शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

काश्मीरमध्ये राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह १०० अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 06:17 IST

सुरक्षा दले सतर्क; शांतता कायम राखण्यासाठी दक्षता

जम्मू : काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर हिंसाचार भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथील राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह शंभर जणांना सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे. यासंदर्भात जम्मू-काश्मीर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीरमधील लँडलाईन, इंटरनेट, मोबाईल फोन काही काळापुरते बंद ठेवण्यात आले आहेत. संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्याबरोबरच काही राजकीय नेते, कार्यकर्ते यांनाही अटक झाली आहे.जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना रविवारी रात्री स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या नेत्यांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता वाटल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन, इम्रान अन्सारी यांनाही अटक करण्यात आली आहे. या नेत्यांना सध्या हरिनिवास याठिकाणी ठेवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)पाकिस्तानची खदखद३७० कलमातील जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाºया तरतुदी रद्द करण्याबद्दलचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मांडण्यात आला होता. राज्यसभेने सोमवारी व लोकसभेने मंगळवारी या प्रस्तावाला संमती दिली. हा प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेल्यानंतर काही तासांतच काश्मीरमधील निवडक राजकीय नेते व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. भारताच्या काश्मीर व लडाखबाबतच्या निर्णयाला पाकिस्तान व चीनने कडाडून विरोध केला आहे.३७० कलमातील काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या तरतुदी रद्दराष्ट्रपती कोविंद यांच्याकडून अधिसूचना जारीनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या ३७० कलमातील तरतुदी रद्द केल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जाहीर केले. या कलमासंदर्भातले विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत संमत झाल्यानंतर राष्ट्रपतींनी ही घोषणा केली आहे.यासंदर्भातील अधिसूचनेवर राष्ट्रपतींनी मंगळवारी रात्री स्वाक्षरी केली. या अधिसूचनेत म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम ३७० च्या उपकलम १ व ३ ने दिलेल्या अधिकारानुसार, तसेच संसदेने केलेल्या शिफारसीनुसार ३७० कलमातील सर्व उपकलमांचा वापर ६ ऑगस्टपासून संपूर्णपणे बंद करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेत वेळोवेळी करण्यात येणाºया दुरुस्त्या, तसेच बदल यापुढे जम्मू-काश्मीर राज्याला लागू असतील.विलक्षण गुप्तताकाश्मीरच्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय परिमाण असल्याने हा प्रस्ताव राज्यसभेत सादर करेपर्यंत सरकारने त्याबाबत खूपच गुप्तता बाळगली होती. प्रस्ताव सादर करण्याच्या पंधरा दिवस आधीपासून काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली.रविवारी रात्री काश्मीरमधील महत्त्वाच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले. काश्मीरमध्ये जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले. अशी सारी नेपथ्यरचना झाल्यानंतर मग केंद्र सरकारने काश्मीरबाबतचा निर्णय जाहीर केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370