शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

४५ पैशांत प्रवाशांना १० लाखांचा विमा! 'आयआरसीटीसी'कडून धोरणात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 10:31 IST

Indian Railway News: भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या प्रवास विमा धोरणात मोठा बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या ४५ पैशांत १० लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.

 नवी दिल्ली - भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या प्रवास विमा धोरणात मोठा बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या ४५ पैशांत १० लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. हा विमा ऐच्छिक आहे. मात्र, एकदा खरेदी केल्यावर एका पीएनआरवर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना तो अनिवार्य होईल. ही योजना केवळ भारतीयांसाठी आहे. ई-तिकिटांच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल. प्रतिप्रवासी ४५ पैसे त्यासाठी अदा करावे लागतील.

विदेशी नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही. एजंट वा अन्य संस्थांच्या माध्यमातून तिकीट बुक केल्यासही हा लाभ मिळणार नाही. विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५ वर्षांखालील मुलांना योजनेबाहेर ठेवले आहे. मात्र ५ ते ११ या वयोगटातील मुलांना तिकिटासह अथवा विनाआसन बुकिंग केल्यानंतर विमा मिळू शकेल.

कशासाठी किती पैसे? मृतदेह स्थलांतर : रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास मृतदेह स्थलांतरित करण्यासाठी १० हजार रुपये मिळतील.■ उपचार खर्च: रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी २ लाख रुपये मिळतील.• कायमस्वरूपी / आंशिक अपंगत्व : रेल्वे अपघातात कायमस्वरूपी आंशिक अंपगत्व आल्यास विम्याची २०० टक्के रक्कम म्हणजेच १० लाख रुपये मिळतील,• मृत्यू: रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवासाच्या वारशाला विम्याची सर्व १० लाख रुपयांची रक्कम मिळेल,

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे