शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

10 हजार कोटींचा काळा पैसा एकाच व्यक्तीचा

By admin | Updated: October 13, 2016 13:21 IST

हैदराबादमधील 13 हजार कोटी काळ्या पैशांतील 10 हजार कोटी हे एकाच व्यक्तीचे आहेत, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

आंध्र प्रदेश ,दि.13 - अघोषित उत्पन्न जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेत हैदराबादमध्ये 13 हजार कोटी रुपयांचा  काळा पैसा उघड करण्यात आला. या 13 हजार कोटी रुपयांमधील 10 हजार कोटी रुपये हे तर हैदराबादमधील एकाच व्यक्तीचे आहेत, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या दाव्याद्वारे त्यांनी राजकीय विरोधकांकडे आपला रोख ठेवल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारच्या दंड भरून काळा पैसा उघड करण्याच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि शेवटच्या दिवशी देशभरातून 65 हजार कोटी रुपयांची कबुली देण्यात आली. यातील सर्वाधिक काळा पैसा हा हैदराबादमधील असून येथील 13 हजार कोटी रूपयांच्या अघोषित उत्पन्नाचा खुलासा झाला आहे.  मात्र यातील 10 हजार कोटी हे एकाच व्यक्तीचे असल्याचे धक्कादायक विधान चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला आहे.  'ती व्यक्ती कोण आहे, हे या संदर्भातील गुप्ततेच्या कायद्यामुळे स्पष्ट होणार नाही. मात्र, एखादा उद्योजक इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती घोषित करण्याची शक्यता आहे का?', असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.
येत्या काळातही अशाच योजना येतील. काळा पैसा असलेले 40 ते 45 टक्के दंड भरून मोकळे होतील आणि उरलेला पैसा पांढरा होईल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. यावर कोणी प्रश्न उपस्थित करू शकणार नाही आणि सामाजिक कलंकही लागणार नाही, असे देखील नायडू यांनी यावेळी म्हटले. तसेच भ्रष्टाचारी आणि काळा पैसा कमावणा-यांसाठी राजकारण एक निवारा बनलाय, अशी खोचक टीका देखील त्यांनी केली. शिवाय, राजकारणात असलेले काही जण जनादेशाचा दुरुपयोग करत असल्याचेही नायडूंनी नमूद केले आहे. नायडूंनी असे वक्तव्य करुन विरोधकांना लक्ष्य केल्याचे मानण्यात येत आहे.
काळ्या पैशाच्या समस्येवर मात करण्यासाठी एक हजार आणि 500 रुपयांच्या नोटा व्यवहारातून काढून घ्याव्यात अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बड्या नोट्या बंद झाल्या तर व्होट बँक विकत घेण्याची पद्धतही संपुष्टात येईल असे त्यांनी म्हटले आहे. घोषित उत्पन्न जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेत सर्वाधिक काळा पैसा असलेल्या शहरात हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली आघाडीवर आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत काळा पैसा जाहीर करण्याची अंतिम मुदत होती. यातील निम्म्याहून अधिक रक्कम या तीन शहरातून आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.