शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

१५ लाख रुग्ण सर्दी, तापाने बेजार खाजगी वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज : २०१२ नंतर सर्वात मोठा डेंग्यूचा कहर

By admin | Updated: September 20, 2016 22:52 IST

जळगाव : जिल्हाभरात ५० लाख लोकसंख्या आहे. पैकी तब्बल १५ लाख नागरिक हे सर्दी, ताप यामुळे बेजार झाले आहेत. यात डेंग्यूसदृश व डेंग्यूच्या रुग्णांचादेखील समावेश आहे. २०१२ नंतर डेंग्यूचा सर्वात मोठा कहर झाला असून, शहरी व ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या एकसारखीच असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

जळगाव : जिल्हाभरात ५० लाख लोकसंख्या आहे. पैकी तब्बल १५ लाख नागरिक हे सर्दी, ताप यामुळे बेजार झाले आहेत. यात डेंग्यूसदृश व डेंग्यूच्या रुग्णांचादेखील समावेश आहे. २०१२ नंतर डेंग्यूचा सर्वात मोठा कहर झाला असून, शहरी व ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या एकसारखीच असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
यंदा पावसाचे प्रमाण बर्‍यापैकी आहे. पावसाचे पाणी सतत तुंबून राहिल्याने त्यात डेंग्यू डासांच्या अळ्यांची निर्मिती झाली. अळ्या नष्ट करण्यासाठी वेळीच उपाययोजना न झाल्याने डेंग्यूचा फैलास वेगाने झाला.
सोबत सर्दी, ताप, खोकला, निमोनिया यामुळे रुग्ण बेजार झाले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच बेजार आहेत.
यात डेंग्यूच्या रुग्णांसह इतर रुग्णांनाही डेंग्यूसंबंधीची तपासणी व इतर खर्चाचा फटका बसत आहे. डेंगूच्या तपासणीसाठी किंवा चाचण्यांसाठी एक हजार रुपये खर्च येतो. शासन फक्त दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना तपासणीसंबंधी मदत करते, पण इतर रुग्णांना मदत मिळत नाही. तपासण्यांचा खर्च परवडणारा नसल्याने आजार अधिकचा त्रासदायक बनत आहे.
कुंड्या, पाण्याच्या मोठ्या टाक्या यातही डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच पावसाचे पाणी महिनाभर तुंबून राहिलेल्या ठिकाणीदेखील डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. शहरांमध्ये खुले भूखंड डेेंग्यूच्या फैलावास अधिक कारणीभूत ठरत आहेत.

१० जुलैपासून साथ
जिल्‘ात १० जुलैपासून डेंग्यूची साथ पसरली. ती आटोक्यात आलीच नाही. जि.प. व जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा गाफील राहिल्याने ही स्थिती निर्माण झाली. सप्टेंबर महिन्यात ही साथ अधिक भीषण बनली आहे.

जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे रोज ५०० घरांचे सर्वेक्षण
जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून रोज ५०० घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. मंगळवारी १०० पेक्षा अधिक भांडी, टाक्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्यात आल्याची माहिती मिळाली. परंतु मंगळवारी डेंग्यूसंबंधीची तिव्रता कमी झाल्याचा दावा जिल्हा आरोग्याधिकारी बी.आर.पाटील यांनी केला.