शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

रेल्वे अपघातात १४ मृत्यूमुखी

By admin | Updated: May 27, 2014 05:51 IST

दिल्लीहून गोरखपूरकडे निघालेल्या गोरखधाम एक्स्प्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगर जिल्ह्यातील चुरेब रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला मागून जोरदार धडक दिली़

संत कबीरनगर (उ. प्र.) : दिल्लीहून गोरखपूरकडे निघालेल्या गोरखधाम एक्स्प्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगर जिल्ह्यातील चुरेब रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला मागून जोरदार धडक दिली़ अपघातात कमीत कमी १४ जण ठार, तर १०० हून अधिक जखमी झाले़ दरम्यान, राज्याच्या गृह विभागाने या अपघातात ४० जण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आदींनी या अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे़ मोदींनी कॅबिनेट सचिवांना फोन करून अपघाताबद्दल जाणून घेतले़ सोमवारी सकाळी १० वाजता बस्ती व गोरखपूर जिल्ह्यादरम्यानच्या चुरेब रेल्वेस्थानकानजीक हा अपघात झाला़ गोरखपूर एक्स्प्रेस आली आणि तिने मागून मालगाडीला जोरदार धडक दिली़ धडक इतकी भीषण होती की, एक्स्प्रेसच्या इंजिनचे दोन तुकडे झाले़ नंतरचा पहिला डबा पूर्णपणे चपटा झाला व मालगाडीवर चढला़ अन्य पाच डबे रुळावरून घसरून पूर्णपणे चपटे झाले़ प्रारंभी अपघातात, २० जण ठार झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले़ मात्र नंतर त्यांनी घूमजाव केले़ रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनुनेंद्र कुमार यांनी या अपघातात १४ जण ठार झाले असून हा आकडा वाढू शकतो, असे ते म्हणाले. अपघातामागचे नेमके कारण कळू शकले नाही़ चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले़ अपघातात अन्य १०० जण जखमी झाले असून त्यांना संत कबीरनगर व बस्ती येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे़ राज्य सरकारने जखमींना मोफत उपचाराची घोषणा केली आहे़ मृतांच्या कुटुंबियांना रेल्वेची मदत जिल्हाधिकारी भरत लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात गोरखधामच्या सहा डब्यांचे नुकसान झाले आहे़ या डब्यांमध्ये मृतदेह असण्याची शक्यता आहे़ रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार व किरकोळ जखमींना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत जाहीर केली़अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली़ त्यामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले़ (वृत्तसंस्था)