शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

वायनाडमध्ये मृतांचा संख्या १४३ वर; आणखी एका मोठ्या संकटाचा IMD ने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 08:59 IST

Wayanad Landslide : केरळमध्ये झालेल्या भूस्खलातील मृतांची संख्या वाढतच चालली असून शेकडो मृतदेह हाती लागले आहेत.

Kerala Wayanad Landslide :केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये मंगळवारी पहाटे झालेल्या भूस्खलनात मोठी जीवितहानी झाली आहे.  मुसळधार पावसानंतर चार गावांमध्ये झालेल्या भूस्खलनात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण अद्याप बेपत्ता आहे. झोपेत असतानाच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे वाहून आल्याने काही कळायच्या आत गावकरी त्याखाली गाडले आहेत. तसेच पाण्याचा प्रवाह इतका होता की अनेकजण त्यात वाहून गेले आहेत. केरळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या भयानक घटनेत मृतांचा आकडा १४७ वर पोहोचला आहे. अद्यापही बचावकार्य सुरु असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वायनाडमध्ये मुसळधार पावसाच्या तडाख्याने मंगळवारी पहाटे दरडी कोसळून तब्बल १४७ जण मृत्यूमुखी पावले आहेत. शेकडो लोक अद्याप ढिगाऱ्याखाली आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पहाटे दोन आणि साडेचार वाजता दोन ठिकाणी भूस्खलन झाल्याची माहिती दिली प्रशासनाने दिली. मात्र स्थानिकांच्या म्हणण्यांनुसार या ठिकाणी अनेकवेळा भू्स्खलन झाले आणि ही घटना घडली.  मेपाडी भागात भूस्खलन झाले असून मुंडक्की, चूरामाला आणि नूलपुळ्ळा या गावांनाही फटका बसला. पहाटेच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे गावकऱ्यांना पळण्याची संधी मिळाली आणि त्यांचा जीव गेला.

दुसरीकडे, भारतीय हवामान खात्याने केरळच्या सर्व उत्तरेकडील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भूस्खलनग्रस्त वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बचावकार्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. पुढील वीस तासांत या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील सात दिवस राज्यभर अधूनमधून मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.

१२२ इन्फंट्री बटालियन मद्रासच्या सेकंड-इन-कमांडच्या नेतृत्वाखाली ४३ जवानांची टीम बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहे. लष्कराचा अभियांत्रिकी गटही या भागात पोहोचला आहे. हवाई दलाचे एमआय-१७ आणि ध्रुव हेलिकॉप्टर मदतीसाठी पाठवण्यात आले आहेत. नौदलाचे ३० डायव्हर्सही दाखल झाले आहेत. एनडीआरएफनेही बचाव कार्यासाठी चार पथके तैनात केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, केरळमध्ये गेल्या सहा वर्षांतील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. राज्यात ऑगस्ट २०१८ मध्ये आलेल्या पुरात ४८३ जणांचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूस्खलनाची साखळी रात्री २ वाजता सुरू झाली. सकाळी सहा वाजेपर्यंत दरड कोसळण्याच्या तीन घटनांची नोंद झाली असून, त्यामुळे चार गावांना फटका बसला आहे.

टॅग्स :Keralaकेरळlandslidesभूस्खलनIndian Armyभारतीय जवान