शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

रेल्वे अपघातात १४ मृत्यूमुखी

By admin | Updated: May 27, 2014 05:51 IST

दिल्लीहून गोरखपूरकडे निघालेल्या गोरखधाम एक्स्प्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगर जिल्ह्यातील चुरेब रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला मागून जोरदार धडक दिली़

संत कबीरनगर (उ. प्र.) : दिल्लीहून गोरखपूरकडे निघालेल्या गोरखधाम एक्स्प्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगर जिल्ह्यातील चुरेब रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला मागून जोरदार धडक दिली़ अपघातात कमीत कमी १४ जण ठार, तर १०० हून अधिक जखमी झाले़ दरम्यान, राज्याच्या गृह विभागाने या अपघातात ४० जण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आदींनी या अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे़ मोदींनी कॅबिनेट सचिवांना फोन करून अपघाताबद्दल जाणून घेतले़ सोमवारी सकाळी १० वाजता बस्ती व गोरखपूर जिल्ह्यादरम्यानच्या चुरेब रेल्वेस्थानकानजीक हा अपघात झाला़ गोरखपूर एक्स्प्रेस आली आणि तिने मागून मालगाडीला जोरदार धडक दिली़ धडक इतकी भीषण होती की, एक्स्प्रेसच्या इंजिनचे दोन तुकडे झाले़ नंतरचा पहिला डबा पूर्णपणे चपटा झाला व मालगाडीवर चढला़ अन्य पाच डबे रुळावरून घसरून पूर्णपणे चपटे झाले़ प्रारंभी अपघातात, २० जण ठार झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले़ मात्र नंतर त्यांनी घूमजाव केले़ रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनुनेंद्र कुमार यांनी या अपघातात १४ जण ठार झाले असून हा आकडा वाढू शकतो, असे ते म्हणाले. अपघातामागचे नेमके कारण कळू शकले नाही़ चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले़ अपघातात अन्य १०० जण जखमी झाले असून त्यांना संत कबीरनगर व बस्ती येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे़ राज्य सरकारने जखमींना मोफत उपचाराची घोषणा केली आहे़ मृतांच्या कुटुंबियांना रेल्वेची मदत जिल्हाधिकारी भरत लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात गोरखधामच्या सहा डब्यांचे नुकसान झाले आहे़ या डब्यांमध्ये मृतदेह असण्याची शक्यता आहे़ रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार व किरकोळ जखमींना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत जाहीर केली़अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली़ त्यामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले़ (वृत्तसंस्था)