूच्या फैलावास अधिक कारणीभूत ठरत आहेत.

१० जुलैपासून साथ
जिल्‘ात १० जुलैपासून डेंग्यूची साथ पसरली. ती आटोक्यात आलीच नाही. जि.प. व जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा गाफील राहिल्याने ही स्थिती निर्माण झाली. सप्टेंबर महिन्यात ही साथ अधिक भीषण बनली आहे.

जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे रोज ५०० घरांचे सर्वेक्षण
जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून रोज ५०० घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. मंगळवारी १०० पेक्षा अधिक भांडी, टाक्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्यात आल्याची माहिती मिळाली. परंतु मंगळवारी डेंग्यूसंबंधीची तिव्रता कमी झाल्याचा दावा जिल्हा आरोग्याधिकारी बी.आर.पाटील यांनी केला.