शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

१० माओवादी चकमकीत ठार, पोलीस, माओवादीविरोधी पथकाची छत्तीसगढ सीमेवर संयुक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 06:07 IST

छत्तीसगढ व तेलंगणा सीमेवरील पुजारी कांकेर व तडपुलागुटा जंगलात शुक्रवारी १० माओवाद्यांना ठार करण्यात आले. माओवादीविरोधी विशेष पथक व छत्तीसगड पोलिसांनी सकाळी ६.३० वाजता संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

हैदराबाद : छत्तीसगढ व तेलंगणा सीमेवरील पुजारी कांकेर व तडपुलागुटा जंगलात शुक्रवारी १० माओवाद्यांना ठार करण्यात आले. माओवादीविरोधी विशेष पथक व छत्तीसगड पोलिसांनी सकाळी ६.३० वाजता संयुक्तरीत्या ही कारवाई केली. या कारवाईत विशेष पथकाच्या एका जवानाचा मृत्यू झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे कारवाईत माओवाद्यांचा नेता हरी भूषण ठार झाल्याचे वृत्त आहे. लष्करी डावपेच आखण्यात भूषणचा हातखंडा होता, असे बोलले जाते. जगन व बडे अप्पाराव हे नेतेही या कारवाईत ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये ६ महिलांचाही समावेश असल्याचे बोलले जाते. या माओवाद्यांवर मोठ्या रकमेचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. ठार झालेल्या माओवाद्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. या जंगलात माओवाद्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ७० जण उपस्थित होते. या बैठकीची माहिती स्थानिक पोलीस व विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. कारवाई सुरू करण्याआधी सर्वसामान्य नागरिकांना जंगलात जाण्यास मनाई करण्यात आली होती. या कारवाईला प्रत्युत्तर देताना माओवाद्यांनीही गोळीबार केला. उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती.चकमकीत विशेष पथकातील सुशीलकुमार नावाच्या जवानाचा मृत्यू झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. गेले काही दिवस माओवाद्यांकडून लष्करी तळांवर सतत हल्ले केले जात होते. त्यामुळे आजची कारवाई ही पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे. >हरी भूषणवर होते ३० लाखांचे बक्षीसतेलंगणा राज्याची स्थापना झाल्यापासून हरी भूषण माओवादी संघटनेचा नेता म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ५० गुन्ह्यांची त्याच्या नावावर नोंद होती.या कारवाईत त्याच्यासह त्याची पत्नी समक्कादेखील ठार झाल्याचे वृत्त आहे. या कारवाईत पोलिसांनी १ एके-४७, १ एसएलआर व ५ रायफली जप्त केल्या.>दोघांची ओळख पटलीठार करण्यात आलेल्या १०पैकी संजीव आणि महिला पेड्डा बुद्री यांची ओळख पटली असून, दोघेही या संघटनेत सक्रिय सहभागी असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी अनेक भागांत सुरक्षादलाच्या जवानांना लक्ष्य केले होते. दंतेवाडा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ पोलीस जखमीदेखील झाले होते. या पार्श्वभूमीवर नक्षलवादविरोधी मोहिमेत सुरक्षा दलाला मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जात आहे. ही चकमक बनावट असल्याचा आरोप क्रांतिकारी लेखक संघटनेचे वारवरा राव यांनी केला आहे. पोलिसांनी माओवाद्यांना पकडले, त्यांचे हाल केले व नंतर त्यांना ठार केले़ तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी राव यांनी केली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी