शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

४५ पैशांत प्रवाशांना १० लाखांचा विमा! 'आयआरसीटीसी'कडून धोरणात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 10:31 IST

Indian Railway News: भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या प्रवास विमा धोरणात मोठा बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या ४५ पैशांत १० लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.

 नवी दिल्ली - भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या प्रवास विमा धोरणात मोठा बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या ४५ पैशांत १० लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. हा विमा ऐच्छिक आहे. मात्र, एकदा खरेदी केल्यावर एका पीएनआरवर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना तो अनिवार्य होईल. ही योजना केवळ भारतीयांसाठी आहे. ई-तिकिटांच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल. प्रतिप्रवासी ४५ पैसे त्यासाठी अदा करावे लागतील.

विदेशी नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही. एजंट वा अन्य संस्थांच्या माध्यमातून तिकीट बुक केल्यासही हा लाभ मिळणार नाही. विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५ वर्षांखालील मुलांना योजनेबाहेर ठेवले आहे. मात्र ५ ते ११ या वयोगटातील मुलांना तिकिटासह अथवा विनाआसन बुकिंग केल्यानंतर विमा मिळू शकेल.

कशासाठी किती पैसे? मृतदेह स्थलांतर : रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास मृतदेह स्थलांतरित करण्यासाठी १० हजार रुपये मिळतील.■ उपचार खर्च: रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी २ लाख रुपये मिळतील.• कायमस्वरूपी / आंशिक अपंगत्व : रेल्वे अपघातात कायमस्वरूपी आंशिक अंपगत्व आल्यास विम्याची २०० टक्के रक्कम म्हणजेच १० लाख रुपये मिळतील,• मृत्यू: रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवासाच्या वारशाला विम्याची सर्व १० लाख रुपयांची रक्कम मिळेल,

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे