शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

निमलष्कराचे १0 हजार जवान काश्मीरकडे; फुटीर नेत्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 5:40 AM

पाकने रिकामी केली सीमेवरील गावे । दोन देशांतील तणावामुळे अमेरिकेला चिंता

नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच, केंद्र सरकारने काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या १00 तुकड्या पाठविण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार सुमारे १0 हजार जवान तिथे निघाले आहेत. जवानांना घाईघाईने पाठविण्याचे कारण केंद्राने स्पष्ट केलेले नाही.

ही पथके रवाना होत असतानाच काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांची धरपकड सुरू केली आहे. जेकेएलएफचा नेता यासिन मलिक याला शुक्रवारी अटक केली. काश्मीर खोऱ्यातून १५0 हून अधिक फुटिरवादी नेते व कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले. जमात-ए-इस्लामीच्या अनेकांनाही अटक झाली आहे.

पाकिस्ताननेही सीमेवरील गावे अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेतला असून, त्या ठिकाणी लष्करातर्फे बंकर उभारण्याची सुरुवातही केली आहे. भारतातर्फे पाकिस्तानवर हल्ला होईल, अशी भीती त्या देशात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील सभेत म्हणाले की, पुलवामाचा बदला कसा घ्यायचा, हे लष्कराला माहीत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर १00 तासांच्या आत हल्ल्याला मदत करणाºयांना जिथे पाठविणे गरजेचे होते, तेथे जवानांनी धाडले आहे. लष्कराला सरकारने पूर्ण मोकळीक दिली आहे. पाकिस्तानविरोधी लढ्याचे सारे मार्ग आम्ही खुले ठेवल्याचे अर्थमंत्री जेटली यांनीही नमूद केले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर भारत व पाकमधील परिस्थिती खूपच बिघडल्याचे म्हटले आहे. हे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. काश्मीरमध्ये जे ४0 जवान शहीद झाले, त्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. रवाना होणाऱ्या निमलष्करी दलांमध्ये सीआरपीएफच्या ४५ तुकड्या असून, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या ३५ तुकड्या, तसेच सीमा सुरक्षा बलच्या १0 आणि इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीसच्या १0 तुकड्या आहेत.

३५ अ चा निकालकाश्मीरविषयीच्या राज्यघटनेतील ३५ अ कलमाबाबत सर्वोच्च न्यायालय सोमवारी निर्णय देणे अपेक्षित आहे. या कलमान्वये काश्मीरमध्ये जन्मलेली व्यक्तीच तेथील नागरिक असू शकते आणि तिथे मालमत्ता विकत घेऊ शकते. ते रद्द करावे, अशी याचिका न्यायालयात आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे काश्मीरमधील तणाव वाढण्याच्या शक्यतेमुळेच निमलष्करी दलांना तिथे पाठविले असावे, अशी चर्चा सुरू आहे. भारत व पाकिस्तान तणाव वाढत असताना, काश्मीरमध्ये या निकालाने नवी समस्या उद्भवू नये, अशी केंद्राची इच्छा आहे.अन्नधान्ये व औषधांचा साठा करण्याचेही आदेशजम्मू-काश्मीर राज्य सरकारच्या आरोग्यसेवा संचालनालयानेही जिल्हा कार्यालयांना श्रीनगरच्या विभागीय औषध गोदामातून पाठवण्यात येणारी औषधे, गोळ््या, शस्त्रक्रियेची उपकरणे ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. हे साहित्य सर्वत्र पोहचावे यासाठी श्रीनगरचे औषध गोदाम रविवारी, २४ रोजीही सुरु राहणार आहे. दक्षिण श्रीनगरच्या अन्न, नागरी पुरवठा संचालनालयाने अखत्यारितील सर्व कार्यालयांनाही लोकांना उपलब्ध अन्नधान्यांची विक्री तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. जनतेला विकत घेता यावे यासाठी विक्री केंद्रे व दुकाने रविवारी, २४ तारखेलाही सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान