शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह १०० अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 06:17 IST

सुरक्षा दले सतर्क; शांतता कायम राखण्यासाठी दक्षता

जम्मू : काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर हिंसाचार भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथील राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह शंभर जणांना सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे. यासंदर्भात जम्मू-काश्मीर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीरमधील लँडलाईन, इंटरनेट, मोबाईल फोन काही काळापुरते बंद ठेवण्यात आले आहेत. संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्याबरोबरच काही राजकीय नेते, कार्यकर्ते यांनाही अटक झाली आहे.जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना रविवारी रात्री स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या नेत्यांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता वाटल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन, इम्रान अन्सारी यांनाही अटक करण्यात आली आहे. या नेत्यांना सध्या हरिनिवास याठिकाणी ठेवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)पाकिस्तानची खदखद३७० कलमातील जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाºया तरतुदी रद्द करण्याबद्दलचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मांडण्यात आला होता. राज्यसभेने सोमवारी व लोकसभेने मंगळवारी या प्रस्तावाला संमती दिली. हा प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेल्यानंतर काही तासांतच काश्मीरमधील निवडक राजकीय नेते व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. भारताच्या काश्मीर व लडाखबाबतच्या निर्णयाला पाकिस्तान व चीनने कडाडून विरोध केला आहे.३७० कलमातील काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या तरतुदी रद्दराष्ट्रपती कोविंद यांच्याकडून अधिसूचना जारीनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या ३७० कलमातील तरतुदी रद्द केल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जाहीर केले. या कलमासंदर्भातले विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत संमत झाल्यानंतर राष्ट्रपतींनी ही घोषणा केली आहे.यासंदर्भातील अधिसूचनेवर राष्ट्रपतींनी मंगळवारी रात्री स्वाक्षरी केली. या अधिसूचनेत म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम ३७० च्या उपकलम १ व ३ ने दिलेल्या अधिकारानुसार, तसेच संसदेने केलेल्या शिफारसीनुसार ३७० कलमातील सर्व उपकलमांचा वापर ६ ऑगस्टपासून संपूर्णपणे बंद करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेत वेळोवेळी करण्यात येणाºया दुरुस्त्या, तसेच बदल यापुढे जम्मू-काश्मीर राज्याला लागू असतील.विलक्षण गुप्तताकाश्मीरच्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय परिमाण असल्याने हा प्रस्ताव राज्यसभेत सादर करेपर्यंत सरकारने त्याबाबत खूपच गुप्तता बाळगली होती. प्रस्ताव सादर करण्याच्या पंधरा दिवस आधीपासून काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली.रविवारी रात्री काश्मीरमधील महत्त्वाच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले. काश्मीरमध्ये जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले. अशी सारी नेपथ्यरचना झाल्यानंतर मग केंद्र सरकारने काश्मीरबाबतचा निर्णय जाहीर केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370