शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दिल्लीहून रस्त्याने १२ तासांत मुंबईत पोहोचा! नवा एक्स्प्रेस-वे, तीन वर्षांत पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:29 IST

राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई या शहरांना रस्त्याने अतिवेगवान प्रवासासाठी पूर्णपणे नवा एक्स्प्रेस-वे बांधण्याची योजना केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्रालयाने आखली असून तो पूर्ण झाल्यावर अवघ्या १२ तासांत दिल्लीहून मुंबईला पोहोचणे शक्य होईल.

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई या शहरांना रस्त्याने अतिवेगवान प्रवासासाठी पूर्णपणे नवा एक्स्प्रेस-वे बांधण्याची योजना केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्रालयाने आखली असून तो पूर्ण झाल्यावर अवघ्या १२ तासांत दिल्लीहून मुंबईला पोहोचणे शक्य होईल. सध्या या प्रवासास रस्त्याने २४ तास तर रेल्वेने २० तास लागतात.भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले की, या एक्प्रेस-वेला सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. डिसेंबरपासून त्याचे काम सुरू होईल व तीन वर्षांत ते पूर्ण करण्याची योजना आहे. महत्त्वाच्या व खूप रहदारीच्या मार्गांवर फक्त सध्या अस्तित्वात असलेले महामार्ग आणखी रुंद करणे पुरेसे नाही. त्यामुळे नवे महामार्ग बांधण्याचे मंत्रालयाचे धोरण आहे. दिल्ली-मुंबई एक्प्रेस-वेही त्यानुसारच बांधण्यात येणार आहे. यासाठी ४० ठिकाणी एकाचवेळी बांधकाम सुरू होईल. सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग ८ ने गेल्यास दिल्ली-मुंबई अंतर १,४५० किमी आहे. या प्रवासास २४ तास लागतात. नव्या एक्क्प्रेस-वेने हे अंतर १,२५० किमी असेल. हा प्रवास १२ तासांत करता येईल. या एक्स्प्रेस-वेची सुरुवात गुरगावच्या राजीव चौकातून होईल. दिल्ली, मेवात, कोटा, रतलाम, गोधरा, सुरत, दहिसर व मुंबई असा त्याचा मार्ग असेल. हरियाणातील मेवात व गुजरातमधील दाहोद दोन सर्वात मागास जिल्ह्यांतून तो जाईल.मागास भागांच्या विकासाला मिळणार चालनाहा नवा एक्स्प्रेस-वे मागास आणि अविकसीत भागांतून काढणारअसल्याने भूसंपादनाचा खर्च कमी येईल. संपूर्ण एक्स्प्रेस-वेच्या भूसंपादनासाठी ५० ते ६० अब्ज रुपये लागतील, अशी अपेक्षा असल्याचे गडकरी म्हणाले. हा मार्ग जाणार असलेले भाग सध्या मागास असले तरी एक्स्प्रेस-वेमुळे औद्योगिक व व्यापारी विकासाला चालना मिळून मोठे रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :MumbaiमुंबईNew Delhiनवी दिल्ली