शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

काँग्रेसचे १४ आमदार जदयूमध्ये जाणार? ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतली नाराजांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:46 IST

बिहार विधानसभेतील काँग्रेसच्या २७ पैकी १४ आमदारांनी एक वेगळा गट स्थापन केला असून, हा गट सत्ताधारी जनता दलात (युनायटेड) सामील होण्याच्या मार्गावर असल्याचे समजते.

पाटणा/नवी दिल्ली: बिहार विधानसभेतील काँग्रेसच्या २७ पैकी १४ आमदारांनी एक वेगळा गट स्थापन केला असून, हा गट सत्ताधारी जनता दलात (युनायटेड) सामील होण्याच्या मार्गावर असल्याचे समजते. आणखी चार आमदार मिळाले तर फुटिरांना पक्षांतरबंदी कायद्याचेही बंधन राहणार नाही.या फुटीर आमदारांच्या हालचालींची कुणकुण लागताच पक्षश्रेष्ठींनी बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी वविधिमंडळ पक्षाचे नेते सदानंद सिंह यांना दोनच दिवसांपूर्वी दिल्लीला बोलावून घेतले होते. तेथे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दोघांनाही आमदारांवर लक्ष ठेवण्यास बजावल्याचे सांगितले होते. मात्र वेगळा गट स्थापन करू पाहणाºयांमध्ये अशोक चौधरी व सदानंद सिंह यांचाच पुढाकार होता आणि त्यांनी सोनिया गांधींना भेटल्यानंतर आपण काँग्रेसमधून बाहेर पडणार नसल्याचे जाहीरही केले होते. तरीही लगोलग श्रेष्ठींचे प्रतिनिधी म्हणू खासदार ज्योतिरादित्य शिंदे हेही पाटण्यात आले व त्यांनी नाराज आमदारांचीभेट घेतली. दिल्लीत पक्षप्रवक्तेआनंद शर्मा यांनी बिहारकाँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न चालविल्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावे आगपाखडकेली. त्यांच्या या प्रयत्नांना यश येणार नाही, अशी खात्रीही आनंद शर्मा व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)नितीशकुमारांना नाही गरजसूत्रांनुसार मात्र या आमदारांना पक्ष रोखू शकेल असे वाटत नाही. याआधी नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन सरकार होते, तेव्हा यापैकी सहा जण मंत्री होते. इतरांना महामंडळे व अन्यत्र वर्णी लागेल, अशी आशा होती. परंतु नितीशबाबुंनी महागठबंधन सोडून भाजपाशी जवळीककेल्याने या आमदारांना भवितव्य अनिश्चित वाटू लागले.बहुमतासाठी नितीश कुमार यांना या आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे, असे नाही. त्यामुळे या आमदारांकडे फारशी ‘बार्गेनिंग पॉवर’ही उरलेली नाही.