शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ओळख, लग्न लपवून संबंध ठेवल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; कायदेविषयक संसदीय समितीने केली शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 08:42 IST

तशी तरतूद भारतीय न्याय संहितेत करण्यात येणार असून, तसे विधेयकही संसदेत सादर होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : विवाह झाल्याचे अथवा खरी ओळख लपवून एखाद्या महिलेबरोबर प्रेमसंबंध, शरीरसंबंध प्रस्थापित करणे किंवा तिच्याशी विवाह करणे आता गुन्हा ठरविण्यात येणार आहे. यातील दोषी व्यक्तीला १० वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा होऊ शकेल. तशी तरतूद भारतीय न्याय संहितेत करण्यात येणार असून, तसे विधेयकही संसदेत सादर होण्याची शक्यता आहे.

कायदेविषयक संसदीय समितीने या प्रस्तावित कायद्याबाबत एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये ही शिफारस केली आहे. फसवणूक करण्याच्या पद्धतीबाबत एक प्रकरण आहे. विवाहित असल्याचे लपवून लोक महिलांना जाळ्यात ओढतात. अशा व्यक्तींना कडक शिक्षा देणे आवश्यक असल्याचे मत या प्रकरणात व्यक्त करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

काय आहे बीएनएसमधील ६९वे कलम?

भारतीय न्याय संहितेमधील (बीएनएस) कलम ६९मध्ये म्हटले आहे की, महिलेला लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिची फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. त्या महिलेशी विवाह न करता शरीरसंबंध ठेवले जातात. अशा प्रकरणात त्या दोषी व्यक्तीला १० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होणे आवश्यक आहे, तसेच त्याला दंडही ठोठावण्यात येईल. नोकरी, प्रमोशन देण्याचे आमिष दाखवून किंवा आपली खरी ओळख लपवून महिलेशी विवाह करणे हा फसवणुकीचा प्रकार गुन्हा असल्याचे मानण्यात येईल, असे बीएनएसच्या ६९व्या कलमात म्हटले आहे.

लव्ह जिहादबाबत...

लव्ह जिहादच्या संदर्भात देशभरात गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू आहे. त्या मुद्द्याच्या अनुषंगानेही काही तरतुदी नव्या विधेयकात केल्या जाण्याची शक्यता आहे.

अहवालात काय?

आपली खरी माहिती लपवून महिलांशी प्रेमसंबंध, शरीरसंबंध ठेवणाऱ्या किंवा त्यांच्याशी विवाह करणाऱ्यांचे हे कृत्य भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९नुसार गुन्हा असल्याचे मानण्यात यावे.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार