शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

रायगडमधील दिघीसह राज्यात १२ नव्या औद्योगिक वसाहती; केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 06:42 IST

नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या (एनआयसीडीपी) अंतर्गत ही कामे करण्यात येतील, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या दिघीसह विविध ठिकाणी १२ औद्योगिक वसाहती उभारण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. दहा राज्यांत राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी २८,६०२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या योजनेसाठी सहा कॉरिडॉरचीही आखणी करण्यात आली आहे.

खुरपिया (उत्तराखंड), राजपुरा-पटियाला (पंजाब), पलक्कड (केरळ), आग्रा, प्रयागराज (उत्तर प्रदेश), गया (बिहार), झहीराबाद (तेलंगण), ओरवाकल, कोपर्थी (आंध्र प्रदेश) व जोधपूर-पाली (राजस्थान) येथेही नव्या औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहेत. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या (एनआयसीडीपी) अंतर्गत ही कामे करण्यात येतील, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

दहा लाख थेट,  ३० लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध

एनआयसीडीपी योजनेमुळे विविध शहरे ही आधुनिक औद्योगिक सुविधांनी सज्ज करण्यात येतील. त्यामुळे उद्योगधंद्यांच्या विकासाला मोठा हातभार लागेल. या योजनेद्वारे १० लाख थेट रोजगार व ३० लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. नव्या औद्योगिक वसाहतींमुळे १.५२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसी