शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

१0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू

By admin | Updated: April 14, 2016 19:45 IST

पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या जवानाच्या १0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू करावे, असा आदेश लष्करी दल लवादाने दिला आहे. या महिलेला २00७ पर्यंत पेन्शन मिळत होते.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. १४ -  पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या जवानाच्या १0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू करावे, असा आदेश लष्करी दल लवादाने दिला आहे. या महिलेला २00७ पर्यंत पेन्शन मिळत होते. मात्र तिच्या पतीच्या निधनानंतर तिला ते पेन्शन मिळू लागल्याने वडिलांच्या निधनामुळे मिळणारे पेन्शन बंद करण्यात आले होते.सिरी कुमारी गौरांग या महिलेचे वडिल पहिल्या महायुद्धात ८ मार्च १९१६ रोजी मरण पावले होते. तेव्हा ती अवघ्या पाच वर्षांची होती. तिला ९ मार्चपासून १९१६ पासून पेन्शन सुरू करण्यात यावे, असा निर्णय वडिलांच्या मृत्यूनंतर झाला होता. काही वर्षांनी तिचा लष्करातील जवानाशी विवाह झाला. तो सप्टेंबर १९६४ मध्ये मरण पावला. तेव्हापासून पतीच्या निधनानंतरचेही पेन्शन सुरू झाले. तेव्हापासून २00७ पर्यंत तिला याप्रकारे दोन पेन्शनची रक्कम मिळत होती.तिला दोन पेन्शनची रक्कम मिळत असल्याचे २00७ साली पेन्शन विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे वडिलांच्या निधनामुळे मिळणारी पेन्शन बंद करण्यात आली. तसेच त्या कारणास्तव आधीच्या वर्षांत दिलेली पाच लाखांची रक्कम तिथे परत करावी, असा आदेश तिला पेन्शन विभागाने दिला. एवढेच नव्हे, तर नवऱ्याच्या निधनामुळे मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेतून ती रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली. ही रक्कम १ लाख १७ हजार रुपये होती.पेन्शन विभागाच्या या निर्णयाला या महिलेने लवादासमोर आव्हान दिले होते. त्यात केंद्र सरकार आणि लष्कर यांना प्रतिवादी करण्यात आले होते. तिच्या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर तिला २00७ पासून थांबवलेली पेन्शनची सर्व रक्कम सुरू करावी, यापुढे ती कायम ठेवावी तसेच कापलेली रक्कम १0 टक्के व्याजाने परत करावी, असा आदेश लवादाने दिला आहे. तसेचआलेल्या खर्चापोटी केंद्र सरकार आणि लष्कर यांनी मिळून एक लाख रुपये तिला द्यावेत, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे. वडिलांचे निधन झाल्यामुळे मिळत असलेली पेन्शन सुरू झाली, तेव्हा ती आयुष्यभरासाठी असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते, असे त्या महिलेने कागदपत्रांद्वारे सिद्ध केले होते. नवऱ्याच्या निधनामुळे पेन्शनचा आणि या पेन्शनचा संबंध नसल्याचे लवादाने स्पष्ट केले.त्या महिलेची रक्कम थांबवणाऱ्या व्यक्तींच्या वेतनातून एक लाखांची रक्कम कापण्याबाबतचा निर्णय प्रतिवादी म्हणजेच केंद्र सरकार व लष्कर यांनी घ्यावा, असेही लवादाने म्हटले आहे.