शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

14th August: वेदना विसरू शकत नाही! 14 ऑगस्ट 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' मानला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 12:06 IST

14th August : India's Partition Horrors Remembrance Day फाळणीवेळी हिंसाचार उफाळला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. काही रिपोर्टनुसार ही संख्या 10 ते 20 लाख एवढी होती. यामध्ये महिला, लहान मुले, वृद्ध सर्वच होरपळले गेले. 14 ऑगस्ट हा दिवस पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी यंदाचा स्वातंत्र्य दिवसाच्या आधीचा एक दिवस म्हणजेच 14 ऑगस्ट हा 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' (Partition Horrors Remembrance Day) म्हणून मानला जाणार असल्याची घोषणा केली. भारत-पाकिस्तान फाळणीची घटना ही वेदनादाई होती. तिरस्कार आणि हिंसाचारामुळे आमच्या लाखो बहीणी आणि भावांना विस्थापित व्हावे लागले होते. ही वेदना कधीही विसरता येणार नाही. अनेकांना प्राणही गमवावे लागले होते, असे मोदी यांनी म्हटले आहे. (In memory of the struggles and sacrifices of our people, 14th August will be observed as Partition Horrors Remembrance Day: PM Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, फाळणीमध्ये विस्थापित व्हावे लागलेल्या आणि प्राण गमावलेल्या आमच्या लाखो बंधु-बहीणींच्या बलिदानाला लक्षात ठेवण्यासाठी आजचा दिवस  'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' म्हणून मानला जाईल.आजचा हा दिवस, #PartitionHorrorsRemembranceDay आम्हाला भेदभाव, वैमनस्य आणि वाईट भावनांच्या विषाला संपविण्यासाठी केवळ प्रेरितच करणार नाही, तर यामुळे एकता, सामाजिक सद्भावने आणि मानवी संवेदनांना आणखी मजबूत करणार आहे, असे मोदी म्हणाले. (14th August : India's Partition Horrors Remembrance Day)

भारताला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळाले होते. मात्र, इंग्रजांनी भारताला या स्वातंत्र्याचा आनंद फाळणीची मोठी किंमत मोजून दिले होते. 14 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान दोन भागात विभागले गेले होते. 15 ऑगस्टला सकाळी ट्रेनमधून, घोडे-खेचरांवरून आणि पायी लोक आपल्या मातृभूमीतून दुसऱ्या देशात जात होते. पाकिस्तानातून भारतात आणि भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या या लोकांच्या चेहऱ्यावरील रंग उडाले होते. 

फाळणीवेळी दोन्ही बाजुला हिंसाचार उफाळला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. काही रिपोर्टनुसार ही संख्या 10 ते 20 लाख एवढी होती. यामध्ये महिला, लहान मुले, वृद्ध सर्वच होरपळले गेले. 14 ऑगस्ट हा दिवस पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात यापुढे हा दिवस 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' म्हणून पाळला जाणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिनPakistanपाकिस्तान