शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

वायनाडमध्ये मृतांचा संख्या १४३ वर; आणखी एका मोठ्या संकटाचा IMD ने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 08:59 IST

Wayanad Landslide : केरळमध्ये झालेल्या भूस्खलातील मृतांची संख्या वाढतच चालली असून शेकडो मृतदेह हाती लागले आहेत.

Kerala Wayanad Landslide :केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये मंगळवारी पहाटे झालेल्या भूस्खलनात मोठी जीवितहानी झाली आहे.  मुसळधार पावसानंतर चार गावांमध्ये झालेल्या भूस्खलनात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण अद्याप बेपत्ता आहे. झोपेत असतानाच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे वाहून आल्याने काही कळायच्या आत गावकरी त्याखाली गाडले आहेत. तसेच पाण्याचा प्रवाह इतका होता की अनेकजण त्यात वाहून गेले आहेत. केरळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या भयानक घटनेत मृतांचा आकडा १४७ वर पोहोचला आहे. अद्यापही बचावकार्य सुरु असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वायनाडमध्ये मुसळधार पावसाच्या तडाख्याने मंगळवारी पहाटे दरडी कोसळून तब्बल १४७ जण मृत्यूमुखी पावले आहेत. शेकडो लोक अद्याप ढिगाऱ्याखाली आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पहाटे दोन आणि साडेचार वाजता दोन ठिकाणी भूस्खलन झाल्याची माहिती दिली प्रशासनाने दिली. मात्र स्थानिकांच्या म्हणण्यांनुसार या ठिकाणी अनेकवेळा भू्स्खलन झाले आणि ही घटना घडली.  मेपाडी भागात भूस्खलन झाले असून मुंडक्की, चूरामाला आणि नूलपुळ्ळा या गावांनाही फटका बसला. पहाटेच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे गावकऱ्यांना पळण्याची संधी मिळाली आणि त्यांचा जीव गेला.

दुसरीकडे, भारतीय हवामान खात्याने केरळच्या सर्व उत्तरेकडील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भूस्खलनग्रस्त वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बचावकार्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. पुढील वीस तासांत या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील सात दिवस राज्यभर अधूनमधून मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.

१२२ इन्फंट्री बटालियन मद्रासच्या सेकंड-इन-कमांडच्या नेतृत्वाखाली ४३ जवानांची टीम बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहे. लष्कराचा अभियांत्रिकी गटही या भागात पोहोचला आहे. हवाई दलाचे एमआय-१७ आणि ध्रुव हेलिकॉप्टर मदतीसाठी पाठवण्यात आले आहेत. नौदलाचे ३० डायव्हर्सही दाखल झाले आहेत. एनडीआरएफनेही बचाव कार्यासाठी चार पथके तैनात केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, केरळमध्ये गेल्या सहा वर्षांतील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. राज्यात ऑगस्ट २०१८ मध्ये आलेल्या पुरात ४८३ जणांचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूस्खलनाची साखळी रात्री २ वाजता सुरू झाली. सकाळी सहा वाजेपर्यंत दरड कोसळण्याच्या तीन घटनांची नोंद झाली असून, त्यामुळे चार गावांना फटका बसला आहे.

टॅग्स :Keralaकेरळlandslidesभूस्खलनIndian Armyभारतीय जवान