शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

राम मंदिराच्या नावावर १४०० कोटींचा अपहार, निर्मोही आखाड्याचा विहिंपवर आरोप : देणगीच्या नावाखाली पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:24 IST

मंदिराच्या नावावर नोट आणि व्होट एकत्र केले आहेत; पण या मुद्यावर ते काहीही करू इच्छित नाहीत.

लखनौ : अयोध्येतील राम मंदिराच्या नावावर विश्व हिंदू परिषदेने १४०० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा सनसनाटी आरोप राम मंदिर वादातील एक पक्ष निर्मोही आखाड्याने केला आहे. मात्र, निर्मोही आखाड्याचा हा आरोप विहिंपने फेटाळून लावलाआहे.निर्मोही आखाड्याचे सदस्य सीताराम यांनी आरोप केला आहे की, या संघटनेने देणगीच्या नावाखाली पैसे स्वीकारले आहेत. निर्मोही आखाड्याने मात्र कधी कुणाला असे पैसे मागितले नाहीत. विहिंपने मात्र राम मंदिराच्या बांधकामासाठी लोकांकडून देणगी स्वरूपात पैसे घेतले; पण त्यांनी आपल्या स्वत:च्या इमारतींसाठी या पैशांचा उपयोग केला.सीताराम यांनी म्हटले आहे की, राम मंदिर वादातील आम्ही मुख्य पक्ष आहोत; मात्र या नेत्यांनी आपल्या स्वार्थी हेतूंसाठी हा मुद्दा हायजॅक केला आहे.या पैशांचा उपयोग करून त्यांनी सरकार बनविले आहे. राम मंदिरासाठी एक पैसाही उपयोगात आणला नाही. या राजकारण्यांनी राम मंदिराच्या नावावर नोट आणि व्होट एकत्र केले आहेत; पण या मुद्यावर ते काहीही करू इच्छित नाहीत.हे आरोप फेटाळून लावताना विहिंपचे नेते विनोद बंसल यांनी म्हटले आहे की, १९६४ पासून जमा केलेल्या प्रत्येक पैशाच्या हिशेबासाठी ही संघटना जबाबदार आहे. (वृत्तसंस्था)रविशंकर यांच्याकडून वक्फ बोर्डाला आॅफर?आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांनी वादग्रस्त जागेतील एक तृतीयांश जागा सोडण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला मोठ्या रकमेची आॅफर दिल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.एका स्टिंग आॅपरेशनमध्ये एका खोलीत महंत दिनेंद्र दास हे कथित स्वरूपात वादग्रस्त २.७७ एकर जागेच्या बदल्यात सुन्नी वक्फ बोर्डाला पैशांची आॅफर देताना कॅमेºयात पकडले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. दास यांनी सांगितले की, हा सौदा श्री श्री यांच्यामार्फत होता.मध्यस्थीला वक्फ बोर्डाने दिला नकारराम मंदिर वादात मध्यस्थी म्हणून श्री श्री रविशंकर यांनी एकीकडे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही त्यांनी नुकतीच भेट घेतली आहे. तथापि, श्री श्री यांच्या मध्यस्थीला सुन्नी वक्फ बोर्डाने नकार दिला आहे.अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सुन्नी वक्फ बोर्डाच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे. या संस्थांचे असे म्हणणे आहे की, श्री श्री यांच्या मध्यस्थीत कोणताही कायदेशीर आधार नाही.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर