शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

१३ हल्ल्यांत १४ जवान शहीद, घातपाती कारवायांच्या बिमोडासाठी केंद्राला आखावी लागणार नवी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 08:38 IST

जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी केंद्र सरकारला नवीन रणनीती आखावी लागणार आहे.

श्रीनगर :जम्मू-काश्मीरमध्ये मागील ७५ दिवसांत दहशतवाद्यांनी १३ हल्ले केले असून, त्यात भारतीय लष्कराचे १४ जवान शहीद तर ७ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्याऐवजी आता जम्मूला लक्ष्य केले आहे. त्यामुळे तिथे घातपाती कारवायांचे प्रमाण वाढले आहे. हे बदल लक्षात घेता, तसेच जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी केंद्र सरकारला नवीन रणनीती आखावी लागणार आहे.

मविआच्याच गळ्यात टाका ‘फेक नरेटिव्ह’; नड्डा यांचे भाजपच्या बैठकीत आदेश

१३ व १४ सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड व बारामुल्ला येथे दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोहीम राबविली. बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जून ते १४ सप्टेंबर या कालावधीतील दहशतवादी हल्ल्यांचा तपशील बघितला, तर १३ हल्ले दहशतवादी हल्ले झाले.

९ जून २०२४ : शिवखोडी येथे झालेल्या यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १० यात्रेकरू ठार व ४० जण जखमी झाले.

११ जून २०२४ : डोडा, भद्रवाह येथे पोलिस, लष्कराच्या एका छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात सात जवान जखमी झाले.

७ जुलै २२४ : राजौरीत सुरक्षा दलाच्या चौकीवर झालेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला.

८ जुलै २०२४ ला रोजी कठुआ येथील हल्ल्यात ५ जवान शहीद झाले.

१६ जुलै २०२४ : दोडातील जंगलात लष्करी जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले.

२२ जुलै २०२४ : राजौरीत गुंदा क्वास येथे शौर्यचक्राने सन्मानित बीडीसी सदस्याच्या घरी हल्ला केला. त्यात लष्कराचा एक जवान जखमी झाला.

२७ जुलै २०२४ : कुपवाडा भागातील मछिल क्षेत्रात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार व एक जवान शहीद झाला.

१३ ऑगस्ट २०२४ : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांबरोबर चकमक झाली. त्यात अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे २ जवान शहीद व एका नागरिकाचा मृत्यू झाला.

२४ ऑगस्ट २०२४ : सोपोर येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.

२९ ऑगस्ट २०२४ : कुपवाडा येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

८ डिसेंबर २०२४ : रोजी लाम व नौशेरा भागात चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

१३ सप्टेंबर २०२४ : झालेल्या किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद व दोन जवान जखमी झाले.

१४ सप्टेंबर २०२४ : बारामुल्ला जिल्ह्यात चक टपर क्रीरी परिसरात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान