शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

निमलष्कराचे १0 हजार जवान काश्मीरकडे; फुटीर नेत्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 05:40 IST

पाकने रिकामी केली सीमेवरील गावे । दोन देशांतील तणावामुळे अमेरिकेला चिंता

नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच, केंद्र सरकारने काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या १00 तुकड्या पाठविण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार सुमारे १0 हजार जवान तिथे निघाले आहेत. जवानांना घाईघाईने पाठविण्याचे कारण केंद्राने स्पष्ट केलेले नाही.

ही पथके रवाना होत असतानाच काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांची धरपकड सुरू केली आहे. जेकेएलएफचा नेता यासिन मलिक याला शुक्रवारी अटक केली. काश्मीर खोऱ्यातून १५0 हून अधिक फुटिरवादी नेते व कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले. जमात-ए-इस्लामीच्या अनेकांनाही अटक झाली आहे.

पाकिस्ताननेही सीमेवरील गावे अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेतला असून, त्या ठिकाणी लष्करातर्फे बंकर उभारण्याची सुरुवातही केली आहे. भारतातर्फे पाकिस्तानवर हल्ला होईल, अशी भीती त्या देशात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील सभेत म्हणाले की, पुलवामाचा बदला कसा घ्यायचा, हे लष्कराला माहीत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर १00 तासांच्या आत हल्ल्याला मदत करणाºयांना जिथे पाठविणे गरजेचे होते, तेथे जवानांनी धाडले आहे. लष्कराला सरकारने पूर्ण मोकळीक दिली आहे. पाकिस्तानविरोधी लढ्याचे सारे मार्ग आम्ही खुले ठेवल्याचे अर्थमंत्री जेटली यांनीही नमूद केले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर भारत व पाकमधील परिस्थिती खूपच बिघडल्याचे म्हटले आहे. हे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. काश्मीरमध्ये जे ४0 जवान शहीद झाले, त्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. रवाना होणाऱ्या निमलष्करी दलांमध्ये सीआरपीएफच्या ४५ तुकड्या असून, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या ३५ तुकड्या, तसेच सीमा सुरक्षा बलच्या १0 आणि इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीसच्या १0 तुकड्या आहेत.

३५ अ चा निकालकाश्मीरविषयीच्या राज्यघटनेतील ३५ अ कलमाबाबत सर्वोच्च न्यायालय सोमवारी निर्णय देणे अपेक्षित आहे. या कलमान्वये काश्मीरमध्ये जन्मलेली व्यक्तीच तेथील नागरिक असू शकते आणि तिथे मालमत्ता विकत घेऊ शकते. ते रद्द करावे, अशी याचिका न्यायालयात आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे काश्मीरमधील तणाव वाढण्याच्या शक्यतेमुळेच निमलष्करी दलांना तिथे पाठविले असावे, अशी चर्चा सुरू आहे. भारत व पाकिस्तान तणाव वाढत असताना, काश्मीरमध्ये या निकालाने नवी समस्या उद्भवू नये, अशी केंद्राची इच्छा आहे.अन्नधान्ये व औषधांचा साठा करण्याचेही आदेशजम्मू-काश्मीर राज्य सरकारच्या आरोग्यसेवा संचालनालयानेही जिल्हा कार्यालयांना श्रीनगरच्या विभागीय औषध गोदामातून पाठवण्यात येणारी औषधे, गोळ््या, शस्त्रक्रियेची उपकरणे ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. हे साहित्य सर्वत्र पोहचावे यासाठी श्रीनगरचे औषध गोदाम रविवारी, २४ रोजीही सुरु राहणार आहे. दक्षिण श्रीनगरच्या अन्न, नागरी पुरवठा संचालनालयाने अखत्यारितील सर्व कार्यालयांनाही लोकांना उपलब्ध अन्नधान्यांची विक्री तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. जनतेला विकत घेता यावे यासाठी विक्री केंद्रे व दुकाने रविवारी, २४ तारखेलाही सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान