शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

१0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू

By admin | Updated: April 14, 2016 19:45 IST

पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या जवानाच्या १0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू करावे, असा आदेश लष्करी दल लवादाने दिला आहे. या महिलेला २00७ पर्यंत पेन्शन मिळत होते.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. १४ -  पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या जवानाच्या १0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू करावे, असा आदेश लष्करी दल लवादाने दिला आहे. या महिलेला २00७ पर्यंत पेन्शन मिळत होते. मात्र तिच्या पतीच्या निधनानंतर तिला ते पेन्शन मिळू लागल्याने वडिलांच्या निधनामुळे मिळणारे पेन्शन बंद करण्यात आले होते.सिरी कुमारी गौरांग या महिलेचे वडिल पहिल्या महायुद्धात ८ मार्च १९१६ रोजी मरण पावले होते. तेव्हा ती अवघ्या पाच वर्षांची होती. तिला ९ मार्चपासून १९१६ पासून पेन्शन सुरू करण्यात यावे, असा निर्णय वडिलांच्या मृत्यूनंतर झाला होता. काही वर्षांनी तिचा लष्करातील जवानाशी विवाह झाला. तो सप्टेंबर १९६४ मध्ये मरण पावला. तेव्हापासून पतीच्या निधनानंतरचेही पेन्शन सुरू झाले. तेव्हापासून २00७ पर्यंत तिला याप्रकारे दोन पेन्शनची रक्कम मिळत होती.तिला दोन पेन्शनची रक्कम मिळत असल्याचे २00७ साली पेन्शन विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे वडिलांच्या निधनामुळे मिळणारी पेन्शन बंद करण्यात आली. तसेच त्या कारणास्तव आधीच्या वर्षांत दिलेली पाच लाखांची रक्कम तिथे परत करावी, असा आदेश तिला पेन्शन विभागाने दिला. एवढेच नव्हे, तर नवऱ्याच्या निधनामुळे मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेतून ती रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली. ही रक्कम १ लाख १७ हजार रुपये होती.पेन्शन विभागाच्या या निर्णयाला या महिलेने लवादासमोर आव्हान दिले होते. त्यात केंद्र सरकार आणि लष्कर यांना प्रतिवादी करण्यात आले होते. तिच्या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर तिला २00७ पासून थांबवलेली पेन्शनची सर्व रक्कम सुरू करावी, यापुढे ती कायम ठेवावी तसेच कापलेली रक्कम १0 टक्के व्याजाने परत करावी, असा आदेश लवादाने दिला आहे. तसेचआलेल्या खर्चापोटी केंद्र सरकार आणि लष्कर यांनी मिळून एक लाख रुपये तिला द्यावेत, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे. वडिलांचे निधन झाल्यामुळे मिळत असलेली पेन्शन सुरू झाली, तेव्हा ती आयुष्यभरासाठी असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते, असे त्या महिलेने कागदपत्रांद्वारे सिद्ध केले होते. नवऱ्याच्या निधनामुळे पेन्शनचा आणि या पेन्शनचा संबंध नसल्याचे लवादाने स्पष्ट केले.त्या महिलेची रक्कम थांबवणाऱ्या व्यक्तींच्या वेतनातून एक लाखांची रक्कम कापण्याबाबतचा निर्णय प्रतिवादी म्हणजेच केंद्र सरकार व लष्कर यांनी घ्यावा, असेही लवादाने म्हटले आहे.