शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कर्नाटकात प्रसादातून विषबाधा, 11 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 21:21 IST

कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात प्रसादातून विषबाधा झाल्याने 11 जण मृत्युमुखी पडले. 80 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.

बंगळुरु : कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात प्रसादातून विषबाधा झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला असून 80 जणांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

येथील सुलवाडी किच्चुगुट्टी मरम्मा मंदिरात प्रसाद म्हणून 'व्हेज पुलाव' खाल्ल्यानंतर भाविकांना विषबाधा झाल्याचे समजते. विषबाधा झाल्यानंतर भाविकांना कामगेरे, कोल्लेगल आणि मैसूरमधील रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, यामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 80 जणांना रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, चामराजनगरचे पोलीस अधीक्षक धर्मेंद्र कुमार मीना यांनी या विषबाधेच्या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच, याठिकाणी असलेल्या आरोग्य विभागाला आवश्यक साधन सामग्री पुरवण्यात आली आहे, अशी माहिती मंड्या आणि मैसूरच्या डीएचओ यांनी दिली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई कर्नाटक सरकारकडून करण्यात आली आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ही घटना कामगेरे या गावात घडली असून खूप दुर्दैवी आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटक