शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

१0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू

By admin | Updated: April 14, 2016 19:45 IST

पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या जवानाच्या १0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू करावे, असा आदेश लष्करी दल लवादाने दिला आहे. या महिलेला २00७ पर्यंत पेन्शन मिळत होते.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. १४ -  पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या जवानाच्या १0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू करावे, असा आदेश लष्करी दल लवादाने दिला आहे. या महिलेला २00७ पर्यंत पेन्शन मिळत होते. मात्र तिच्या पतीच्या निधनानंतर तिला ते पेन्शन मिळू लागल्याने वडिलांच्या निधनामुळे मिळणारे पेन्शन बंद करण्यात आले होते.सिरी कुमारी गौरांग या महिलेचे वडिल पहिल्या महायुद्धात ८ मार्च १९१६ रोजी मरण पावले होते. तेव्हा ती अवघ्या पाच वर्षांची होती. तिला ९ मार्चपासून १९१६ पासून पेन्शन सुरू करण्यात यावे, असा निर्णय वडिलांच्या मृत्यूनंतर झाला होता. काही वर्षांनी तिचा लष्करातील जवानाशी विवाह झाला. तो सप्टेंबर १९६४ मध्ये मरण पावला. तेव्हापासून पतीच्या निधनानंतरचेही पेन्शन सुरू झाले. तेव्हापासून २00७ पर्यंत तिला याप्रकारे दोन पेन्शनची रक्कम मिळत होती.तिला दोन पेन्शनची रक्कम मिळत असल्याचे २00७ साली पेन्शन विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे वडिलांच्या निधनामुळे मिळणारी पेन्शन बंद करण्यात आली. तसेच त्या कारणास्तव आधीच्या वर्षांत दिलेली पाच लाखांची रक्कम तिथे परत करावी, असा आदेश तिला पेन्शन विभागाने दिला. एवढेच नव्हे, तर नवऱ्याच्या निधनामुळे मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेतून ती रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली. ही रक्कम १ लाख १७ हजार रुपये होती.पेन्शन विभागाच्या या निर्णयाला या महिलेने लवादासमोर आव्हान दिले होते. त्यात केंद्र सरकार आणि लष्कर यांना प्रतिवादी करण्यात आले होते. तिच्या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर तिला २00७ पासून थांबवलेली पेन्शनची सर्व रक्कम सुरू करावी, यापुढे ती कायम ठेवावी तसेच कापलेली रक्कम १0 टक्के व्याजाने परत करावी, असा आदेश लवादाने दिला आहे. तसेचआलेल्या खर्चापोटी केंद्र सरकार आणि लष्कर यांनी मिळून एक लाख रुपये तिला द्यावेत, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे. वडिलांचे निधन झाल्यामुळे मिळत असलेली पेन्शन सुरू झाली, तेव्हा ती आयुष्यभरासाठी असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते, असे त्या महिलेने कागदपत्रांद्वारे सिद्ध केले होते. नवऱ्याच्या निधनामुळे पेन्शनचा आणि या पेन्शनचा संबंध नसल्याचे लवादाने स्पष्ट केले.त्या महिलेची रक्कम थांबवणाऱ्या व्यक्तींच्या वेतनातून एक लाखांची रक्कम कापण्याबाबतचा निर्णय प्रतिवादी म्हणजेच केंद्र सरकार व लष्कर यांनी घ्यावा, असेही लवादाने म्हटले आहे.