शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नरेंद्र मोदींनी देशाला पुढील पाच वर्षांची गॅरंटी दिली! पहिल्या तीन जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 09:01 IST

आज देश ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे.

आज देश ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे हे दहावे संबोधन आहे. आपल्या भाषणात पीएम मोदींनी मणिपूर तसेच अन्य मुद्द्यांचाही उल्लेख केला. 

"भारताच्या सामर्थ्याने जग थक्क झाले...": स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पुढील पाच वर्षाची गॅरंटी दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले, मी तुम्हाला खात्री देतो, येत्या ५ वर्षांत देश पहिल्या तीन जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये आपले स्थान घेईल, ते नक्कीच होईल, असा विश्वासही पीएम मोदींनी यावेळी दिला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,  मी तिरंग्याच्या साक्षीने लाल किल्ल्यावरून देशवासियांना १० वर्षांचा लेखाजोखा देत आहे. १० वर्षांपूर्वी भारत सरकारपेक्षा राज्यांना ३० लाख कोटी अधिक दिले जात होते, गेल्या ९ वर्षांत हा आकडा १०० लाख कोटींवर पोहोचला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी पूर्वी भारत सरकारकडून ७० हजार कोटी रुपये जात होते, आज ते ३ लाख कोटींहून अधिक आहे. गरिबांच्या घरासाठी यापूर्वी ९० हजार कोटी रुपये खर्च केले जात होते, आज ४ लाख कोटी रुपये खर्च होत आहेत. भारत सरकार शेतकऱ्यांना युरियासाठी १० लाख कोटी रुपयांचे अनुदान देत आहे.

'आज भारत ग्लोबल साउथचा आवाज बनत आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताचा वाटा वाढला आहे. भारताने आज जे काही कमावले आहे त्यामुळे जगात स्थिरतेची हमी मिळाली आहे. विश्वास पूर्ण झाला. आता चेंडू आपल्या कोर्टात आहे. आपण संधी सोडू नये, असंही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदी