शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

14th August: वेदना विसरू शकत नाही! 14 ऑगस्ट 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' मानला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 12:06 IST

14th August : India's Partition Horrors Remembrance Day फाळणीवेळी हिंसाचार उफाळला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. काही रिपोर्टनुसार ही संख्या 10 ते 20 लाख एवढी होती. यामध्ये महिला, लहान मुले, वृद्ध सर्वच होरपळले गेले. 14 ऑगस्ट हा दिवस पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी यंदाचा स्वातंत्र्य दिवसाच्या आधीचा एक दिवस म्हणजेच 14 ऑगस्ट हा 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' (Partition Horrors Remembrance Day) म्हणून मानला जाणार असल्याची घोषणा केली. भारत-पाकिस्तान फाळणीची घटना ही वेदनादाई होती. तिरस्कार आणि हिंसाचारामुळे आमच्या लाखो बहीणी आणि भावांना विस्थापित व्हावे लागले होते. ही वेदना कधीही विसरता येणार नाही. अनेकांना प्राणही गमवावे लागले होते, असे मोदी यांनी म्हटले आहे. (In memory of the struggles and sacrifices of our people, 14th August will be observed as Partition Horrors Remembrance Day: PM Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, फाळणीमध्ये विस्थापित व्हावे लागलेल्या आणि प्राण गमावलेल्या आमच्या लाखो बंधु-बहीणींच्या बलिदानाला लक्षात ठेवण्यासाठी आजचा दिवस  'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' म्हणून मानला जाईल.आजचा हा दिवस, #PartitionHorrorsRemembranceDay आम्हाला भेदभाव, वैमनस्य आणि वाईट भावनांच्या विषाला संपविण्यासाठी केवळ प्रेरितच करणार नाही, तर यामुळे एकता, सामाजिक सद्भावने आणि मानवी संवेदनांना आणखी मजबूत करणार आहे, असे मोदी म्हणाले. (14th August : India's Partition Horrors Remembrance Day)

भारताला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळाले होते. मात्र, इंग्रजांनी भारताला या स्वातंत्र्याचा आनंद फाळणीची मोठी किंमत मोजून दिले होते. 14 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान दोन भागात विभागले गेले होते. 15 ऑगस्टला सकाळी ट्रेनमधून, घोडे-खेचरांवरून आणि पायी लोक आपल्या मातृभूमीतून दुसऱ्या देशात जात होते. पाकिस्तानातून भारतात आणि भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या या लोकांच्या चेहऱ्यावरील रंग उडाले होते. 

फाळणीवेळी दोन्ही बाजुला हिंसाचार उफाळला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. काही रिपोर्टनुसार ही संख्या 10 ते 20 लाख एवढी होती. यामध्ये महिला, लहान मुले, वृद्ध सर्वच होरपळले गेले. 14 ऑगस्ट हा दिवस पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात यापुढे हा दिवस 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' म्हणून पाळला जाणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिनPakistanपाकिस्तान