शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

काश्मीरमध्ये राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह १०० अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 06:17 IST

सुरक्षा दले सतर्क; शांतता कायम राखण्यासाठी दक्षता

जम्मू : काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर हिंसाचार भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथील राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह शंभर जणांना सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे. यासंदर्भात जम्मू-काश्मीर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीरमधील लँडलाईन, इंटरनेट, मोबाईल फोन काही काळापुरते बंद ठेवण्यात आले आहेत. संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्याबरोबरच काही राजकीय नेते, कार्यकर्ते यांनाही अटक झाली आहे.जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना रविवारी रात्री स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या नेत्यांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता वाटल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन, इम्रान अन्सारी यांनाही अटक करण्यात आली आहे. या नेत्यांना सध्या हरिनिवास याठिकाणी ठेवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)पाकिस्तानची खदखद३७० कलमातील जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाºया तरतुदी रद्द करण्याबद्दलचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मांडण्यात आला होता. राज्यसभेने सोमवारी व लोकसभेने मंगळवारी या प्रस्तावाला संमती दिली. हा प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेल्यानंतर काही तासांतच काश्मीरमधील निवडक राजकीय नेते व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. भारताच्या काश्मीर व लडाखबाबतच्या निर्णयाला पाकिस्तान व चीनने कडाडून विरोध केला आहे.३७० कलमातील काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या तरतुदी रद्दराष्ट्रपती कोविंद यांच्याकडून अधिसूचना जारीनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या ३७० कलमातील तरतुदी रद्द केल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जाहीर केले. या कलमासंदर्भातले विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत संमत झाल्यानंतर राष्ट्रपतींनी ही घोषणा केली आहे.यासंदर्भातील अधिसूचनेवर राष्ट्रपतींनी मंगळवारी रात्री स्वाक्षरी केली. या अधिसूचनेत म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम ३७० च्या उपकलम १ व ३ ने दिलेल्या अधिकारानुसार, तसेच संसदेने केलेल्या शिफारसीनुसार ३७० कलमातील सर्व उपकलमांचा वापर ६ ऑगस्टपासून संपूर्णपणे बंद करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेत वेळोवेळी करण्यात येणाºया दुरुस्त्या, तसेच बदल यापुढे जम्मू-काश्मीर राज्याला लागू असतील.विलक्षण गुप्तताकाश्मीरच्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय परिमाण असल्याने हा प्रस्ताव राज्यसभेत सादर करेपर्यंत सरकारने त्याबाबत खूपच गुप्तता बाळगली होती. प्रस्ताव सादर करण्याच्या पंधरा दिवस आधीपासून काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली.रविवारी रात्री काश्मीरमधील महत्त्वाच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले. काश्मीरमध्ये जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले. अशी सारी नेपथ्यरचना झाल्यानंतर मग केंद्र सरकारने काश्मीरबाबतचा निर्णय जाहीर केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370