शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

कर्नाटकात प्रसादातून विषबाधा, 11 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 21:21 IST

कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात प्रसादातून विषबाधा झाल्याने 11 जण मृत्युमुखी पडले. 80 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.

बंगळुरु : कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात प्रसादातून विषबाधा झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला असून 80 जणांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

येथील सुलवाडी किच्चुगुट्टी मरम्मा मंदिरात प्रसाद म्हणून 'व्हेज पुलाव' खाल्ल्यानंतर भाविकांना विषबाधा झाल्याचे समजते. विषबाधा झाल्यानंतर भाविकांना कामगेरे, कोल्लेगल आणि मैसूरमधील रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, यामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 80 जणांना रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, चामराजनगरचे पोलीस अधीक्षक धर्मेंद्र कुमार मीना यांनी या विषबाधेच्या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच, याठिकाणी असलेल्या आरोग्य विभागाला आवश्यक साधन सामग्री पुरवण्यात आली आहे, अशी माहिती मंड्या आणि मैसूरच्या डीएचओ यांनी दिली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई कर्नाटक सरकारकडून करण्यात आली आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ही घटना कामगेरे या गावात घडली असून खूप दुर्दैवी आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटक