शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

१०० दिवसांच्या कामगिरीचे वेध

By admin | Updated: June 18, 2014 05:22 IST

या कालावधीत पूर्ण करता येऊ शकतील अशी किमान १० लोकाभिमुख कामे अथवा योजना सादर कराव्यात, असे ताजे निर्देश पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा कमालीच्या उंचावून दिल्लीत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला येत्या ३ सप्टेंबर रोजी १०० दिवस पूर्ण होतील तेव्हा लोकांच्या भल्यासाठी वास्तवात भरीव काम केल्याचे दिसावे यासाठी प्रत्येक मंत्रालयाने व विभागाने या कालावधीत पूर्ण करता येऊ शकतील अशी किमान १० लोकाभिमुख कामे अथवा योजना सादर कराव्यात, असे ताजे निर्देश पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) देण्यात आले आहेत.माहीतगार सूत्रांनी सांगितले की, जलद निर्णय घेऊन प्रत्यक्षात काम सुरू करता यावे यासाठी मंत्रालयांनी अशी कामे वा योजना लवकरात लवकर तयार कराव्यात, असे त्यांना सांगण्यात आले आहे. एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, ‘जनतेने मोठ्या आशा-आकांक्षा उराशी बाळगून भाजपाला सत्ता दिलेली असल्याने पहिल्या १०० दिवसांतच काही तरी भरीव काम केल्याचे लोकांना प्रत्यक्ष दिसावे याला सरकारकडून साहजिकच प्राधान्य देण्यात येत आहे.शिवाय केवळ प्रशासकीय निर्णय घेण्याऐवजी लोकाभिमुख कारभार करण्यासही यामुळे विविध मंत्रालयांना उद्युक्त केले जाऊ शकेल’‘मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कसा कारभार करावा, याची मार्गदर्शिका ठरवून दिली आहे. पहिल्या १०० दिवसांत करायच्या कामांचे वेळापत्रक तयार करण्यास त्यांनी मंत्र्यांना सांगितले आहे’, असे संसदीय कार्य मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)