शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

१३ हल्ल्यांत १४ जवान शहीद, घातपाती कारवायांच्या बिमोडासाठी केंद्राला आखावी लागणार नवी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 08:38 IST

जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी केंद्र सरकारला नवीन रणनीती आखावी लागणार आहे.

श्रीनगर :जम्मू-काश्मीरमध्ये मागील ७५ दिवसांत दहशतवाद्यांनी १३ हल्ले केले असून, त्यात भारतीय लष्कराचे १४ जवान शहीद तर ७ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्याऐवजी आता जम्मूला लक्ष्य केले आहे. त्यामुळे तिथे घातपाती कारवायांचे प्रमाण वाढले आहे. हे बदल लक्षात घेता, तसेच जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी केंद्र सरकारला नवीन रणनीती आखावी लागणार आहे.

मविआच्याच गळ्यात टाका ‘फेक नरेटिव्ह’; नड्डा यांचे भाजपच्या बैठकीत आदेश

१३ व १४ सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड व बारामुल्ला येथे दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोहीम राबविली. बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जून ते १४ सप्टेंबर या कालावधीतील दहशतवादी हल्ल्यांचा तपशील बघितला, तर १३ हल्ले दहशतवादी हल्ले झाले.

९ जून २०२४ : शिवखोडी येथे झालेल्या यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १० यात्रेकरू ठार व ४० जण जखमी झाले.

११ जून २०२४ : डोडा, भद्रवाह येथे पोलिस, लष्कराच्या एका छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात सात जवान जखमी झाले.

७ जुलै २२४ : राजौरीत सुरक्षा दलाच्या चौकीवर झालेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला.

८ जुलै २०२४ ला रोजी कठुआ येथील हल्ल्यात ५ जवान शहीद झाले.

१६ जुलै २०२४ : दोडातील जंगलात लष्करी जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले.

२२ जुलै २०२४ : राजौरीत गुंदा क्वास येथे शौर्यचक्राने सन्मानित बीडीसी सदस्याच्या घरी हल्ला केला. त्यात लष्कराचा एक जवान जखमी झाला.

२७ जुलै २०२४ : कुपवाडा भागातील मछिल क्षेत्रात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार व एक जवान शहीद झाला.

१३ ऑगस्ट २०२४ : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांबरोबर चकमक झाली. त्यात अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे २ जवान शहीद व एका नागरिकाचा मृत्यू झाला.

२४ ऑगस्ट २०२४ : सोपोर येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.

२९ ऑगस्ट २०२४ : कुपवाडा येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

८ डिसेंबर २०२४ : रोजी लाम व नौशेरा भागात चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

१३ सप्टेंबर २०२४ : झालेल्या किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद व दोन जवान जखमी झाले.

१४ सप्टेंबर २०२४ : बारामुल्ला जिल्ह्यात चक टपर क्रीरी परिसरात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान