शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

केरळमध्ये निपाह विषाणूचे ११ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:52 IST

दोन जिल्ह्यांत लागण; वटवाघळांमुळे फळा-फुलांतून होतो जीवघेण्या रोगाचा प्रसार

तिरुवअनंतपुरम : केरळमधील कोळिकोड व मल्लापूरम जिल्ह्यांत भयानक विषाणुने थैमान घातले आहे. निपाह नावाच्या विषाणूची लागण झाल्यामुळे आतापर्यंत १0 जणांचा मृत्यू झाला असून, आणखी किमान २५ जणांच्या रक्ततपासणीत त्यांनाही निपाह विषाणूने ग्रासल्याचे सांगण्यात आले. मृतांमध्ये एका परिचारिकेचाही समावेश आहे.या निपाह विषाणूमुळे आणखी कोणी दगावू नये, म्हणून केरळ सरकारने केंद्रा सरकारची मदत मागितली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) पथकास केरळमध्ये जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. एनसीडीसीचे पथक 'निपाह' विषाणूमुळे प्रभावित झालेल्या परिसराचा दौरा करणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनची समिती या विषाणूचे मूळ शोधत असून, पुणे येथील व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटच्या तपासणी रक्तांच्या तीन नमुन्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आले आहे.निपाहच्या विषाणूविषयीजागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार निपाह विषाणू हा वटवाघळांमुळे फळ-फुलांच्या माध्यमातून मनुष्य व जनावरांत पसरत आहे. मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरात १९९८ साली हा विषाणू आढळून आला होता. या विषाणूला 'निपाह' नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याची लागण झाल्याचे दिसून आले होते. बांग्लादेशात २00४ साली या विषाणूने थैमान घातले होते. (वृत्तसंस्था)निपाहग्रस्तांची लक्षणेया विषाणुची लागण झालेल्या रुग्णांना श्वास घेण्यास खूप त्रास होतो. शरीरात जळजळ होते. योग्य वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.लस नाही उपलब्ध : निपाह विषाणूवर अद्याप प्रभावी लस उपलब्ध झालेली नाही. या विषाणूची लागण होऊ नये यासाठी फळे, विशेषत: खजूर खाणे टाळावे आणि जमिनीवर पडलेली फळे खाऊ नयेत. तसेच आजारी डुकरे व प्राण्यांच्या जवळपास फिरकू नये, असा डॉक्टरांचा सल्ला आहे.

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणू