शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये निपाह विषाणूचे ११ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:52 IST

दोन जिल्ह्यांत लागण; वटवाघळांमुळे फळा-फुलांतून होतो जीवघेण्या रोगाचा प्रसार

तिरुवअनंतपुरम : केरळमधील कोळिकोड व मल्लापूरम जिल्ह्यांत भयानक विषाणुने थैमान घातले आहे. निपाह नावाच्या विषाणूची लागण झाल्यामुळे आतापर्यंत १0 जणांचा मृत्यू झाला असून, आणखी किमान २५ जणांच्या रक्ततपासणीत त्यांनाही निपाह विषाणूने ग्रासल्याचे सांगण्यात आले. मृतांमध्ये एका परिचारिकेचाही समावेश आहे.या निपाह विषाणूमुळे आणखी कोणी दगावू नये, म्हणून केरळ सरकारने केंद्रा सरकारची मदत मागितली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) पथकास केरळमध्ये जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. एनसीडीसीचे पथक 'निपाह' विषाणूमुळे प्रभावित झालेल्या परिसराचा दौरा करणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनची समिती या विषाणूचे मूळ शोधत असून, पुणे येथील व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटच्या तपासणी रक्तांच्या तीन नमुन्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आले आहे.निपाहच्या विषाणूविषयीजागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार निपाह विषाणू हा वटवाघळांमुळे फळ-फुलांच्या माध्यमातून मनुष्य व जनावरांत पसरत आहे. मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरात १९९८ साली हा विषाणू आढळून आला होता. या विषाणूला 'निपाह' नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याची लागण झाल्याचे दिसून आले होते. बांग्लादेशात २00४ साली या विषाणूने थैमान घातले होते. (वृत्तसंस्था)निपाहग्रस्तांची लक्षणेया विषाणुची लागण झालेल्या रुग्णांना श्वास घेण्यास खूप त्रास होतो. शरीरात जळजळ होते. योग्य वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.लस नाही उपलब्ध : निपाह विषाणूवर अद्याप प्रभावी लस उपलब्ध झालेली नाही. या विषाणूची लागण होऊ नये यासाठी फळे, विशेषत: खजूर खाणे टाळावे आणि जमिनीवर पडलेली फळे खाऊ नयेत. तसेच आजारी डुकरे व प्राण्यांच्या जवळपास फिरकू नये, असा डॉक्टरांचा सल्ला आहे.

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणू