शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

१५ कोटींची वसुली मात्र सुविधांसाठी प्रतिक्षा... वीज सर्वाधिक महाग : रस्त्यांचे कामे सुरु झाल्याचा दावा एमआयडीसी समस्या भाग ७, लोगोसह घ्यावी.

By admin | Updated: February 7, 2016 22:46 IST

जळगाव : औद्योगिक वसाहत क्षेत्रात नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची दुरुस्ती व अन्य सुविधा पुरविण्यासंदर्भात नेमकी जबाबदारी कुणाची याबाबत न्यायालयापर्यंत प्रकरण गेले. औद्योगिक वसाहतीतून सेवा कराच्या स्वरुपात १५ कोटींची वसुली झाली आहे. मात्र गटार, रस्ते, पथदिवे या मुलभूत सुविधांसाठी उद्योजकांना आजही प्रतिक्षा करावी लागत आहे.जबाबदारी निश्चितीबाबत बराच गोंधळ जळगाव औद्योगिक ...


जळगाव : औद्योगिक वसाहत क्षेत्रात नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची दुरुस्ती व अन्य सुविधा पुरविण्यासंदर्भात नेमकी जबाबदारी कुणाची याबाबत न्यायालयापर्यंत प्रकरण गेले. औद्योगिक वसाहतीतून सेवा कराच्या स्वरुपात १५ कोटींची वसुली झाली आहे. मात्र गटार, रस्ते, पथदिवे या मुलभूत सुविधांसाठी उद्योजकांना आजही प्रतिक्षा करावी लागत आहे.
जबाबदारी निश्चितीबाबत बराच गोंधळ
जळगाव औद्योगिक वसाहत क्षेत्रातील उद्योगांसाठी नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची नियमित देखभाल करणे, नवीन पथदिवे बसविणे, पथदिव्यांची नियमित देखभाल करणे, पक्क्या गटारी तयार करणे तसेच नियमित साफसफाई करणे या मुलभूत सुविधांचा वानवा आहे. १९८९ पासून जळगाव औद्योगिक वसाहतीचा भाग तत्कालिन नगरपालिकेच्या अंतर्गत येत होता. १९९४ मध्ये औद्योगिक वसाहतीच्या घटनेचा अंमल झाल्यानंतर त्यांना स्पेशल प्लॅनिंगचा अधिकार देण्यात आला. पुढे तत्कालिन नगरपालिका व विद्यमान मनपाने आर्थिक डबघाईचे कारण पुढे करीत या भागात सेवा सुविधा पुरविण्यास नकार दिला. या संदर्भात काही संघटनांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योग मंत्रालयाचे प्रधान सचिव यांना पत्र पाठवून धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली होती.

सेवा कराच्या माध्यमातून १५ कोटींची वसुली
दरम्यानच्या काळात एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी या भागातील रस्ते, गटारी आणि पथदिवे या मुलभूत सुविधा पुरविण्यासंदर्भात आदेश झाले. सुविधा पुरविण्यासाठी कराची आकारणी करण्यात आली. त्यानुसार सेवा कराच्या पोटी उद्योजकांकडून सुमारे १५ कोटींची रक्कम वसुल करण्यात आली. त्यानंतर बरेच महिने या कामांची टेंडर प्रक्रिया सुरु राहिली. त्यात काही दिवसांपूर्वी १६ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाची टेंडरप्रक्रिया पूर्ण होऊन कामांना सुरुवात करण्यात आली आहे. मात्र अद्यापही पथदिवे, गटारी यासह अन्य मुलभूत सुविधांसाठी उद्योजकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.