शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील आगीत १० ट्रेकर्स मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 04:43 IST

तमिळनाडुच्या कुरंगनी (जिल्हा तेनी) डोंगरांच्या जंगलात रविवारी लागलेल्या भीषण आगीत पायी प्रवासाला (ट्रेकिंग) निघालेले १0विद्यार्थी मृत्युमुखी पडले. मात्र ३० ट्रेकर्सची सुटका करण्यात यश आले.

चेन्नई/तेनी : तमिळनाडुच्या कुरंगनी (जिल्हा तेनी) डोंगरांच्या जंगलात रविवारी लागलेल्या भीषण आगीत पायी प्रवासाला (ट्रेकिंग) निघालेले १0विद्यार्थी मृत्युमुखी पडले. मात्र ३० ट्रेकर्सची सुटका करण्यात यश आले. सरकारने मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली अली.तेनीच्या जिल्हाधिकारी एम. पल्लवी बलदेव सोमवारी म्हणाल्या की, चेन्नई, कोईमतूर आणि तिरूपूर येथील बहुसंख्य विद्यार्थी ट्रेकर्स रविवारी दुपारी लागलेल्या या आगीत अडकले. ट्रेकिंगला गेलेल्यांत २५ महिला व तीन मुले होती. मृतांमध्ये सात जण चेन्नईचे तर तीन जण तिरूपूरचे होते. मृतांची नावे शुभा, हेमलता, पुनिता, अकिला, अरुण, विपीन दिव्या, विवेक आणि तमिळसेल्वम अशी आहेत. हवाई दलाची हेलिकॉप्टर्स अडकलेल्या आणखी ट्रेकर्सचा शोध घेत आहेत.काही ट्रेकर्सनी आपल्या मोबाइल फोनवरून नातेवाईकांना आगीची माहिती देताच, नातेवाईकांनी ती पोलिसांना कळवली. सायंकाळी साडेपाच वाजता बचाव कार्य सुरू झाले. वनअधिकाºयांनी सांगितले की, ट्रेकर्सनी जीव वाचवण्यासाठी कोरड्या जागेत आश्रय घेतला. परंतु तेथील वाळलेल्या गवतानेही पेट घेतला. तेथून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात काही ट्रेकर्स खड्ड्यात पडले.राज्याचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन म्हणाले की, पाच जण अतिगंभीर जखमी असून त्यांना तेनी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तर सहा जणांना मदुराई वैद्यकीय महाविद्यालयात आणि तीन जणांना खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण सोमवारी वार्ताहरांशी बोलताना भारतीय हवाईदलाने सर्व नऊ विद्यार्थ्यांचे मृतदेह आणल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)